शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उद्योगासाठी नैसर्गिक संपत्तीचा गळा घोटला !

By admin | Updated: June 20, 2016 00:30 IST

खंडाळा तालुका : पर्यावरणाचा ऱ्हास; औद्योगिकीकरणाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड, टेकड्या उद्ध्वस्त

 खंडाळा : खंडाळा तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय विस्तारीत झालेला आहे. मात्र या उद्योग उभारणीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा व पर्यावरणाचा गळा घोटला जात असल्याचे विदारक चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नव्या औद्योगिक धोरणानुसार महामार्गालगत आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा तालुक्याला कारखानदारांनी पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे शेकडो कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. तर अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत. कंपनी उभारण्यासाठी घेतलेल्या जमीन क्षेत्रातील सपाटीकरण करताना वृक्षसंपदेला कुऱ्हाडीचा घाव घातला जातोय. नैसर्गिक टेकड्या बेमालूमपणे भुईसपाट केल्या जात आहे. एवढेच नव्हे तर नैसर्गिक ओढे -नाले सुद्धा नेस्तनाबूत होत आहेत. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसणार आहे. कंपन्यांनी ओढ्यातूनच कंपाऊंड बांधून त्याखालून ओढ्याचे पाणी काढून दिले आहे. ऐन पावसाळ्यात येणारे पाणी ओढा पात्र संपुष्टात आल्याने शेतीपिकातून जाण्याची भीती आहे. अनेक कंपनी मालकांनी अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली टेकड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तर प्रचंड प्रमाणात वृक्षतोडही केली आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक करून गांधारीची भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळते. वास्तविक नव्या धोरणानुसार कंपनी उभारताना घेतलेल्या जमिनीत सुमारे ३३ टक्के भागावर वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. परंतु दिवसा ढवळ्या प्रशासनादेखत कायदाही बासनात गुंडाळून मागेपुढे पाहिले जात नाही. तरीही प्रशासन गप्प का ? अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. एरव्ही शेतकऱ्यांने स्वत:च्या जमिनीत माती उकरली तरी दंड करणारे महसूल प्रशासनाची कंपन्यांबाबत ही भूमिका कशासाठी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी) खंडाळा तालुक्यात उद्योग वाढत आहेत. ही बाब चांगली असली तरी त्याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य नाही. कायद्याचे पालन करून कंपन्यांनी कामे केली पाहिजेत. यावर प्रशासन लक्ष देणार नसेल तर समाजहित जोपासणारा पक्ष म्हणून शिवसेना त्यावर आवाज उठवेल. - अजित यादव, तालुकाप्रमुख, युवा शिवसेना खंडाळा कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जोपासली पाहिज. नैसर्गिक प्रवाह बंद करून शेतकऱ्यांवर घाला घालू नये. तालुक्यातील सर्व कंपन्यांनी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. - संतोष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते