शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

नथुरामाचे उदात्तीकरण नको

By admin | Updated: December 29, 2014 23:53 IST

स्वातंत्र्यसैनिकांचा सत्याग्रह : कऱ्हाडच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध

कऱ्हाड : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या काही वृत्तींचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या निषेधार्थ येथील कोल्हापूर नाक्यानजीक महात्मा गांधी पुतळा परिसरात सोमवारी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले़ यावेळी महात्मा गांधी यांची हत्या कणाऱ्याचे गौरवीकरण नको, अशी मागणी करण्यात आली़ उत्तर प्रदेशात नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याचा घाट काही प्रवृत्तींनी घातला आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १९४२ च्या चले जाव आंदोलनात, प्रतिसरकार लढ्यात, तसेच मिठाचा सत्याग्रह, गोवा मुक्ती संग्राम, भूमिगत चळवळ अशा लढ्यांतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, अशा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांकडून या प्रवृत्तींचा धिक्कार करण्यात आला. आंदोलनास ३५ हून अधिक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी हजेरी लावली होती़ दरम्यान, यापुढेही असाच लढा चालू ठेवून देशविघातक शक्तींविरोधात नेहमीच अहिंसेच्या मार्गाने आपली भूमिका मांडू, असे मत स्वातंत्र्यसेनानी भाई पंजाबराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले़ यावेळी प्रतिसरकार स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी डी़ एम़ पाटील, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक कल्याण सुकाणू समितीचे पंजाबराव फाळके, विजय देशापांडे, महात्मा गांधी स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी अण्णा सापते, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे अस्लम तडसरकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुलाबराव ढमाळे, नारायण पाटील, वसंत पारवे, जालिंदर पाटील, कॉ़ डी़ एस़ पाटील, भानुदास पाटील, हणमंत थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)९६ व्या वर्षीही सत्याग्रहात सहभागीक्रांतिसिंह नाना पाटील, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिवीर किसन वीर, जी़ डी़ बापू लाड यांच्याबरोबर काम केलेले, चलेजाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह, प्रतिसरकार आंदोलन, भूमिगत लढ्यामध्ये सहभाग घेतलेले, राष्ट्रपतीपदक प्राप्त सोपानराव घोरपडे (रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव) यांनी ९६ व्या वर्षीही त्यांच्यातील स्वातंत्र्यसैनिक जागा ठेवून या सत्याग्रहात सहभाग घेतला़