शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ...

सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याची हवाई पाहणी करून या राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बाकीच्या राज्यांना मात्र केंद्राने कोणतीच मदत दिलेली नाही. त्यामुळे मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत का? अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ते आले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

समुद्रात ओएनजीसीचे जहाज बुडून जवळपास ८७ लोक बेपत्ता झाले. त्यामध्ये ५० ते ६० मृतदेह सापडले आहेत. या घटनेची केंद्र सरकारने चौकशी लावली आहे. तेल खात्याच्या अधिपत्याखालील चौकशी समिती ही पक्षपातीपणाने ही चौकशी करणार नसल्याने काँग्रेस पक्षाला ही मान्य नाही. आता शिपिंग खात्याच्या अधिपत्याखाली केंद्राने ही चौकशी लावलेली आहे. वादळाचा इशारा दिला असतानाही तो डावलून समुद्रात कोणाच्या आदेशावरून नेण्यात आले, त्याची सखोल चौकशी केली जावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना महामारीचा धोका ओळखून योग्यवेळी लसीकरणाला परवानगी दिली नाही. आता राज्याने लस घेऊन नागरिकांना द्यावी, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. टेंडर पद्धतीने लसी खरेदी करण्याचे केंद्र सांगत आहे. असे केले तर चढाओढ लागून जास्त किमतीने लस खरेदी करावी लागेल आणि त्याचा भुर्दंड जनतेवर पडणार आहे.

वास्तविक, ही महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याने केंद्राच्या खजिन्यातून लस खरेदी करून ती प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. महामारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटी रुपये अंदाजपत्रकात निधी राखून ठेवला आहे. या निधीचे काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून आमदार चव्हाण यांनी, नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज काढावे असे सुचवले आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवराज मोरे, बाबासाहेब कदम, रजनी पवार, मनोजकुमार तपासे, धनश्री महाडिक, विराज शिंदे, मनोहर शिंदे, अन्वर पाशा खान, दत्तात्रय धनवडे, प्रकाश फारांदे, नाना लोखंडे, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, चिन्मय जंगम, अमर करंजे आदी उपस्थित होते.

राजीव गांधींचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महान

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना त्यांनी करून दूरगामी शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे, अशा शब्दांत आमदार चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.