शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ...

सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याची हवाई पाहणी करून या राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बाकीच्या राज्यांना मात्र केंद्राने कोणतीच मदत दिलेली नाही. त्यामुळे मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत का? अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ते आले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

समुद्रात ओएनजीसीचे जहाज बुडून जवळपास ८७ लोक बेपत्ता झाले. त्यामध्ये ५० ते ६० मृतदेह सापडले आहेत. या घटनेची केंद्र सरकारने चौकशी लावली आहे. तेल खात्याच्या अधिपत्याखालील चौकशी समिती ही पक्षपातीपणाने ही चौकशी करणार नसल्याने काँग्रेस पक्षाला ही मान्य नाही. आता शिपिंग खात्याच्या अधिपत्याखाली केंद्राने ही चौकशी लावलेली आहे. वादळाचा इशारा दिला असतानाही तो डावलून समुद्रात कोणाच्या आदेशावरून नेण्यात आले, त्याची सखोल चौकशी केली जावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना महामारीचा धोका ओळखून योग्यवेळी लसीकरणाला परवानगी दिली नाही. आता राज्याने लस घेऊन नागरिकांना द्यावी, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. टेंडर पद्धतीने लसी खरेदी करण्याचे केंद्र सांगत आहे. असे केले तर चढाओढ लागून जास्त किमतीने लस खरेदी करावी लागेल आणि त्याचा भुर्दंड जनतेवर पडणार आहे.

वास्तविक, ही महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याने केंद्राच्या खजिन्यातून लस खरेदी करून ती प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. महामारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटी रुपये अंदाजपत्रकात निधी राखून ठेवला आहे. या निधीचे काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून आमदार चव्हाण यांनी, नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज काढावे असे सुचवले आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवराज मोरे, बाबासाहेब कदम, रजनी पवार, मनोजकुमार तपासे, धनश्री महाडिक, विराज शिंदे, मनोहर शिंदे, अन्वर पाशा खान, दत्तात्रय धनवडे, प्रकाश फारांदे, नाना लोखंडे, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, चिन्मय जंगम, अमर करंजे आदी उपस्थित होते.

राजीव गांधींचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महान

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना त्यांनी करून दूरगामी शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे, अशा शब्दांत आमदार चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.