शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

नागठाणेकरांना मिळणार निर्जंतुक पिण्याचे पाणी

By admin | Updated: February 10, 2015 00:28 IST

जलस्वराज्य योजनेतून कामपूर्ती : प्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

नागठाणे : सातारा तालुक्यातील सातारा शहरानंतर सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नागठाणे, ता. सातारा गावाला गेले अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे गावच्या विकासावर परिणाम झाला होता. पण आता नागठाणेकरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे.काही वर्षांपूर्वी जलस्वराज्याच्या या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी गावाला देण्याकरिता काही लोक प्रतिनिधींनी ही योजना राबविण्याकरिता अथक प्रयत्न केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही योजना पूर्णत्वाकडे गेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी ही योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय ग्रामसभेत होऊन या कामाने गती घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांना स्वच्छ, निर्जंतुक, पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.नागठाणे हे गाव सुमारे ६१ गावांचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे अनेक योजना राबविण्याच्या सर्व पातळीवर प्रयत्न झाला. दुर्दैवाने या सर्व योजनांमध्ये काहीना काहीतरी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? हा एकच सवाल सर्व स्तरातील नागरिक वारंवार लोकप्रतिनिधीसमोर उपस्थित करत होते. दरम्यान, जलस्वराज्य ही योजना जलसंजिवनीप्रमाणे शासनाने अंमलात आणली आणि नागठाणे गावच्या लोकप्रतिनिधी ही योजना राबवून नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी दृढ निश्चय केला. त्यानुसार अथक प्रयत्नातून लोक सहभाग घडवून आणला. पाणीसाठा करण्याकरिता उरमोडी नदीवर बंधाराही बांधण्यात आला. बंधारा बांधल्यानंतर फार मोठा पाणी साठाही झाला. त्या पुढाकाराने ग्रामसभेत पूर्वीच्या कामाचे आॅडिट करून पंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. पंचायतीच्या सर्व सदस्यांनी हा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या कृतीतून दर्शविले. जलस्वराज्याच्या कामाने प्रचंड गती घेतली असून येणाऱ्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने कोणत्या राजकीय गटाला फायदा मिळेल, हे महत्त्वाचे नसून त्यांच्या हक्काचे स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणार आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. म्हणूनच नागठाणेतील सर्व गटांच्या नेतृत्वाचे पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे ठरविले हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.- प्रवीण साळुंखे, सरपंच