शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नागठाणेकरांना मिळणार निर्जंतुक पिण्याचे पाणी

By admin | Updated: February 10, 2015 00:28 IST

जलस्वराज्य योजनेतून कामपूर्ती : प्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

नागठाणे : सातारा तालुक्यातील सातारा शहरानंतर सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नागठाणे, ता. सातारा गावाला गेले अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे गावच्या विकासावर परिणाम झाला होता. पण आता नागठाणेकरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे.काही वर्षांपूर्वी जलस्वराज्याच्या या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी गावाला देण्याकरिता काही लोक प्रतिनिधींनी ही योजना राबविण्याकरिता अथक प्रयत्न केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही योजना पूर्णत्वाकडे गेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी ही योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय ग्रामसभेत होऊन या कामाने गती घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांना स्वच्छ, निर्जंतुक, पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.नागठाणे हे गाव सुमारे ६१ गावांचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे अनेक योजना राबविण्याच्या सर्व पातळीवर प्रयत्न झाला. दुर्दैवाने या सर्व योजनांमध्ये काहीना काहीतरी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? हा एकच सवाल सर्व स्तरातील नागरिक वारंवार लोकप्रतिनिधीसमोर उपस्थित करत होते. दरम्यान, जलस्वराज्य ही योजना जलसंजिवनीप्रमाणे शासनाने अंमलात आणली आणि नागठाणे गावच्या लोकप्रतिनिधी ही योजना राबवून नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी दृढ निश्चय केला. त्यानुसार अथक प्रयत्नातून लोक सहभाग घडवून आणला. पाणीसाठा करण्याकरिता उरमोडी नदीवर बंधाराही बांधण्यात आला. बंधारा बांधल्यानंतर फार मोठा पाणी साठाही झाला. त्या पुढाकाराने ग्रामसभेत पूर्वीच्या कामाचे आॅडिट करून पंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. पंचायतीच्या सर्व सदस्यांनी हा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या कृतीतून दर्शविले. जलस्वराज्याच्या कामाने प्रचंड गती घेतली असून येणाऱ्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने कोणत्या राजकीय गटाला फायदा मिळेल, हे महत्त्वाचे नसून त्यांच्या हक्काचे स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणार आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. म्हणूनच नागठाणेतील सर्व गटांच्या नेतृत्वाचे पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे ठरविले हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.- प्रवीण साळुंखे, सरपंच