शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

नगरपंचायतीच्या पणतीत पाण्याचं तेल !

By admin | Updated: June 21, 2016 01:20 IST

सोशल मीडियावर खडाजंगी : पाणीटंचाईची राजकीय पटलावर जोरदार चर्चा; निवडणुकीपूर्वीच वातावरण रंग भरु लागले

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी प्रमुख पक्ष अतिशय दक्ष झाले आहेत. सध्या खंडाळा शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या ज्वलंत प्रश्नाचीही राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने खंडाळा नगरपंचायतीच्या पणतीत पाण्याचं तेल ओतले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यावर शाब्दिक खडाजंगी जोरकस सुरू असल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरणात रंग भरू लागले आहेत. खंडाळा नगरपंचायतीची घोषणा २७ मे रोजी झाल्यानंतर येथे प्रशासकीय कारभार सुरू झाला. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या भलतीच गंभीर बनली आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन-चारच वेळा पाणी नागरिकांना मिळत आहे. ते सुद्धा कमी दाबाने आणि अल्पवेळच पुरवले जात आहे. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, योग्य व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच पायउतार झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले आहे. निवेदनाचे फोटोही सोशल मीडियावर झळकू लागले; हाच धागा पकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रसिद्धीचा खरपूस समाचार घेत सोशल मीडियावर आतषबाजी सुरू केली आहे. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच निवेदन दिले तर मग इतकी वर्षे काय काम केले, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे सध्या खंडाळ्यातील राजकीय वातावरणात वणवा भडकला आहे. मात्र, त्यासाठी तेल म्हणून पाण्याचा वापर केला गेलाय आणि शाब्दिक चकमकीची वात पेटवून राजकीय रंग भरले जात आहेत. खंडाळ्यातील तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच फेसबुकवर सध्या हीच चर्चा चवीने चघळली जात आहे. विरोधकांनी पाण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रत्युत्तर करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे. येथील राजकीय घडामोडी नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या भोवती फिरत आहेत. त्यातच नगरपंचायतीसाठी शिवसेना आणि भाजपनेही आपला मोर्चा वळविला आहे. खंडाळ्यातील प्रत्येक घटनेवर एकमेकांचे बारकाव्याने लक्ष लागून राहिले आहे. आतापासूनच अंदाजित प्रभाग लक्षात घेऊन आपापल्या पक्षाच्या मुद्द्यांची पेरणी करण्याचे काम सुरू आहे. त्यातच पिण्याच्या पाण्यावरून राजकारण पेटू लागल्याने शाब्दिक चकमकी घडून येत आहेत. सोशल मीडियावर वापर यासाठी प्रभावी ठरत आहे. एकीकडे पाण्यासाठी उठाठेव तर दुसरीकडे जनता हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याचे ग्रहण कधी संपणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे. (प्रतिनिधी) सत्ता असताना काय काम ? खंडाळ्यात पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रशासकांना ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच निवेदन दिले. मग १५ वर्षे सत्ता असताना त्यांनी काय केले. पाण्याची समस्या का मिटली नाही. केवळ जनतेबद्दल आस्था असल्याचे निवडणुकीच्या तोंडावर दाखवण्याचा हा प्रकार आहे. १५ दिवसांत प्रशासकाकडे मागणी करणाऱ्यांनी १५ वर्षांत पाणी योजनेविषयी केलेल्या कामांची जनतेलाच उत्तरे द्यावीत. त्यांच्या विचारांची कीव करावी वाटते. - शैलेश गाढवे टँकर सुरु करा खंडाळ्यातील टंचाईवर मात करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून ते विहिरीत सोडून शहराला सुरळीत पाणी पुरवावे. सर्वत्रच पाणीटंचाई असल्याने खंडाळ्यातही टँकर सुरू करावा, या मागणीसाठी आम्ही निवेदन दिले होते. - प्रकाश गाढवे,