शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

नगर पंचायतीच्या व्यवसाय परवान्याला आचारसंहिताच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांच्या आसपास असून, शहरात नागरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांच्या आसपास असून, शहरात नागरी सुविधांची वानवा तर आहेच. परंतु, शहरातील हॉटेल व्यवसायासह इतर व्यवसायातील ग्राहकांच्या सोयी-सुविधांचा अभाव सदृश्य चित्राद्वारे दिसून येत आहे. त्यामुळे नगर पंचायत परवान्याला आचारसंहिताच नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वडूज ग्रामपंचायतीची साडेचार वर्षांनंतर नगर पंचायत झाली. नागरिकांच्या नगर पंचायत स्थापनेनंतर सुविधा आणि विकासासंदर्भात अपेक्षा वाढल्या. दैनंदिन सुविधांबरोबर इतर आवश्यक सेवेसाठी नगर पंचायत प्रशासनाकडून पूर्तता होईल, असे येथील नागरिकांना वाटत होते. शहराची झपाट्याने होणारी वाढती व्याप्ती पाहता आणि तालुक्याचे मुख्यालय असल्यामुळे व्यवसायासाठी संधी निर्माण झाली होती.

वडूज शहरात सुमारे १८० हॉटेल्स, ७० कापड दुकाने, ९० लहान-मोठी किराणा दुकाने, ४० स्टेशनरी दुकाने यासह अनेक व्यवसाय सुरू आहेत. वास्तविक पाहता या व्यवसायादरम्यान इमारतीमध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही हिताचा निर्णय घेतलेला दिसून येत नाही. प्रामुख्याने हॉटेल, धाबे याठिकाणी अन्न व भेसळ प्रशासनाच्या नियमानुसार व्यवसाय इमारती ठिकाणी शौचालय व इतर सोयी-सुविधा असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, अन्न व भेसळ प्रशासनाकडून याबाबत कोणतीच स्थळ पाहणी केलेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत प्रशासनाकडूनही साडेचार वर्षे लोटली तरी शहर स्वच्छ सर्वेक्षण समन्वयकाची नेमणूकच झाली नसल्याने नाममात्र दोनशे रुपये फीमध्ये व्यवसाय परवाना दिला जात आहे. व्यवसाय इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणेचीही सोय नसल्याचे जाणवते. अन्न व भेसळ प्रशासनाकडून ऑनलाईन व्यवसाय परवाना एक, तीन व पाच वर्षांसाठी प्राप्त होतो. परंतु, या विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यवसाय परवाना देण्यापूर्वी व्यवसाय इमारत पाहणी झालेली दिसून येत नाही. स्थळ पाहणीसाठी आले तरी कागदोपत्री पर्यायी व्यवस्था करून हे अधिकारी जिल्हा रवाना होत आहेत.

शहरामध्ये मोठमोठे व्यवसाय उभे असून, महाविद्यालय, शाळा, दवाखाने व मंगल कार्यालयांची संख्या अधिक आहे. त्या पटीत ग्राहक व रुग्णांसाठी सुविधा देण्याबाबत संबंधित गांधारीच्या भूमिकेत आहेत. यावर ग्राहकांनीदेखील न्याय हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक तर आहेच. परंतु, संबंधित प्रशासनाचा कानाडोळा ग्राहकांच्या सोयी-सुविधांच्या हक्कावर गदा आणत आहे.

- प्रतिक्रिया ...

तालुक्याच्या शेवटच्या गावातून चाळीस किलोमीटर अंतरावरून वडूज शहरात कामानिमित्त यावे लागते. यावेळी वडूज शहरात दिवसभर थांबून कामकाजाचा निपटारा करतो. यादरम्यान नाष्टा किंवा जेवण करण्यासाठी गेलो असता, शौचालय आणि अन्य सुविधांचा अभाव जाणवतो.

- मारुती पवार, ग्राहक

फोटो ओळ .. वडूज शहराचा गुगल मॅप फोटो ( शेखर जाधव )

___