शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसारखे माझे काका मुख्यमंत्री नव्हते--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:28 IST

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य होतो म्हणूनच मिळेल तिथे प्रवेश घेतला‘मी गरीब घरातील होतो. आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते.

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते,’ अशी कोपरखळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने साताºयात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी मंत्री तावडे यांच्यावर टीका केली होती. ‘एका बोगस शिक्षण संस्थेची डीग्री घेऊन मंत्री तावडे शिकले. अशा लोकांकडे राज्याचे शिक्षण खाते आहे,’ असे ते म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता तावडे म्हणाले, ‘मी गरीब घरातील होतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते. माझे काका काय मुख्यमंत्री नव्हते. तसे असते तर मी नामांकित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकलो असतो. अजित पवार यांनी माझ्यावर अशी टीका करून गरिबीचीच थट्टा केली आहे.’ ज्ञानेश्वरी विद्यापीठात आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. बोगस डीग्रीचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.’

दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘दिव्यांग मुले सामान्य मुलांप्रमाणेच शिकावीत, असा शासनाचा हेतू आहे. इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वैधता तपासणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अनेक शाळा वर्षानुवर्षे वातावरणाचा परिणाम झेलत उभ्या आहेत. अशा शाळांची दुरुस्ती अथवा त्या नव्याने बांधण्यात येतील. मात्र, अवघ्या एक-दोन वर्षांत कमी प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या शाळांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा शाळा उभारणाºयांवर कारवाईचा इशाराही मंत्री तावडे यांनी दिला.ज्ञानरचनावादाचे कौतुकसाताºयातून सुरू झालेला ज्ञानरचनवादाचा प्रकल्प राज्याने स्वीकारला आहे. याची गुणवत्ता सर्र्वांनाच पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.