शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

अजित पवारांसारखे माझे काका मुख्यमंत्री नव्हते--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:28 IST

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य होतो म्हणूनच मिळेल तिथे प्रवेश घेतला‘मी गरीब घरातील होतो. आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते.

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते,’ अशी कोपरखळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने साताºयात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी मंत्री तावडे यांच्यावर टीका केली होती. ‘एका बोगस शिक्षण संस्थेची डीग्री घेऊन मंत्री तावडे शिकले. अशा लोकांकडे राज्याचे शिक्षण खाते आहे,’ असे ते म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता तावडे म्हणाले, ‘मी गरीब घरातील होतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते. माझे काका काय मुख्यमंत्री नव्हते. तसे असते तर मी नामांकित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकलो असतो. अजित पवार यांनी माझ्यावर अशी टीका करून गरिबीचीच थट्टा केली आहे.’ ज्ञानेश्वरी विद्यापीठात आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. बोगस डीग्रीचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.’

दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘दिव्यांग मुले सामान्य मुलांप्रमाणेच शिकावीत, असा शासनाचा हेतू आहे. इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वैधता तपासणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अनेक शाळा वर्षानुवर्षे वातावरणाचा परिणाम झेलत उभ्या आहेत. अशा शाळांची दुरुस्ती अथवा त्या नव्याने बांधण्यात येतील. मात्र, अवघ्या एक-दोन वर्षांत कमी प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या शाळांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा शाळा उभारणाºयांवर कारवाईचा इशाराही मंत्री तावडे यांनी दिला.ज्ञानरचनावादाचे कौतुकसाताºयातून सुरू झालेला ज्ञानरचनवादाचा प्रकल्प राज्याने स्वीकारला आहे. याची गुणवत्ता सर्र्वांनाच पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.