शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

अजित पवारांसारखे माझे काका मुख्यमंत्री नव्हते--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:28 IST

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य होतो म्हणूनच मिळेल तिथे प्रवेश घेतला‘मी गरीब घरातील होतो. आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते.

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते,’ अशी कोपरखळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने साताºयात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी मंत्री तावडे यांच्यावर टीका केली होती. ‘एका बोगस शिक्षण संस्थेची डीग्री घेऊन मंत्री तावडे शिकले. अशा लोकांकडे राज्याचे शिक्षण खाते आहे,’ असे ते म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता तावडे म्हणाले, ‘मी गरीब घरातील होतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते. माझे काका काय मुख्यमंत्री नव्हते. तसे असते तर मी नामांकित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकलो असतो. अजित पवार यांनी माझ्यावर अशी टीका करून गरिबीचीच थट्टा केली आहे.’ ज्ञानेश्वरी विद्यापीठात आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. बोगस डीग्रीचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.’

दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘दिव्यांग मुले सामान्य मुलांप्रमाणेच शिकावीत, असा शासनाचा हेतू आहे. इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वैधता तपासणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अनेक शाळा वर्षानुवर्षे वातावरणाचा परिणाम झेलत उभ्या आहेत. अशा शाळांची दुरुस्ती अथवा त्या नव्याने बांधण्यात येतील. मात्र, अवघ्या एक-दोन वर्षांत कमी प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या शाळांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा शाळा उभारणाºयांवर कारवाईचा इशाराही मंत्री तावडे यांनी दिला.ज्ञानरचनावादाचे कौतुकसाताºयातून सुरू झालेला ज्ञानरचनवादाचा प्रकल्प राज्याने स्वीकारला आहे. याची गुणवत्ता सर्र्वांनाच पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.