शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

By admin | Updated: April 9, 2016 00:02 IST

उदयनराजेंचे पत्रक : कारखान्यासाठी सिंचन योजना राबविणारे नाठाळच!

 सातारा : ‘काही नाठाळांना शेतकरी हितापेक्षा स्वहिताचीच काळजी असते, म्हणूनच ते आपल्या कुठल्यातरी कारखान्यासाठी सिंचन योजना राबवितात आणि आपला स्वार्थी हेतू साध्य झाल्यावर अशा योजना परवडत नाहीत म्हणून अपूर्ण ठेवण्याची काळजी घेतात. या पार्श्वभूमीवर उरमोडी धरणाचा दगड लावण्यापासून सातत्याने प्रयत्न केले,’ अशी भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सुमारे १० किलोमीटर झालेल्या कामातील पाटाद्वारे पाणी सोडण्याच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, उरमोडी धरणाच्या बाबतीतही धरसोडवृत्ती त्यावेळी जागृत होती. धरणाची एक वेळा नव्हे, तर तब्बल तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु काम मात्र काडीचेही सुरू केले गेले नव्हते. मी त्यावेळी समाजकारणाबरोबरच राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. म्हणूनच तीनवेळा भूमिपूजन आणि गाजावाजा करून केलेली कामे सुरू का होत नाहीत, याचेच मला दु:खद आश्चर्य वाटत आहे. नंतर युती शासन आले, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहिले, धरणाकरिता मोठा निधी कृष्णा खोऱ्याचे कर्जरोखे काढून उभारण्यात आला. त्यावेळी आधी धरण आणि मग पुनर्वसन अशी मानसिकता तत्कालीन राज्यकर्त्यांची होती, त्यावर माझी पुनर्वसन आणि धरण दोन्ही एकाच वेळी ही मात्रा लागू पडली. एका रात्रीत ६ कोटी ९६ लाखांचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून वाटप ही केला, अनेक बैठका घेऊन दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे महत्त्वाचे कार्य तुमच्या त्यागामुळे होणार आहे, असे वारंवार पटवून देऊन धरणाच्या कामाचा श्रीगणेशा त्यावेळी करण्यात आला. पुनर्वसन निधी त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात तातडीने मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला, असा निर्णय यापूर्वी घेतला गेला नव्हता. पुढील तीन-चार वर्षांत जवळजवळ ८० टक्केधरण बांधून पूर्ण झाले आणि तत्कालीन युतीची सत्ता गेली व पुढे १० वर्षांत पुन्हा एक फूटभर सुद्धा बांधकाम झाले नाही.नंतर २००९ मध्ये मी संसदेत लोकांचे प्रतिनिधीत्व करू लागलो, आणि पुन्हा २०१०-११ नंतर उरमोडीच्या उर्वरित कामाला ही सुरुवात झाली. धरण झाले, कालव्याची काही कामे झाली, माण-खटावच्या काही भागांत पाणी गेले; परंतु माझी त्यागी जनता धरण उशाशी असूनही उपाशीच होती. पुन्हा कंबर कसली, कालव्यांची कामे का होत नाही, याचा जाब विचारला आणि उरमोडी उजव्या कालव्याचे कालांतराने १० किलोमीटरचे काम पूर्ण होऊन आज अंबवडे बुद्रुक, भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव या सातारा तालुक्यातील ७ गावांतील १९५० एकर क्षेत्राकरिता पाणी मिळण्याची सोय झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले. (प्रतिनिधी)अजून ७ हजार एकर बाकी...७ गावांना तरी उरमोडीचे आज पाणी मिळत आहे, अजूनही ७००० एकराला पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. माण, खटाव व सातारा तालुक्यांत मिळून २७,७५० क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे. उरमोडी धरणासाठी अनेकांचे योगदान आहेच; परंतु सर्वांत जास्त योगदान येथील १४ गावांतील विस्थापितांचे आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.