शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

By admin | Updated: April 9, 2016 00:02 IST

उदयनराजेंचे पत्रक : कारखान्यासाठी सिंचन योजना राबविणारे नाठाळच!

 सातारा : ‘काही नाठाळांना शेतकरी हितापेक्षा स्वहिताचीच काळजी असते, म्हणूनच ते आपल्या कुठल्यातरी कारखान्यासाठी सिंचन योजना राबवितात आणि आपला स्वार्थी हेतू साध्य झाल्यावर अशा योजना परवडत नाहीत म्हणून अपूर्ण ठेवण्याची काळजी घेतात. या पार्श्वभूमीवर उरमोडी धरणाचा दगड लावण्यापासून सातत्याने प्रयत्न केले,’ अशी भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सुमारे १० किलोमीटर झालेल्या कामातील पाटाद्वारे पाणी सोडण्याच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, उरमोडी धरणाच्या बाबतीतही धरसोडवृत्ती त्यावेळी जागृत होती. धरणाची एक वेळा नव्हे, तर तब्बल तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु काम मात्र काडीचेही सुरू केले गेले नव्हते. मी त्यावेळी समाजकारणाबरोबरच राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. म्हणूनच तीनवेळा भूमिपूजन आणि गाजावाजा करून केलेली कामे सुरू का होत नाहीत, याचेच मला दु:खद आश्चर्य वाटत आहे. नंतर युती शासन आले, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहिले, धरणाकरिता मोठा निधी कृष्णा खोऱ्याचे कर्जरोखे काढून उभारण्यात आला. त्यावेळी आधी धरण आणि मग पुनर्वसन अशी मानसिकता तत्कालीन राज्यकर्त्यांची होती, त्यावर माझी पुनर्वसन आणि धरण दोन्ही एकाच वेळी ही मात्रा लागू पडली. एका रात्रीत ६ कोटी ९६ लाखांचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून वाटप ही केला, अनेक बैठका घेऊन दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे महत्त्वाचे कार्य तुमच्या त्यागामुळे होणार आहे, असे वारंवार पटवून देऊन धरणाच्या कामाचा श्रीगणेशा त्यावेळी करण्यात आला. पुनर्वसन निधी त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात तातडीने मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला, असा निर्णय यापूर्वी घेतला गेला नव्हता. पुढील तीन-चार वर्षांत जवळजवळ ८० टक्केधरण बांधून पूर्ण झाले आणि तत्कालीन युतीची सत्ता गेली व पुढे १० वर्षांत पुन्हा एक फूटभर सुद्धा बांधकाम झाले नाही.नंतर २००९ मध्ये मी संसदेत लोकांचे प्रतिनिधीत्व करू लागलो, आणि पुन्हा २०१०-११ नंतर उरमोडीच्या उर्वरित कामाला ही सुरुवात झाली. धरण झाले, कालव्याची काही कामे झाली, माण-खटावच्या काही भागांत पाणी गेले; परंतु माझी त्यागी जनता धरण उशाशी असूनही उपाशीच होती. पुन्हा कंबर कसली, कालव्यांची कामे का होत नाही, याचा जाब विचारला आणि उरमोडी उजव्या कालव्याचे कालांतराने १० किलोमीटरचे काम पूर्ण होऊन आज अंबवडे बुद्रुक, भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव या सातारा तालुक्यातील ७ गावांतील १९५० एकर क्षेत्राकरिता पाणी मिळण्याची सोय झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले. (प्रतिनिधी)अजून ७ हजार एकर बाकी...७ गावांना तरी उरमोडीचे आज पाणी मिळत आहे, अजूनही ७००० एकराला पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. माण, खटाव व सातारा तालुक्यांत मिळून २७,७५० क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे. उरमोडी धरणासाठी अनेकांचे योगदान आहेच; परंतु सर्वांत जास्त योगदान येथील १४ गावांतील विस्थापितांचे आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.