शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

By admin | Updated: April 9, 2016 00:02 IST

उदयनराजेंचे पत्रक : कारखान्यासाठी सिंचन योजना राबविणारे नाठाळच!

 सातारा : ‘काही नाठाळांना शेतकरी हितापेक्षा स्वहिताचीच काळजी असते, म्हणूनच ते आपल्या कुठल्यातरी कारखान्यासाठी सिंचन योजना राबवितात आणि आपला स्वार्थी हेतू साध्य झाल्यावर अशा योजना परवडत नाहीत म्हणून अपूर्ण ठेवण्याची काळजी घेतात. या पार्श्वभूमीवर उरमोडी धरणाचा दगड लावण्यापासून सातत्याने प्रयत्न केले,’ अशी भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सुमारे १० किलोमीटर झालेल्या कामातील पाटाद्वारे पाणी सोडण्याच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, उरमोडी धरणाच्या बाबतीतही धरसोडवृत्ती त्यावेळी जागृत होती. धरणाची एक वेळा नव्हे, तर तब्बल तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु काम मात्र काडीचेही सुरू केले गेले नव्हते. मी त्यावेळी समाजकारणाबरोबरच राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. म्हणूनच तीनवेळा भूमिपूजन आणि गाजावाजा करून केलेली कामे सुरू का होत नाहीत, याचेच मला दु:खद आश्चर्य वाटत आहे. नंतर युती शासन आले, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहिले, धरणाकरिता मोठा निधी कृष्णा खोऱ्याचे कर्जरोखे काढून उभारण्यात आला. त्यावेळी आधी धरण आणि मग पुनर्वसन अशी मानसिकता तत्कालीन राज्यकर्त्यांची होती, त्यावर माझी पुनर्वसन आणि धरण दोन्ही एकाच वेळी ही मात्रा लागू पडली. एका रात्रीत ६ कोटी ९६ लाखांचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून वाटप ही केला, अनेक बैठका घेऊन दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे महत्त्वाचे कार्य तुमच्या त्यागामुळे होणार आहे, असे वारंवार पटवून देऊन धरणाच्या कामाचा श्रीगणेशा त्यावेळी करण्यात आला. पुनर्वसन निधी त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात तातडीने मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला, असा निर्णय यापूर्वी घेतला गेला नव्हता. पुढील तीन-चार वर्षांत जवळजवळ ८० टक्केधरण बांधून पूर्ण झाले आणि तत्कालीन युतीची सत्ता गेली व पुढे १० वर्षांत पुन्हा एक फूटभर सुद्धा बांधकाम झाले नाही.नंतर २००९ मध्ये मी संसदेत लोकांचे प्रतिनिधीत्व करू लागलो, आणि पुन्हा २०१०-११ नंतर उरमोडीच्या उर्वरित कामाला ही सुरुवात झाली. धरण झाले, कालव्याची काही कामे झाली, माण-खटावच्या काही भागांत पाणी गेले; परंतु माझी त्यागी जनता धरण उशाशी असूनही उपाशीच होती. पुन्हा कंबर कसली, कालव्यांची कामे का होत नाही, याचा जाब विचारला आणि उरमोडी उजव्या कालव्याचे कालांतराने १० किलोमीटरचे काम पूर्ण होऊन आज अंबवडे बुद्रुक, भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव या सातारा तालुक्यातील ७ गावांतील १९५० एकर क्षेत्राकरिता पाणी मिळण्याची सोय झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले. (प्रतिनिधी)अजून ७ हजार एकर बाकी...७ गावांना तरी उरमोडीचे आज पाणी मिळत आहे, अजूनही ७००० एकराला पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. माण, खटाव व सातारा तालुक्यांत मिळून २७,७५० क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे. उरमोडी धरणासाठी अनेकांचे योगदान आहेच; परंतु सर्वांत जास्त योगदान येथील १४ गावांतील विस्थापितांचे आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.