शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पर्यावरण संतुलनासाठीच ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:06 IST

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. फलटण तालुक्यातही ...

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. फलटण तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अस्मिता गावडे यांनी दिली.

वसुंधरा अभियानात फलटण तालुक्यातील विडणी गावाने सहभाग घेतलेला आहे. त्याच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सहायक गटविकास अधिकारी गुळवे, ग्रामविकास अधिकारी दिलीप ननावरे, सचिव सहदेव शेंडे, सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच नवनाथ पवार, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, पोलीस पाटील धनाजी नेरकर, प्राचार्य पी. टी. अभंग यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कामे केली जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार चांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार आहे. १५०० गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुण असे मिळून १५०० गुण या अभियानासाठी आहेत, अशी माहिती डॉ. अमिता गावडे यांनी दिली.

जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून हे अभियान सुरू झालेले आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात केली जाणार आहे.

फोटो ०४फलटण

वसुंधरा अभियानात विडणी गावाचा सहभाग झाल्यानंतर माझी वसुंधराची प्रतिज्ञा घेताना फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, डॉ. बाळासाहेब शेंडे व मान्यवर उपस्थित होते.