शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

हेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 11:37 IST

Prithviraj Chavan Satara : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

ठळक मुद्देहेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण राणेंचे वक्तव्य संस्कृतीला काळिमा फासणारे

सातारा : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ह्यकेंद्रातील भाजप सरकारने सांविधानिक संस्थानं ताब्यात घेऊन लोकशाहीला मारक निर्णय घेतले आहेत. या माध्यमातू्न हुकुमशाही चालविली आहे. इस्त्राईलकडून हेरगिरीचे पॅगेसेस सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहे. हे स्वाफ्टवेअर केवळ सरकारला विकत असल्याचे संबंधित कंपनीने स्पष्ट केले तरी केंद्र सरकार हे मान्य करायला तयार नाही. भारतातील तब्बल १००० व्यक्तींच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर घुसवण्यात आले आहे. त्यातील वरिष्ठ पत्रकार, सरकारी अधिकारी, न्यायाधीश अशा ३०० जणांचे मोबाईल तपासले गेले आहेत. याबाबत सरकारने स्पष्टीकरण केले पाहिजे.ह्णकेंद्र सरकारने हे नियमानं व परवानगी घेऊन केलेले नाही. नागरिकांवर पाळत ठेवण्याची ही पध्दत निषेधार्ह असून या बाबीची सर्वपक्षीय समिती नेमून अथवा न्यायाधिशांमार्फत स्वतंत्र तपास होणे आवश्यक आहे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.राणेंचे वक्तव्य संस्कृतीला काळिमा फासणारेकेंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. चव्हाण यांनी समाचार घेतला. ह्यराजकीय जीवनामध्ये सभ्यता पाळावी लागते. राजकारणात कोणीही कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. टीका करायची तर विचारानं करावी, मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा वापरणे म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान आहे. तसेच ही भाषा महाराष्ट्राला संस्कृतीलाच काळिमा फासणारी आहे.ह्ण

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसSatara areaसातारा परिसरNarayan Raneनारायण राणे