शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

By admin | Updated: June 28, 2017 23:16 IST

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीमुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये अंसतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे रंगेहाथ पकडलेल्या नगराध्यक्षांनी नितीमत्ता बाळगून राजीनामा द्यावा, अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राजीनाम्यासाठी शुक्रवार, दि. ३० रोजी नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर मुंडण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.अनिल सावंत म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ही न्यायप्रविष्ट बाब असली तरीही सुसंस्कृत वाई शहरात चुकीच्या गोष्टींना पाठिंबा मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांचा पोलिस बंदोबस्तात कारभार चालविण्याचा प्रकार म्हणजे पदाचा अपमान आहे. मोर्चा काढून, वाई शहर बंद ठेवून, आपला राग व्यक्त करून सुध्दा, नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची इच्छा नाही. त्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारी वाईकर नागरिक पालिकेसमोर मुंडण करून निषेध व्यक्त करणार आहेत.द्रविड हायस्कूलच्या मुख्याद्यापकांना गुरुवारी शिंदे यांच्या निलंबनासाठी माजी विद्यार्थी लेखी निवेदन देणार असल्याचा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला. यावेळी अ‍ॅड.श्रीकांत चव्हाण, भारत खामकर, चरण गायकवाड, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, दीपक हजारे, संदीप डोंगरे, अजित शिंदे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यानी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व त्यांच्या पतींवर टिकेची झोड उठवत भाजप व काँग्रेसवरही निशाणा साधला. चौदा हजारांची लाच घेताना सापडलेल्या नगराध्यक्षांनी वास्तविक लगेच दुसऱ्या दिवशी केलेल्या कृत्याविषयी वाईकरांची माफी मागून राजीनामा देणे आवश्यक असतानाही त्या " तो मी नव्हेच " अशा पध्दतीने वावरत पोलिस बंदोबस्तात पालिकेत हजार होऊन मी निर्दोष असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप होत आहे. स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित समजाणाऱ्या नगराध्यक्ष व त्यांच्या पतीने सांस्कृतिक वाईनगरीचे नाक कापले असल्याची संतप्त भावना नागरिकांची असल्याचा दावा तीर्थक्षेत्र आघाडीने केला आहे. राजकारण असो की समाजकारण, वाईने नेहमीच महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. ऐतिहासिक, अध्यात्मिक व विद्वत्ता हे वाईचं वैभव आहे.