शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

By admin | Updated: June 28, 2017 23:16 IST

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीमुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये अंसतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे रंगेहाथ पकडलेल्या नगराध्यक्षांनी नितीमत्ता बाळगून राजीनामा द्यावा, अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राजीनाम्यासाठी शुक्रवार, दि. ३० रोजी नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर मुंडण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.अनिल सावंत म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ही न्यायप्रविष्ट बाब असली तरीही सुसंस्कृत वाई शहरात चुकीच्या गोष्टींना पाठिंबा मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांचा पोलिस बंदोबस्तात कारभार चालविण्याचा प्रकार म्हणजे पदाचा अपमान आहे. मोर्चा काढून, वाई शहर बंद ठेवून, आपला राग व्यक्त करून सुध्दा, नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची इच्छा नाही. त्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारी वाईकर नागरिक पालिकेसमोर मुंडण करून निषेध व्यक्त करणार आहेत.द्रविड हायस्कूलच्या मुख्याद्यापकांना गुरुवारी शिंदे यांच्या निलंबनासाठी माजी विद्यार्थी लेखी निवेदन देणार असल्याचा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला. यावेळी अ‍ॅड.श्रीकांत चव्हाण, भारत खामकर, चरण गायकवाड, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, दीपक हजारे, संदीप डोंगरे, अजित शिंदे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यानी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व त्यांच्या पतींवर टिकेची झोड उठवत भाजप व काँग्रेसवरही निशाणा साधला. चौदा हजारांची लाच घेताना सापडलेल्या नगराध्यक्षांनी वास्तविक लगेच दुसऱ्या दिवशी केलेल्या कृत्याविषयी वाईकरांची माफी मागून राजीनामा देणे आवश्यक असतानाही त्या " तो मी नव्हेच " अशा पध्दतीने वावरत पोलिस बंदोबस्तात पालिकेत हजार होऊन मी निर्दोष असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप होत आहे. स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित समजाणाऱ्या नगराध्यक्ष व त्यांच्या पतीने सांस्कृतिक वाईनगरीचे नाक कापले असल्याची संतप्त भावना नागरिकांची असल्याचा दावा तीर्थक्षेत्र आघाडीने केला आहे. राजकारण असो की समाजकारण, वाईने नेहमीच महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. ऐतिहासिक, अध्यात्मिक व विद्वत्ता हे वाईचं वैभव आहे.