शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतदारांबाबत पालिकेचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST

नितीन काशिद म्हणाले, मलकापूर ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ मध्ये झाली. तिचे क्षेत्र गावठाणपुरते मर्यादित होते. महामार्गाकडील पूर्व, पश्चिम भाग त्रिशंकू ...

नितीन काशिद म्हणाले, मलकापूर ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ मध्ये झाली. तिचे क्षेत्र गावठाणपुरते मर्यादित होते. महामार्गाकडील पूर्व, पश्चिम भाग त्रिशंकू असून तो कऱ्हाड शहराचा तळभाग शनिवार पेठ म्हणून ओळखला जात होता. या भागावर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा अंमल नव्हता. ग्रामपंचायतीचा विस्तार होत महामार्ग पूर्व व पश्चिमेकडील भाग आगशिवनगर व शास्त्रीनगर १९७५ ते ८० या काळात ग्रामपंचायतीत समाविष्ट झाला. २००३ साली महामार्गाच्या चौपदरीकरणात जमिनी गेल्या. त्यावेळी प्राधिकरणाने महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूला २२.५ मीटरची नियमन रेषा निश्चित करून दिली आहे. त्यानुसार बांधकामे केलेली आहेत. पालिकेच्या नोटिसीमधील अनेक बांधकामे तत्कालीन ग्रामपंचायतीने, नगरपंचयतीने, विधिग्राह्य मानलेली आहेत. त्यावेळच्या तरतुदीनुसार केलेली असून तशा ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी आहेत. त्या बांधकामांचे करनिर्धारण होत आलेले आहे. त्यानुसार मालमत्ताधारक ग्रामपंचायतीपासून घरपट्टी देत आहेत. व्यवसायासाठी लागणारे ना हरकत दाखले व इतर परवानग्या वेळोवेळी घेतलेल्या आहेत. तसेच असेसमेंट लिस्टवर अनधिकृत बांधकाम म्हणून उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत काळातील प्रॉपर्टी, इमारती, व्यवसाय पालिकेकडे निहीत झाल्यामुळे त्या अनधिकृत ठरवण्याचा प्रश्नच येत नाही.

मालमत्ताधारकांस काढलेल्या नोटिसा बेकायदेशीर असून त्या लागू होत नाहीत. त्यामुळे शास्ती भरण्याचा प्रश्नच येत नाही. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या चुकीच्या व सदोष अहवालवर मालमत्ताधारकांस पहिल्या नोटिसा काढल्या होत्या. याबाबत मालमत्ताधारकांनी लेखी म्हणणे,सविस्तर खुलासा व पुरावे देऊन मांडले आहे. त्यामुळे नव्याने काढलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अशी मागणी संघटनेने लेखी पत्रकाद्वारे नगराध्यक्षा निलम येडगे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्याकडे केली आहे. त्या पत्रावर आय्याजभाई बागवान, गुलाबराव पाटील, अखिलेश चतुर्वेदी, रमेश पाटील, सुरेश पवार, इरफान मोमीन, प्रताप घाडगे, नईम शेख यांच्या सह्या आहेत.

- चौकट

कर्मचाऱ्यांना अपुरे ज्ञान

२०१८ च्या राजपत्रातील अधिनियम ५३ नुसार शास्ती लावण्याचे अधिकार राज्य शासनाकडे गेले आहेत. त्यानुसार सदर शास्ती अधिनियम ४ जानेवारी २००८ पासून अंमलात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३ जानेवारी २००८ आधीच्या इमारती, बांधकाम, व व्यवसायावर शास्ती लागू होणार नाही. नोटीसमध्ये दर्शविलेले कलम २८९ अधिनियमात वेळोवेळी दुरुस्त्या झालेल्याची माहिती कर्मचाऱ्यांना नाही, हे काशिद यांनी स्पष्ट केले आहे.