शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

पालिकेच्या कृपेने पादचारी रस्त्यावर !

By admin | Updated: April 16, 2017 22:48 IST

पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात : गाडे रस्त्यावर तर टेबल अन् खुर्च्या पादचारी मार्गावर; पालिकेकडून दुर्लक्ष

कऱ्हाड : शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्या ऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला. मात्र, आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि विक्रेतेच जास्त फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. पालिका अन् पोलिस प्रशासनाच्या नियमांना डावलून हे विक्रेते बिनधास्तपणे आपला व्यवसाय फूटपाथवर करत आहे. त्यामुळे आता पालिकेच्याच कृपेने पादचारी रस्त्यावर आले आहेत. शहरातील नागरिकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गावर आता पुन्हा विके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे. याचा सध्या प्रवासी अन् नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील दत्त चौक ते कृष्णा नाका सुमारे एक किलोमीटरच्या मार्गावरील रस्त्याकडेला सुमारे १९९५ च्या कालावधीत बांधण्यात आलेल्या पादचारी मार्गावर प्रवाशांची सारखी वर्दळ असते. त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विक्रेते व दुकानमालकांकडून आकर्षक पद्धतीने तयार केलेले जाहिरात फलक फूटपाथवरच ठेवत आहेत. तर दुसरीकडे बसस्थानकाबाहेरील पादचारी मार्ग तर रिक्षा व्यावसायिक व चायनीज व वडापाव विक्रेत्यांनी आपल्या मालकीचा केला असल्यासारखे दिसून येत आहे. पालिकेचे नियमित कर भरत असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही या व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही. शहरातील सौंदर्यात भर घालणाऱ्या दत्त चौकापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक, बसस्थानक परिसरापासून ते विजय दिवस चौक, टाऊन हॉलपासून ते उपजिल्हा रुग्णालय चौक तसेच उपजिल्हा रुग्णालयापासून ते कृष्णा नाका चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील कर्मवीर चौक या ठिकाणी दोन्ही बाजूस आकर्षक पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यापैकी बसस्थानक परिसरात सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच पादचारी मार्ग बांधून त्यावर आकर्षक पेव्हिंग ब्लॉकही बसविले जाणार आहे. सध्या बसस्थानक परिसरात तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याने ही पादचारी मार्ग नक्की प्रवासी, पादचाऱ्यांसाठी की रिक्षा वडाप, फळविके्रते, व्यावसायिकांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पादचारी मार्गाचा नागरिकांऐवजी दुकानदार, वडापाव, चायनीज, चहा विक्रेते, फळविके्रते यांच्याकडूनच जास्तच वापर केला जाऊ लागल्याने या विक्रेत्यांवर पालिका व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह पादचाऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)