शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबईकर करतायत गावचं राजकारण!

By admin | Updated: July 28, 2015 23:25 IST

गावोगावी निवडणुकांची रणधुमाळी : सुटी घेऊन गावातच मुक्काम; हालचालींवर बारीक लक्ष

सातारा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावांत निवडणूक हाच विषय चर्चेला जात आहे. मात्र, या सर्वांवर नजर आहे ती मुंबईकरांची. कामानिमित्त स्थायिक झालेले मुंबईकर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुटी घेऊन गावी आले आहेत. हंगामी राजकारण करून मुंबईकर आख्खं गाव ढवळून काढत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.जिल्ह्यात ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटून गेल्यामुळे आता एकमेकांविरोधातल्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शक्यतो छुपा प्रचार सुरू असतो. ग्रामीण भागामध्ये एकमेकांचे नातेवाईक, मित्र आणि भावकी यामध्ये मतांची गणिते ठरलेली असतात. स्थानिक पातळीवर एकमेकांचे मतभेद असल्यामुळे निवडणुकीमध्ये अशी लोकं एकमेकांना पाण्यात पाहतात. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा ‘हार’मनाला चटका लावून जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते, ती मुंबईकरांची. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईकरांची गावच्या राजकारणाकडे विशेष नजर आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच मुंबईकर सुटी घेऊन गावी खास प्रचारासाठी आले आहेत. जुन्या जाणत्या लोकांना भेटून आपलं गाव कसे मागे आहे, कोणामुळे आहे, आपण सुधारलं पाहिजे, अशी शाब्दिक फेकाफेकी करून आपल्या पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईकरांच्या शब्दाला मान देऊन ‘हो.. रे तू सांगतोय त्यालाच आपण मतदान करणार,’असेही त्याला तात्पुरते आश्वासन दिले जात आहे. आळीतलं आणि भावकीतील मतदान किती आहे, याचे आडाखे मुंबईकर बांधत असले तरी गावची लोकं ताकास तूर कळून देत नाहीत. जेवणावळी घालून गावकऱ्यांना खूश केले तरी मतदान त्यालाच होईल, हेही सांगता येत नाही. तरीही मुंबईकरांचा आटापिटा सुरूच आहे. हंगामी राजकारण करून गावचा विकास करायला आलेल्या मुंबईकरांना किती मनावर घ्यायचं, हे गावकरीच ठरवतोय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांची ‘हंगामी राजकारण’मध्ये होत असलेली एन्ट्री भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)