शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर करतायत गावचं राजकारण!

By admin | Updated: July 28, 2015 23:25 IST

गावोगावी निवडणुकांची रणधुमाळी : सुटी घेऊन गावातच मुक्काम; हालचालींवर बारीक लक्ष

सातारा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावांत निवडणूक हाच विषय चर्चेला जात आहे. मात्र, या सर्वांवर नजर आहे ती मुंबईकरांची. कामानिमित्त स्थायिक झालेले मुंबईकर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुटी घेऊन गावी आले आहेत. हंगामी राजकारण करून मुंबईकर आख्खं गाव ढवळून काढत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.जिल्ह्यात ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटून गेल्यामुळे आता एकमेकांविरोधातल्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शक्यतो छुपा प्रचार सुरू असतो. ग्रामीण भागामध्ये एकमेकांचे नातेवाईक, मित्र आणि भावकी यामध्ये मतांची गणिते ठरलेली असतात. स्थानिक पातळीवर एकमेकांचे मतभेद असल्यामुळे निवडणुकीमध्ये अशी लोकं एकमेकांना पाण्यात पाहतात. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा ‘हार’मनाला चटका लावून जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते, ती मुंबईकरांची. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईकरांची गावच्या राजकारणाकडे विशेष नजर आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच मुंबईकर सुटी घेऊन गावी खास प्रचारासाठी आले आहेत. जुन्या जाणत्या लोकांना भेटून आपलं गाव कसे मागे आहे, कोणामुळे आहे, आपण सुधारलं पाहिजे, अशी शाब्दिक फेकाफेकी करून आपल्या पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईकरांच्या शब्दाला मान देऊन ‘हो.. रे तू सांगतोय त्यालाच आपण मतदान करणार,’असेही त्याला तात्पुरते आश्वासन दिले जात आहे. आळीतलं आणि भावकीतील मतदान किती आहे, याचे आडाखे मुंबईकर बांधत असले तरी गावची लोकं ताकास तूर कळून देत नाहीत. जेवणावळी घालून गावकऱ्यांना खूश केले तरी मतदान त्यालाच होईल, हेही सांगता येत नाही. तरीही मुंबईकरांचा आटापिटा सुरूच आहे. हंगामी राजकारण करून गावचा विकास करायला आलेल्या मुंबईकरांना किती मनावर घ्यायचं, हे गावकरीच ठरवतोय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांची ‘हंगामी राजकारण’मध्ये होत असलेली एन्ट्री भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)