शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

मुंबईकर करतायत गावचं राजकारण!

By admin | Updated: July 28, 2015 23:25 IST

गावोगावी निवडणुकांची रणधुमाळी : सुटी घेऊन गावातच मुक्काम; हालचालींवर बारीक लक्ष

सातारा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावांत निवडणूक हाच विषय चर्चेला जात आहे. मात्र, या सर्वांवर नजर आहे ती मुंबईकरांची. कामानिमित्त स्थायिक झालेले मुंबईकर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुटी घेऊन गावी आले आहेत. हंगामी राजकारण करून मुंबईकर आख्खं गाव ढवळून काढत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.जिल्ह्यात ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटून गेल्यामुळे आता एकमेकांविरोधातल्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शक्यतो छुपा प्रचार सुरू असतो. ग्रामीण भागामध्ये एकमेकांचे नातेवाईक, मित्र आणि भावकी यामध्ये मतांची गणिते ठरलेली असतात. स्थानिक पातळीवर एकमेकांचे मतभेद असल्यामुळे निवडणुकीमध्ये अशी लोकं एकमेकांना पाण्यात पाहतात. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा ‘हार’मनाला चटका लावून जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते, ती मुंबईकरांची. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईकरांची गावच्या राजकारणाकडे विशेष नजर आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच मुंबईकर सुटी घेऊन गावी खास प्रचारासाठी आले आहेत. जुन्या जाणत्या लोकांना भेटून आपलं गाव कसे मागे आहे, कोणामुळे आहे, आपण सुधारलं पाहिजे, अशी शाब्दिक फेकाफेकी करून आपल्या पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईकरांच्या शब्दाला मान देऊन ‘हो.. रे तू सांगतोय त्यालाच आपण मतदान करणार,’असेही त्याला तात्पुरते आश्वासन दिले जात आहे. आळीतलं आणि भावकीतील मतदान किती आहे, याचे आडाखे मुंबईकर बांधत असले तरी गावची लोकं ताकास तूर कळून देत नाहीत. जेवणावळी घालून गावकऱ्यांना खूश केले तरी मतदान त्यालाच होईल, हेही सांगता येत नाही. तरीही मुंबईकरांचा आटापिटा सुरूच आहे. हंगामी राजकारण करून गावचा विकास करायला आलेल्या मुंबईकरांना किती मनावर घ्यायचं, हे गावकरीच ठरवतोय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांची ‘हंगामी राजकारण’मध्ये होत असलेली एन्ट्री भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)