शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता ...

सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर नोकरदार आणि चाकरमानी पुन्हा आपल्या गावी येऊ लागले आहेत. त्यातच लॉकडाऊनची शक्यता असल्याने मोलमजुरी करणारे लोक आणखीनच धास्तावले आहेत. गतवर्षीसारखी आपली दयनीय अवस्था होऊ नये म्हणून अगोदरच लोक भीतीने गावी येऊ लागले आहेत. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या येणाऱ्या लक्झरी बस, एस.टी. महामंडळ आणि खासगी गाड्या हाऊसफुल्ल होऊन येत आहेत. मात्र या गाड्यांची तपासणी पूर्वीसारखी होत नसून पोलीस वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. गाडीमध्ये सोशल डिस्टंसिंग तर नाहीच; शिवाय अनेक प्रवासी तोंडाला मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रवाशांवर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई मात्र करण्यात येत आहे. सातारा बसस्थानकामध्ये तर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. एस.टी.मध्ये बसण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः चढाओढ होत आहे. तुडुंब गर्दी होत असल्याने कोरोना कसा आटोक्यात येणार, असा प्रश्न ही गर्दी पाहून अनेकांना पडतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण करणे गरजेचे असल्याचे मतही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

.............................

चौकट : बाहेरगावाहून येणाऱ्याची चाचणीच नाही

गतवर्षीसारखी बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र यंदा अशी चाचणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनाचाचणीचे जिल्ह्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिक मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. काही जुजबी उपाययोजना केल्या तर लॉकडाऊनची प्रशासनाला गरज भासणार नाही. त्यामुळे पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची गतवर्षीसारखी चाचणी करणे आवश्यक आहे किंवा अशा प्रवाशांची यादी तयार करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यास भाग पाडावे तरच कोरोना आटोक्यात येईल.

चौकट : एस.टी. बस

सातारा बसस्थानकामध्ये रोज पाच हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. पुण्याला दर अर्ध्या तासाला बस सुरू आहेत. तसेच मुंबई, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतही बस सुरू आहेत. प्रवाशांची कसलीही चाचणी केली जात नाही. शिवाय अनेकजणांनी तोंडाला मास्कही लावलेला नसतो; त्यामुळे खरे तर या गर्दीच्या ठिकाणी कडक नियम अवलंबणे गरजेचे आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करून बसस्थानकामध्ये विनामास्क दिसल्यास ५०० रुपयांची दंडात्मक पावती केली जावी; तरच या बसस्थानकातील नियमांची जरब बसेल.

चौकट : ट्रॅव्हल्स

मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या पाचशेच्या घरात आहे. रोज रात्री या ट्रॅव्हल्स मुंबईहून सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या वेळी लोक ट्रॅव्हल्स भरून गावी येत होते. हीच परिस्थिती आता सुरू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आत्ताच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ट्रॅव्हल्स तपासणीची जिल्ह्यात कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे नेमक्या किती ट्रॅव्हल्स रोज येतात आणि मुंबई-पुण्याला जातात, याचा आकडा प्रशासनाकडे नाही. त्यांच्याकडे केवळ जुजबी माहिती आहे.

चौकट : रेल्वे

सातारा रेल्वे स्थानकावर साताऱ्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे. हे रेल्वे स्टेशन साताऱ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे फारसे कोणी रेल्वेने प्रवास करीत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर बसस्थानकाएवढी गर्दी पाहायला मिळत नाही. साताऱ्याहून रोज जेमतेम वीस ते पंचवीस प्रवासी रेल्वेने ये-जा करीत असतात. रेल्वे स्टेशनवर विविध प्रकारचे सूचनाफलक लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी कोरोनाचे नियम पाळत असून तोंडाला मास्क लावूनच ते ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट : अशी आहे आकडेवारी

कोरोनाचे एकूण रुग्ण

६५५४२

बरे झालेले रुग्ण

६०२१७

उपचार सुरू असणारे रुग्ण

३४१९

कोरोनाचे एकूण बळी

१९०६