शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता ...

सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर नोकरदार आणि चाकरमानी पुन्हा आपल्या गावी येऊ लागले आहेत. त्यातच लॉकडाऊनची शक्यता असल्याने मोलमजुरी करणारे लोक आणखीनच धास्तावले आहेत. गतवर्षीसारखी आपली दयनीय अवस्था होऊ नये म्हणून अगोदरच लोक भीतीने गावी येऊ लागले आहेत. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या येणाऱ्या लक्झरी बस, एस.टी. महामंडळ आणि खासगी गाड्या हाऊसफुल्ल होऊन येत आहेत. मात्र या गाड्यांची तपासणी पूर्वीसारखी होत नसून पोलीस वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. गाडीमध्ये सोशल डिस्टंसिंग तर नाहीच; शिवाय अनेक प्रवासी तोंडाला मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रवाशांवर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई मात्र करण्यात येत आहे. सातारा बसस्थानकामध्ये तर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. एस.टी.मध्ये बसण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः चढाओढ होत आहे. तुडुंब गर्दी होत असल्याने कोरोना कसा आटोक्यात येणार, असा प्रश्न ही गर्दी पाहून अनेकांना पडतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण करणे गरजेचे असल्याचे मतही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

.............................

चौकट : बाहेरगावाहून येणाऱ्याची चाचणीच नाही

गतवर्षीसारखी बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र यंदा अशी चाचणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनाचाचणीचे जिल्ह्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिक मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. काही जुजबी उपाययोजना केल्या तर लॉकडाऊनची प्रशासनाला गरज भासणार नाही. त्यामुळे पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची गतवर्षीसारखी चाचणी करणे आवश्यक आहे किंवा अशा प्रवाशांची यादी तयार करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यास भाग पाडावे तरच कोरोना आटोक्यात येईल.

चौकट : एस.टी. बस

सातारा बसस्थानकामध्ये रोज पाच हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. पुण्याला दर अर्ध्या तासाला बस सुरू आहेत. तसेच मुंबई, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतही बस सुरू आहेत. प्रवाशांची कसलीही चाचणी केली जात नाही. शिवाय अनेकजणांनी तोंडाला मास्कही लावलेला नसतो; त्यामुळे खरे तर या गर्दीच्या ठिकाणी कडक नियम अवलंबणे गरजेचे आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करून बसस्थानकामध्ये विनामास्क दिसल्यास ५०० रुपयांची दंडात्मक पावती केली जावी; तरच या बसस्थानकातील नियमांची जरब बसेल.

चौकट : ट्रॅव्हल्स

मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या पाचशेच्या घरात आहे. रोज रात्री या ट्रॅव्हल्स मुंबईहून सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या वेळी लोक ट्रॅव्हल्स भरून गावी येत होते. हीच परिस्थिती आता सुरू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आत्ताच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ट्रॅव्हल्स तपासणीची जिल्ह्यात कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे नेमक्या किती ट्रॅव्हल्स रोज येतात आणि मुंबई-पुण्याला जातात, याचा आकडा प्रशासनाकडे नाही. त्यांच्याकडे केवळ जुजबी माहिती आहे.

चौकट : रेल्वे

सातारा रेल्वे स्थानकावर साताऱ्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे. हे रेल्वे स्टेशन साताऱ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे फारसे कोणी रेल्वेने प्रवास करीत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर बसस्थानकाएवढी गर्दी पाहायला मिळत नाही. साताऱ्याहून रोज जेमतेम वीस ते पंचवीस प्रवासी रेल्वेने ये-जा करीत असतात. रेल्वे स्टेशनवर विविध प्रकारचे सूचनाफलक लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी कोरोनाचे नियम पाळत असून तोंडाला मास्क लावूनच ते ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट : अशी आहे आकडेवारी

कोरोनाचे एकूण रुग्ण

६५५४२

बरे झालेले रुग्ण

६०२१७

उपचार सुरू असणारे रुग्ण

३४१९

कोरोनाचे एकूण बळी

१९०६