शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’साठी वडूजला मूकमोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 23:06 IST

जैन बांधव एकवटले : धार्मिक आचरणावर निर्बंध नको; फेरविचार करण्याची मागणी

वडूज : ‘संथारा’ (सल्लेखना) या जैन धर्मातील पवित्र व्रताचा आत्महत्येशी संबंध जोडून, या व्रतावर निर्बंध लादण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने तमाम जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. न्यायालयाने या बाबीचा पुर्नविचार करावा, या मागणीसाठी मंगळवारी वडूज येथे जैन समाज बांधवांनी मूकमोर्चा काढला.याबाबत तहसीलदार विवेक साळुंखे यांना निवेदन देणयात आले. निवेदनात म्हटले आहे की, सल्लेखना हे जैन धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण व्रत असून नुकतेच राजस्थान उच्च न्यायालयाने हे व्रत बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. जैन तत्वज्ञानातील संल्लेखना म्हणजे आपले जीवनाचे इतिकर्तव्य संपल्यानंतर अत्यंत शांतपणे, संयमपूर्वक, सर्वांची क्षमा मागून तपश्चरणाच्या जोरावर क्रमश: आहार, पाणी कमी करून आपल्या देहावरील ममत्व सोडून देऊन देहाचाही त्याग करणे होय. यामुळे हे व्रत अत्यंत श्रेष्ठ असून हे बेकायदेशीर ठरविल्यामुळे जैन समाज बांधवांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी व जैन तत्वाच्या व रूढींच्या विरूध्द आहे.मोर्चात बाजार समितीचे संचालक गिरीषशेठ शहा, विकल्पशेठ शहा, अ‍ॅड. अभयकुमार मेहता, राजू शहा, हर्षवर्धन शहा,किशोर व्होरा,सुहास शहा, मिलींद व्होरा, प्रमोद दोशी, अभय दोशी, राहूल व्होरा, संतोष शहा, गजूभाई दोशी, पदमराज गांधी, धनूभाई गांधी, पंकज मेहता, वैभव गांधी आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनीधी)