शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मुदगल यांनी राज्याचे मुख्य सचिव व्हावे

By admin | Updated: April 24, 2017 22:04 IST

कामकाजाचे कौतुक : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निरोप

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीस आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला आमदार शंभूराज देसाई यांनी अनुमोदन दिले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही सर्वांचे आभार मानत ॠणानुबंध कायम राहतील, अशी ग्वाही दिली. त्यानंतर समितीच्या कामकाजास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आमदार शिंदे यांनी पाणी योजनांचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय पेयजल योजनेचे अनुदान बंद झाले आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्ह्यात एकही योजना झाली नाही. जिल्हा नियोजन समितीतूनही निधीची तरतूद केली नाही त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून एकही नवीन पेयजल योजना झालेली नाही. आजपर्यंत किती प्रस्ताव प्रलंबित आहेत. किती पाठवले, किती मंजूर झाले आणि मागणी कधी होती याची सविस्तर यादी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. आमदार शंभूराज देसाई यांनीसुद्धा जिल्हा नियोजन समितीतून निधी राखीव ठेवून ५० टक्के निधी नवीन योजनांना तर ५० टक्के निधी अपूर्ण योजनांना देण्यात यावा, अशी मागणी केली. गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन योजना शासन करू शकलेले नाही. आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रीय पेयजलच्या काही योजना अर्धवट आहेत. असलेल्या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. आमदार शिंदे यांनी याबाबत जिल्हा नियोजनमध्ये ठराव करू, अशी भूमिका मांडली. आ. जयकुमार गोरे यांनी ‘जलयुक्त’ कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच १५८ रुपयांची कामे झाली आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी जलयुक्तच्या गुणवत्तेबाबतचे प्रश्न खोडून काढत गुणवत्ता तपासल्यानंतर बिले काढण्यात आल्याचे सांगितले. आमदार आनंदराव पाटील यांनी हनुमान संस्थेच्या उपोषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अनुपस्थित असल्याचे पालकमंत्री शिवतारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. यापुढे असे पुन्हा चालणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस द्यावी. बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुद्दे मांडले त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)शंभूराज देसार्इंच्यावर पालकमंत्र्यांची स्तुतिसुमनेआपल्याला बढती मिळून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे खरे आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश महत्त्वाचा असतो. मला अचानकपणे मंत्रिपद दिले गेले आहे. शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. साताऱ्यातील सर्वच आमदार अभ्यासू आहेत. शंभूराज मात्र विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा निधी आपल्या मतदार संघात आणण्यासाठी कायमच तत्पर असतात, त्यांना मंत्रिपद मिळाले तर ते आणखी जोमाने काम करतील,’ अशी स्तुतिसुमने पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आ. देसाई यांच्यावर उधळली.श्वेता सिंघल यांचे स्वागतनवनियुक्त जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे स्वागत केले. आयत्या विषयांनाही मंजुरीसातारा येथील गोडोली प्रवेशद्वार ते अजिंक्यतारा किल्ला रस्त्याचे नूतनीकरण व स्ट्रीट लाईट बसविणेक्षेत्र महाबळेश्वर यात्रास्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जापाटण तालुक्यातील रस्त्यांची दर्जा उन्नतीसंगममाहुलीत महाराणी ताराबाई समाधीचा जीर्णाेद्धारवॉटर कप स्पर्धेतील तलावांची नावीन्यपूर्ण योजनेतून दुरुस्ती