शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST

म्हसवड : ‘कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली ...

म्हसवड : ‘कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही तर ‘महावितरण’ला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये,’ असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दिला. दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पिके आहेत. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी वीजजोडणी मागत आहेत. ती जोडणी देण्यास शासन कायम टाळाटाळ करत आहे. वीजजोडणी न दिल्यामुळे शेतकरी अवैधरीत्या विजेचा वापर करीत आहेत. विजेचा वापर सुरूच आहे, त्यामुळे प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर हे ओव्हरलोडेड आहेत. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी जेव्हा शेतकरी महावितरणकडे जातात, त्यावेळी वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर जोडणार नाही, अशी भूमिका महावितरण घेते. महिनोन‌्महिने डीपी जोडले जात नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आणलेले पीक फक्त वीज उपलब्ध न झाल्यामुळे वाया जात आहे. आधीच परिस्थितीने भरडलेल्या शेतकऱ्यांचे महावितरणकडून शोषण सुरू आहे.

राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, आम्ही सक्तीची वीज बिल वसुली करणार नाही; पण वस्तुस्थिती वेगळी आहे. कोरोना कालखंडानंतर शेतकऱ्यांना शेती पंपाची बिले आली. जी बिले शेकड्यांत येत होती, ती बिले हजारांमध्ये आली. एका शेतकऱ्याला तर दीड लाख रुपये बिल आले आहे.

(चौकट)

शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर आम्ही बिल कमी करून देऊ, असे ते म्हणतात; पण मुळात जी बिले पन्नास, शंभर, दोनशे, तीनशे पटींनी आलीत, ती फक्त दहा, वीस टक्के कमी करून काही साध्य होत नाही. महावितरणकडून जी चुकीची बिले आलीत, त्यांची पूर्वीची सरासरी काढून बिले द्यावीत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.