शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

‘महावितरण’चा कृषीसह घरगुती ग्राहकांना शॉक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

औंध : कोरोनाकाळात जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा करूनही वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरण्यास चालढकल केल्याने ‘महावितरण’ची आर्थिक ...

औंध : कोरोनाकाळात जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा करूनही वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरण्यास चालढकल केल्याने ‘महावितरण’ची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. परिणामी ‘महावितरण’ने कृषिपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम देत वीज बिल भरण्याचे आवाहन केले असून, वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिल्याची माहिती औंधचे उपकार्यकारी अभियंता सुभाष घाटोळ यांनी दिली.

औंध मंडलात घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे ८७ लाख रुपये एवढी थकबाकी असून, कृषी पंप थकबाकी शासननिर्णयाप्रमाणे ५० टक्के सवलती व्यतिरिक्त ४२१३ ग्राहकांची थकबाकी रक्कम ९ कोटी २० लाखांच्या आसपास आहे.

घाटोळ यांनी सांगितले की, कृषी पंपाचे वीजबिल माफीच्या एवढ्या चांगल्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती सर्वांना ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आलेली असूनही एकूण ५७५१ ग्राहकांपैकी फक्त १५३८ ग्राहकांनीच या वीजबिल माफी सवलतीचा फायदा घेतलेला आहे. या वीजबिल माफी योजनेचा फायदा न घेतलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे त्वरित योजनेचा फायदा घेऊन सहकार्य करावे, कारण याच उपलब्ध होणाऱ्या पैशांमधून त्याच ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवणेकामी निधी उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भागातील वीजसमस्या सोडविण्यास मदत होईल.

थकबाकी वसूल करण्यासाठी ‘महावितरण’ने विविध पथके स्थापन केली असून, सुटीच्या दिवशीही वसुली मोहीम सुरू राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरू ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरण औंध यांच्याकडून करण्यात आले आहे.