शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

खासदार, आमदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे ...

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असतानाही आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,’ असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र, केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत, म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले. केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र, ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला, तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत, तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र, शासन तेही देऊ शकलेले नाही.’

भारताचा नागरिक म्हणून मी सांगतो, अन्याय का खपवून घ्यायचा, असे स्पष्ट करत उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘आता इतका अंधकार पसरला आहे की, मराठा समाजातील मुलांना सरकारने विष प्यायची परवानगी द्यावी, नाही तर काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील जाती धर्मात तेढ निर्माण होईल. राज्य शासन केवळ केंद्र शासनाकडे हा विषय ठरवत आहे. वास्तविक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील आहे. आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करूनही या मागणीला राज्यशासनाने बगल दिली. आरक्षणाची केस न्यायालयात उभी असताना, त्या तारखेला राज्य शासनाचा वकील हजर राहत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पाहिलेले आहे.

आता कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या घरासमोर जावा. त्या आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून त्यांना बोलतं करा. मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असं त्यांना विचारा. त्यांच्याकडून काही समाधान झाले नाही, तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही, असे कळवा. लोकप्रतिनिधींनी कुठल्याही मस्तीत राहू नये. लोक त्यांची मस्ती उतरतील जनावरे परवडले, नेतेमंडळी माणुसकी नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये उदयनराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे म्हणाले...

- मराठा आरक्षण रद्दचा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा

- आता लोकांवर विष पिण्याची वेळ

- तरुण नक्षलवादी बनतील

- राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा

- जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण