शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

खासदार, आमदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे ...

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असतानाही आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,’ असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र, केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत, म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले. केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र, ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला, तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत, तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र, शासन तेही देऊ शकलेले नाही.’

भारताचा नागरिक म्हणून मी सांगतो, अन्याय का खपवून घ्यायचा, असे स्पष्ट करत उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘आता इतका अंधकार पसरला आहे की, मराठा समाजातील मुलांना सरकारने विष प्यायची परवानगी द्यावी, नाही तर काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील जाती धर्मात तेढ निर्माण होईल. राज्य शासन केवळ केंद्र शासनाकडे हा विषय ठरवत आहे. वास्तविक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील आहे. आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करूनही या मागणीला राज्यशासनाने बगल दिली. आरक्षणाची केस न्यायालयात उभी असताना, त्या तारखेला राज्य शासनाचा वकील हजर राहत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पाहिलेले आहे.

आता कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या घरासमोर जावा. त्या आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून त्यांना बोलतं करा. मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असं त्यांना विचारा. त्यांच्याकडून काही समाधान झाले नाही, तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही, असे कळवा. लोकप्रतिनिधींनी कुठल्याही मस्तीत राहू नये. लोक त्यांची मस्ती उतरतील जनावरे परवडले, नेतेमंडळी माणुसकी नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये उदयनराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे म्हणाले...

- मराठा आरक्षण रद्दचा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा

- आता लोकांवर विष पिण्याची वेळ

- तरुण नक्षलवादी बनतील

- राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा

- जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण