शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

खासदार, आमदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे ...

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असतानाही आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,’ असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र, केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत, म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले. केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र, ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला, तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत, तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र, शासन तेही देऊ शकलेले नाही.’

भारताचा नागरिक म्हणून मी सांगतो, अन्याय का खपवून घ्यायचा, असे स्पष्ट करत उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘आता इतका अंधकार पसरला आहे की, मराठा समाजातील मुलांना सरकारने विष प्यायची परवानगी द्यावी, नाही तर काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील जाती धर्मात तेढ निर्माण होईल. राज्य शासन केवळ केंद्र शासनाकडे हा विषय ठरवत आहे. वास्तविक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील आहे. आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करूनही या मागणीला राज्यशासनाने बगल दिली. आरक्षणाची केस न्यायालयात उभी असताना, त्या तारखेला राज्य शासनाचा वकील हजर राहत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पाहिलेले आहे.

आता कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या घरासमोर जावा. त्या आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून त्यांना बोलतं करा. मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असं त्यांना विचारा. त्यांच्याकडून काही समाधान झाले नाही, तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही, असे कळवा. लोकप्रतिनिधींनी कुठल्याही मस्तीत राहू नये. लोक त्यांची मस्ती उतरतील जनावरे परवडले, नेतेमंडळी माणुसकी नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये उदयनराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे म्हणाले...

- मराठा आरक्षण रद्दचा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा

- आता लोकांवर विष पिण्याची वेळ

- तरुण नक्षलवादी बनतील

- राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा

- जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण