शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

महामार्गावरील अडचणींचा खासदार पाटील यांनी वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

कराड: पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे सहापदरीकरण करण्यात यावे, महामार्गावरील असलेल्या पुलावर व पुलाखाली होणारे ...

कराड:

पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे सहापदरीकरण करण्यात यावे, महामार्गावरील असलेल्या पुलावर व पुलाखाली होणारे अपघात टाळण्यासाठी विद्युतीकरण करावे, खंबाटकी घाट बायपाससाठी सुरू असलेल्या दोन नवीन बोगद्यांच्या कामाला गती द्यावी यासह पुणे ते शेंद्रे महामार्गाचे अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून त्यात सुधारणा करण्यात यावी, अशा महामार्गाच्या संदर्भातील विविध मागण्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत केल्या. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुन्हा संसदेत आवाज उठवला. माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पारगाव या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल बांधाण्यात यावा. महामार्गावरील पुलावर व पुलाखाली रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. असे होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच कराड येथील कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पूल असल्याने त्याठिकाणी अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्राधान्याने येथील पुलाचे सहा पदरीकरण करण्यात यावे. याशिवाय पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट आहे. या ठिकाणीची कामे अपूर्ण अवस्थेत असून दर्जाहीन झाली आहेत. त्याची सुधारणा करण्यात यावी. खंबाटकी घाट बायपाससाठी दोन बोगदे तयार होत आहेत. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने या बोगद्यांच्या कामाला गती देण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.

खासदार पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विविध मागण्या संदर्भात मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील महामार्गाची अपूर्ण कामे येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होऊन जातील. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी बैठक घेऊन जिथे-जिथे अपघातांची ठिकाणे आहेत ते मला कळवावेत. त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल. तसेच असे अपघातमुक्त रस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.