शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कास भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार

By admin | Updated: June 22, 2017 01:03 IST

शिवेंद्रसिंहराजे : पाचगणीत कारवाई का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सातारा-कास रस्त्यावरील स्थानिक भूमिपुत्रांनी स्वत:च्या वाडवडिलोपार्जित जागेवर छोटे-मोठे हॉटेल, व्यवसाय करून उपजीविकेचा मार्ग शोधला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,’ अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा ते कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाची शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेनंतर स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरण्याचे काम महसूल खात्यातील काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, हेच कर्मचारी बड्या धेंडांच्या समर्थकांच्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. अशांच्या पाठीशी आम्ही कदापिही नाही. ज्या भूमिपुत्रांनी स्थानिक पातळीवर वित्तसंस्थेचे कर्ज घेऊन उद्योगाची उभारणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील स्थानिकांनी अनेक सुविधा देण्यासाठी स्वत:च्या जमिनी विकल्या आहेत. दागिने गहाण ठेवले आहेत. तसेच बँकांचे कर्ज काढले आहे. अशांवर कारवाई झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणाने सातारकर उभे राहतील. या परिसरात बेकायदेशीररीत्या वीजजोडणी, पाणी नळजोडणी ज्यांनी केली आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून दाखवावी. आम्ही जी भूमिका घेतली ती फक्त स्थानिक भूमिपुत्रांसाठीच आहे. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे पुणे, मुंबई शहरात स्थलांतरीत व्हावे लागले आहे. आता उद्योग व्यवसायाची उभारणी करताना कायदा व नियमाची आठवण करून दिली जाते. पण पाचगणी, लोणावळा, उल्हासनगर या परिसरात अशाच पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट वनखात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर ज्यांचे अतिक्रमण असेल अशाच स्थानिकांबाबत दंडात्मक कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही. मात्र, याचा गैरअर्थ घेऊन जिल्हा प्रशासन जर धनदांडग्यांना पाठीशी घालत असेल तर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा सभापती मिलिंद कदम, स्थानिक भूमिपुत्र विजय माने, सोमनाथ जाधव, शंकरराव जांभळे, नीलेश जाधव, लक्ष्मण गोगावले, केशव जगताप, संतोष माने, संतोष आटाळे, राम पवार, संपत जाधव, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते. भाजपही भूमिपुत्रांसोबत कास परिसरातील बांधकामांवर निर्बंध घालून कारवाई सुरू केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष या लोकांसोबत ठामपणे उभा राहिला आहे. या प्रश्नावर मतभेद अथवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां-सोबत झालेल्या चर्चेवेळी दिली.