शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कास भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार

By admin | Updated: June 22, 2017 01:03 IST

शिवेंद्रसिंहराजे : पाचगणीत कारवाई का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सातारा-कास रस्त्यावरील स्थानिक भूमिपुत्रांनी स्वत:च्या वाडवडिलोपार्जित जागेवर छोटे-मोठे हॉटेल, व्यवसाय करून उपजीविकेचा मार्ग शोधला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,’ अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा ते कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाची शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेनंतर स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरण्याचे काम महसूल खात्यातील काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, हेच कर्मचारी बड्या धेंडांच्या समर्थकांच्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. अशांच्या पाठीशी आम्ही कदापिही नाही. ज्या भूमिपुत्रांनी स्थानिक पातळीवर वित्तसंस्थेचे कर्ज घेऊन उद्योगाची उभारणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील स्थानिकांनी अनेक सुविधा देण्यासाठी स्वत:च्या जमिनी विकल्या आहेत. दागिने गहाण ठेवले आहेत. तसेच बँकांचे कर्ज काढले आहे. अशांवर कारवाई झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणाने सातारकर उभे राहतील. या परिसरात बेकायदेशीररीत्या वीजजोडणी, पाणी नळजोडणी ज्यांनी केली आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून दाखवावी. आम्ही जी भूमिका घेतली ती फक्त स्थानिक भूमिपुत्रांसाठीच आहे. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे पुणे, मुंबई शहरात स्थलांतरीत व्हावे लागले आहे. आता उद्योग व्यवसायाची उभारणी करताना कायदा व नियमाची आठवण करून दिली जाते. पण पाचगणी, लोणावळा, उल्हासनगर या परिसरात अशाच पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट वनखात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर ज्यांचे अतिक्रमण असेल अशाच स्थानिकांबाबत दंडात्मक कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही. मात्र, याचा गैरअर्थ घेऊन जिल्हा प्रशासन जर धनदांडग्यांना पाठीशी घालत असेल तर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा सभापती मिलिंद कदम, स्थानिक भूमिपुत्र विजय माने, सोमनाथ जाधव, शंकरराव जांभळे, नीलेश जाधव, लक्ष्मण गोगावले, केशव जगताप, संतोष माने, संतोष आटाळे, राम पवार, संपत जाधव, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते. भाजपही भूमिपुत्रांसोबत कास परिसरातील बांधकामांवर निर्बंध घालून कारवाई सुरू केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष या लोकांसोबत ठामपणे उभा राहिला आहे. या प्रश्नावर मतभेद अथवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां-सोबत झालेल्या चर्चेवेळी दिली.