शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सामाजिक प्रश्नांवर चळवळी

By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST

जवखेडाप्रकरणी दलित चळवळी आक्रमक

प्रदीप यादव - सातारा यंदाचे वर्ष हे सामाजिक चळवळींनी ढवळून निघाले. आरक्षण, भ्रष्टाचार, पुनर्वसन, अंधश्रद्धा निर्मूलन, जवखेडा हत्याकांड, शाडूच्या गणेशमूर्ती असे विविध सामाजिक विषय तीव्रतेने मांडण्यात सामाजिक चळवळी यशस्वी ठरल्या.मूर्तीविसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, यासाठी साताऱ्यात लोकचळवळ उभी राहिली. फलस्वरूप जवळपास ३ हजार घरांमध्ये शाडूच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना झाली. यंदा गाजलेले प्रकरण म्हणजे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बेकायदा खरेदी केलेली शेतकऱ्यांची जमीन. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रकरणाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.शहरात रस्त्याकडेला, ओढ्यात झोपड्यांमध्ये थंडीने कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांना मायेची ऊब मिळावी, यासाठी ‘लोकमत’ने चळवळ उभारली. त्याला सातारकरांनी प्रचंड प्रतिसाद देत ३ हजार ५०० मुलांना ऊबदार कपडे वाटप केली. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी तापलेल्या राजकीय फायदा करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला; पण यश आले नाही. शेवटी मतदानात ‘नकाराधिकारा’चे शस्त्र उपसले आणि तेरा जिल्ह्यात ते वापरले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १० हजार १६६ मतदारांनी ‘नोटा’ वापरला. एकीकडे उमेदवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मशगुल असतानाच दुसरीकडे सामाजिक चळवळींनी विविध विषयांवर वातावरण गरम करत आपले अस्तित्व दाखवून दिले.यंदा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत धनगर, कातकरी, नंदीबैलवाले, महादेव कोळी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्दा पेटला. अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाने रान उठविले अन् उमेदवारांना प्रचारासाठी एक प्रभावी अस्त्र मिळाले. जवखेडाप्रकरणी दलित चळवळी आक्रमकअहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाचे पडसात राज्यभर उमटले. आरोपींना पकडण्यात शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात राज्यभरात सामाजिक चळवळी रस्त्यावर उतरल्या. साताऱ्यातही विविध मागासवर्गीय चळवळींनी आंदोलन, मोर्चा काढून या प्रकारणाचे गांभीर्य तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न केला. दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबावेत, यासाठी ‘रिपाइं’ संघटनेच्या जिल्ह्यातील विविध शाखांनी आंदोलने केली.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अद्याप हाती लागले नाहीत. याबाबत शासन आणि प्रशासनाची असलेली उदासीनता याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी निषेध नोंदविला. पथनाट्य, कार्यशाळांमधून अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम प्रभावीपणे सुरू आहे.