शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

‘तारळी’चा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : तीन महिन्यांत उपाययोजना आखण्याचे प्रशासनाचे आश्वासन

सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, पवारवाडी, मोरेवाडी, जांभे, चिखली, चोरगेवाडी, करंदोशी, बोपोशी आदी गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या; मात्र १५ वर्षे उलटूनही येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी तारळी प्रकल्पग्रस्तांना दिले.सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील गावठाणात करून त्यांना सूर्याचीवाडी गावाच्या लगतच्या गावातील जमिनी देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी उपस्थित करून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार नसेल, तर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांनी ‘या प्रश्नावर तातडीने तोडगा काढू,’ असे सांगितले. मात्र, प्रश्न मार्गी लागण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. येत्या तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात मान्यता मिळालेल्या ठिकाणी करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.या बैठकीस सीताराम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किसन पवार, संतोष गायकवाड, यशवंत बेडेकर, जोतिराम गायकवाड, शंकर गायकवाड यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)