शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘तारळी’चा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : तीन महिन्यांत उपाययोजना आखण्याचे प्रशासनाचे आश्वासन

सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, पवारवाडी, मोरेवाडी, जांभे, चिखली, चोरगेवाडी, करंदोशी, बोपोशी आदी गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या; मात्र १५ वर्षे उलटूनही येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी तारळी प्रकल्पग्रस्तांना दिले.सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील गावठाणात करून त्यांना सूर्याचीवाडी गावाच्या लगतच्या गावातील जमिनी देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी उपस्थित करून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार नसेल, तर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांनी ‘या प्रश्नावर तातडीने तोडगा काढू,’ असे सांगितले. मात्र, प्रश्न मार्गी लागण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. येत्या तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात मान्यता मिळालेल्या ठिकाणी करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.या बैठकीस सीताराम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किसन पवार, संतोष गायकवाड, यशवंत बेडेकर, जोतिराम गायकवाड, शंकर गायकवाड यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)