शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

माणला उरमोडीचे पाणी न सोडल्यास आंदोलन : भारती पोळ

By admin | Updated: April 19, 2017 14:31 IST

शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमतम्हसवड (जि. सातारा), दि. १९ : माण तालुक्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत सोडण्यात यावे, अन्यथा माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन उभारणार, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ यांनी दिला.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरची सुविधा ही तत्काळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून गोंदवले मार्गे माणगंगा नदीमध्ये सोडल्यास सिमेंट बंधारे भरले जातील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तरी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न झाल्यास माण तालुक्यातील नागरिकांसमवेत जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दुष्काळी भागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून संबंधित विभागाला तत्काळ उरमोडीचे पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. भारती पोळ यांनी दिली.निवेदन देताना माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, योगेश पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)