शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात उतरून मच्छिमारांचे आंदोलन

By admin | Updated: June 13, 2015 00:19 IST

येरळवाडी तलावातील मासेमारी बंद : ठेका दुसऱ्या संस्थेस दिल्याचा आरोप

मायणी : येरळवाडी, ता. खटाव येथील तलावामध्ये गेली ३० ते ३५ वर्षे मायणी येथील यशवंत मच्छिमार संस्थेतर्फे मच्छिमारीचा व्यवसाय केला जात होता. यावर्षी या संस्थेला विश्वासात न घेता परस्पर ठेका दुसऱ्या संस्थेस दिल्यामुळे येथील ४० ते ५० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास याच तलावात आम्ही जलसमाधी घेऊ, असा इशारा या संस्थेमार्फत देण्यात आला आहे. येथील यशवंत मच्छिमार संस्था १९८२ पासून रजिस्टर आहे. तेव्हापासून या संस्थेमार्फत येरळवाडी तलावातील मच्छिमारीचा ठेका घेतला जातो. तसेच पावसाळ्यानंतर तलावामध्ये पाणी आल्यानंतर ही संस्था पाठपुरावा करून मच्छबीज सोडण्यास शासनाला भाग पाडत असते. त्यानंतर याच तलावातील मासेमारीवर मायणी भागातील ४० ते ५० कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत असतात.मात्र, यावर्षी शासनाने या संस्थेला विश्वासात न घेता दुसऱ्या संस्थेस हा मच्छिमारीचा ठेका दिला असल्याचा आरोप या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. हा ठेका शासनाने रद्द करावा किंवा नव्याने निविदनाकडून आमचाही समावेश करावा, गेल्या ३० ते २५ वर्षांपासून आमचा उदरनिर्वाह याच तलावावर चालत असून हा तलाव मच्छिमारीसाठी असल्याने त्वरित द्यावा अन्यथा या तलावामध्ये आम्ही सहकुटुंब जलसमाधी घेऊ.यावेळी यशवंत मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, हणमंत साळुंखे, तानाजी साळुंखे, मच्छिंद्र साळुंखे, सुखदेव साळुंखे, आयुब शेख, कादर शेख, किसन सूर्यवंशी, किसन साळुंखे, नंदकुमार मोरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) उपासमारीची वेळगेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आम्ही या तलावात मच्छिमारी करीत असून, यावर्षी शासनाने आम्हाला विश्वासात न घेता हा ठेका दुसऱ्याला दिल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. - दिलीप सूर्यवंशी, अध्यक्ष, यशवंत मच्छिमार संस्था, मायणी