शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

डोंगर माथ्यावर अन् पायथ्याला आंब्याची बाग!

By admin | Updated: May 23, 2014 22:57 IST

पाटण तालुका : सेंद्रिय हापूसला बाजार पेठेत मोठी मागणी

सातारा : फळांचा राजा हापूस अर्थात रत्नागिरीचा हापूस सर्वच बाजारपेठेत वर्चस्व ठेवून आहे. अगदी परेदशातही! परंतु रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या या फळाला परदेशातून बंदी घालण्यात आली. अगदी स्थानिक बाजारातही चोखंदळ ग्राहक अशा फळाकडे दुर्लक्ष करू लागला. असे असतानाच पाटण खोर्‍यात डोंगरमाथ्यावर अन् पायथ्याला सूर्यकांत ऊर्फ राजू काळे या तरुणाने जिद्द आणि खडतर परिश्रमाच्या जोरावर आंब्याची बाग केली. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या हापूसला आता बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा मोठा कल शेतकर्‍यांच्यात वाढू लागला आहे. पाटण तालुक्यातील काळगावचा तरुण राजू काळे हा मूळचा फोटोग्राफर. त्याने अत्यंत दुर्गम अशा डोंगरमाथ्यावर असणार्‍या आपल्या पाच एकरांत १९९६ मध्ये सर्वप्रथम आंब्यांची बाग केली. राज्य शासनाने या बागेसाठी त्याला हेक्टरी १८ हजारांची मदत केली.परंतु जंगलाला वणवा लागला आणि तीन वर्षांतच ही बाग जळून खाक झाली. आपले वृद्ध माता-पिता आणि पत्नी छाया-मीना यांच्या साह्याने त्यांने खचून न जाता पुन्हा बाग उभी केली. दापोली कृषी विद्यापीठातून हापूस, केसर, लंगडा, वनराज आणि तोतापुरीची झाडे आणून पुन्हा नव्या जोमाने बाग केली. या डोंगरमाथ्यावरील आंब्याच्या झाडांना अगदी खांद्यावरून हंडा वाहून पाणी घातले. त्यानंतर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रशिक्षणातून मटका सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली. या बागेत आवळा आणि काजूची झाडेही त्यांनी लावली आहेत. पाच वर्षांनंतर प्रत्यक्ष उत्पन्नाला सुरुवात झाली. हा आंबा पारंपरिक पद्धतीने भाताच्या पिंजाराचा वापर करून अढी घालून पिकविण्यात येतो. यानंतर मागील वर्षापासून त्याने कºहाड तालुक्यातील तुळसण येथील ३०० झाडांची आंब्यांची बाग वार्षिक करारावर घेतली. या बागेतही जीवापाड मेहनतीने निगा राखत मागील वर्षापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. हा सर्व आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी राजूला वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यामध्ये सघन पद्धतीने आंबा लागवड घेतल्यास प्रतिएकर मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होते. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड निर्मूलन, छाटणीची जोड, मोहर संरक्षण याबाबत राजूला ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. त्याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या आंब्याला शेतकरी ते थेट ग्राहक याजनेतून चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी) अडीच लाखांचे उत्पन्न गतवर्षी पुणे येथे तर यंदा सातार्‍यातील प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद आणि सिंचन भवन येथे थेट ग्राहक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरवर्षी दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न राजूला मिळत आहे.