शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

डोंगर माथ्यावर अन् पायथ्याला आंब्याची बाग!

By admin | Updated: May 23, 2014 22:57 IST

पाटण तालुका : सेंद्रिय हापूसला बाजार पेठेत मोठी मागणी

सातारा : फळांचा राजा हापूस अर्थात रत्नागिरीचा हापूस सर्वच बाजारपेठेत वर्चस्व ठेवून आहे. अगदी परेदशातही! परंतु रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या या फळाला परदेशातून बंदी घालण्यात आली. अगदी स्थानिक बाजारातही चोखंदळ ग्राहक अशा फळाकडे दुर्लक्ष करू लागला. असे असतानाच पाटण खोर्‍यात डोंगरमाथ्यावर अन् पायथ्याला सूर्यकांत ऊर्फ राजू काळे या तरुणाने जिद्द आणि खडतर परिश्रमाच्या जोरावर आंब्याची बाग केली. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या हापूसला आता बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा मोठा कल शेतकर्‍यांच्यात वाढू लागला आहे. पाटण तालुक्यातील काळगावचा तरुण राजू काळे हा मूळचा फोटोग्राफर. त्याने अत्यंत दुर्गम अशा डोंगरमाथ्यावर असणार्‍या आपल्या पाच एकरांत १९९६ मध्ये सर्वप्रथम आंब्यांची बाग केली. राज्य शासनाने या बागेसाठी त्याला हेक्टरी १८ हजारांची मदत केली.परंतु जंगलाला वणवा लागला आणि तीन वर्षांतच ही बाग जळून खाक झाली. आपले वृद्ध माता-पिता आणि पत्नी छाया-मीना यांच्या साह्याने त्यांने खचून न जाता पुन्हा बाग उभी केली. दापोली कृषी विद्यापीठातून हापूस, केसर, लंगडा, वनराज आणि तोतापुरीची झाडे आणून पुन्हा नव्या जोमाने बाग केली. या डोंगरमाथ्यावरील आंब्याच्या झाडांना अगदी खांद्यावरून हंडा वाहून पाणी घातले. त्यानंतर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रशिक्षणातून मटका सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली. या बागेत आवळा आणि काजूची झाडेही त्यांनी लावली आहेत. पाच वर्षांनंतर प्रत्यक्ष उत्पन्नाला सुरुवात झाली. हा आंबा पारंपरिक पद्धतीने भाताच्या पिंजाराचा वापर करून अढी घालून पिकविण्यात येतो. यानंतर मागील वर्षापासून त्याने कºहाड तालुक्यातील तुळसण येथील ३०० झाडांची आंब्यांची बाग वार्षिक करारावर घेतली. या बागेतही जीवापाड मेहनतीने निगा राखत मागील वर्षापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. हा सर्व आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी राजूला वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यामध्ये सघन पद्धतीने आंबा लागवड घेतल्यास प्रतिएकर मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होते. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड निर्मूलन, छाटणीची जोड, मोहर संरक्षण याबाबत राजूला ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. त्याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या आंब्याला शेतकरी ते थेट ग्राहक याजनेतून चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी) अडीच लाखांचे उत्पन्न गतवर्षी पुणे येथे तर यंदा सातार्‍यातील प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद आणि सिंचन भवन येथे थेट ग्राहक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरवर्षी दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न राजूला मिळत आहे.