शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

धनावडेवाडीकरांच्या डोक्यावर आपत्तींचा डोंगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

ढेबेवाडी : ‘पावसाचा जोर कमी झाला असला तरी ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींना भेगा पडण्याचे प्रमाण वाढले ...

ढेबेवाडी : ‘पावसाचा जोर कमी झाला असला तरी ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींना भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच घरांनाही तडे जाऊन घरे खिळखिळी बनल्याने धनावडेवाडी (निगडे) ता. पाटण येथील ३२ कुटुंबांतील ८० नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले.

गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्यासह दिवसरात्र तीन दिवस थैमान घातलेल्या पावसाने प्रशासनासह नागरिकांचीही झोप उडवून टाकली. ढेबेवाडी विभागातील वांग नदीकाठच्या गावासह काळगाव, जिंती आणि सणबूर खोऱ्यात मोठे नुकसान झाले. भातशेतीसह अन्य पिकेही वाहून गेली, तर डोंगर पठाराला जोडणारे बहुतेक सर्वच छोटे, मोठे पूल वाहून गेल्याने पाऊस थांबूनसुद्धा ही गावे संपर्कहीन झाली आहेत.

या विभागातील मराठवाडी धरणानजीक असलेल्या मेंढ गावाजवळ भूस्खलनाची घटना घडली. सुदैवाने येथे वस्ती नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, जितकरवाडी येथे डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींनाही भेगा पडू लागल्याने दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांना जिंती येथे स्थलांतरित करण्यात आले. तोपर्यंत धनावडेवाडी (निगडे) येथे भूस्खलनाची घटना घडल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली होते. प्रशासनही येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असतानाच येथील जमिनींसह घरांच्या भिंतीनाही अचानकपणे तडे जाऊ लागले. घरे खिळखिळी झाली. यामुळे पाटण महसूल विभाग, ढेबेवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी धनावडेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी सकाळपासून ही मोहीम चालू केली. मात्र, वांग नदीला पूर असल्याने आणि येथील पूलही तुटल्याने मोठी कसरत करावी लागली. अक्षरशः पाण्याच्या मोठ्या प्रवाहातूनसुद्धा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांना साखळी करून, तर काही वृद्धांना उचलून नदीपात्राबाहेर काढले. या सर्व नागरिकांना ढेबेवाडी येथील मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.

फोटो

२४ढेबेवाडी

धनावडेवाडी येथील बत्तीस कुटुंबीयांना प्रशासनाने सोमवारी सुरक्षित ठिकाणी हलविले. (छाया : रवींद्र माने)