शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

आई मला पोहायला जायचंय.. पर्यटकांची गर्दी -कास तलाव बालचमूंनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:10 IST

शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद

ठळक मुद्देजलविहाराचा आनंद घेताना कोणतीही एखादी विपरीत घटना घडू नये, यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष देणे आवश्यक

पेट्री : शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा म्हणजे अवघडच! तरी देखील शहरी भागातील मुलं आपल्या कुटुंबासमवेत या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी कासला एका दिवसाचे नियोजन करताना पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान, कासला पर्यटकांची प्रामुख्याने पसंती असल्याने बहुसंख्य पर्यटक कास तलावावर पर्यटनांसाठी गर्दी करताना दिसत आहेत. भोजन तयार होईपर्यंत बालचमू आपल्या कुटुंबाकडे तलावावर पोहायला जाण्याचा आग्रह धरत थोरामोठ्या व्यक्तींसोबत दिवसभर पोहण्याचा आनंद घेत आहेत.शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. उन्हाची तीव्रता भासत असल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होऊ लागली आहे. यामुळे या परिसरात आलेल्या बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास तलाव बहरू लागला आहे.

निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी तसेच निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी पर्यटकांची सतत वर्दळ असते. कासला मंगळवार, शनिवार, रविवार, सलग सुटीच्या दिवशी तसेच उन्हाळी सुटी असल्याने पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत आहे. कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. पर्यटक कुटुंबासमवेत या परिसरात फिरण्यास येत असून, व्हेज-नॉनव्हेज पार्ट्यांची मेजवाणी लुटण्यासाठी ठिकठिकाणी चुली मांडून हिरव्यागार दाट झाडी झुडपांचा निवारा घेत भोजनाचा आनंद घेताना दिसत आहेत. 

कास तलाव म्हणजे जणू काही स्वर्गाची पर्वणीच होय. येथे आल्यानंतर मन शांत, प्रसन्न होते. तसेच उन्हाची दाहकता जास्त असल्याने तलावात पोहण्याचा आनंद वेगळाच मिळतो. परंतु लहान मुलं जलविहाराचा आनंद घेताना कोणतीही एखादी विपरीत घटना घडू नये, यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- महेंद्र साळुंके, पर्यटक, सातारा