शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आई मला पोहायला जायचंय.. पर्यटकांची गर्दी -कास तलाव बालचमूंनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:10 IST

शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद

ठळक मुद्देजलविहाराचा आनंद घेताना कोणतीही एखादी विपरीत घटना घडू नये, यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष देणे आवश्यक

पेट्री : शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा म्हणजे अवघडच! तरी देखील शहरी भागातील मुलं आपल्या कुटुंबासमवेत या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी कासला एका दिवसाचे नियोजन करताना पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान, कासला पर्यटकांची प्रामुख्याने पसंती असल्याने बहुसंख्य पर्यटक कास तलावावर पर्यटनांसाठी गर्दी करताना दिसत आहेत. भोजन तयार होईपर्यंत बालचमू आपल्या कुटुंबाकडे तलावावर पोहायला जाण्याचा आग्रह धरत थोरामोठ्या व्यक्तींसोबत दिवसभर पोहण्याचा आनंद घेत आहेत.शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. उन्हाची तीव्रता भासत असल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होऊ लागली आहे. यामुळे या परिसरात आलेल्या बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास तलाव बहरू लागला आहे.

निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी तसेच निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी पर्यटकांची सतत वर्दळ असते. कासला मंगळवार, शनिवार, रविवार, सलग सुटीच्या दिवशी तसेच उन्हाळी सुटी असल्याने पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत आहे. कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. पर्यटक कुटुंबासमवेत या परिसरात फिरण्यास येत असून, व्हेज-नॉनव्हेज पार्ट्यांची मेजवाणी लुटण्यासाठी ठिकठिकाणी चुली मांडून हिरव्यागार दाट झाडी झुडपांचा निवारा घेत भोजनाचा आनंद घेताना दिसत आहेत. 

कास तलाव म्हणजे जणू काही स्वर्गाची पर्वणीच होय. येथे आल्यानंतर मन शांत, प्रसन्न होते. तसेच उन्हाची दाहकता जास्त असल्याने तलावात पोहण्याचा आनंद वेगळाच मिळतो. परंतु लहान मुलं जलविहाराचा आनंद घेताना कोणतीही एखादी विपरीत घटना घडू नये, यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- महेंद्र साळुंके, पर्यटक, सातारा