शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

‘अनोळखी मृत्यू’मध्ये सर्वाधिक महिला !

By admin | Updated: May 6, 2016 01:19 IST

पोलिस खात्यातर्फे प्रदर्शन : दोन हजार छायाचित्रांपैकी ३५८ सातारा जिल्ह््यातीलच.. -- लोकमत विशेष

सातारा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनोळखी मृत व्यक्तींच्या छायाचित्र प्रदर्शनात सातारा जिल्ह्यातील सुमारे ३५८ छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. विशेष म्हणजे, यात वयस्कर आणि भूकबळी महिलांचे प्रमाण अधिक आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पुरंदर येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. कुटुंबातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी उपयुक्त असल्याने हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात यंदा सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नवी मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद आदी मुख्य शहरातून अनोळखी मृत व्यक्तींची सुमारे दोन हजार छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो लोक या ठिकाणी भेटी देत असतात. विविध ठिकाणचे लोक या प्रदर्शनातून त्यांच्या हरवलेल्या नातेवाइकांना शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रदर्शनात मांडलेल्या दोन हजार छायाचित्रांमध्ये सातारा जिल्ह्यातून गेलेल्या ३५८ अनोळखी मृत व्यक्ती, महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) महिलांचे प्रमाण अधिक का?घरात मुलीचा जन्म झाल्यापासूनच तिच्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. जन्मल्यानंतर आई, थोडी मोठी झाल्यानंतर दादा, त्यानंतर पती आणि पती निधनानंतर तिचा मुलगा! हे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून चालत आल्याने आपले निर्णय स्वत: घेऊन धाडसाने एकटे राहून दाखवणारी महिला अभावानेच एखादी. घरात होणाऱ्या किरकोळ वादावरूनही महिला स्वत:ला संपविण्याचा विचार करते. मुलींच्या विवाहानंतर जावयाच्या दारात जाणार नाही, ही भीष्मप्रतिज्ञा एकीकडे असते तर मुलाच्या वाढत जाणाऱ्या संसारात आता आपण ‘अडगळ’ झालोय, ही भावना दुसरीकडे असते. या द्वंद्वात महिलेचे मानसिक संतुलन बिघडू लागते. आयुष्यभर समजून घेणारा पती नसेल तर तिची अत्यंत विचित्र अवस्था होते आणि मग विरक्ती पत्करून ती बाहेर पडते; पण समाजाच्या या झळा ती सोसू शकत नाही, म्हणूनच अनोळखी मृत व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते, असे तज्ज्ञांचे मत आहे..मद्यपानाची सवय असणाऱ्या पुरुषांना त्याविषयी घरातून सारखी टोचणी मिळाली तर खिशात पैसे घेऊन हे पुरूष घर सोडतात. गाडी मिळेल तिथे जायचे आणि मिळेल ती प्यायची. मद्यपानाची सवय जडल्यामुळे शारीरिक व्याधीही वाढत असतात. त्यामुळे अनेकदा परराज्यातून आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढीव असते. काहीदा वातावरणातील बदल आणि शरीरात मद्याचे अतिरिक्त प्रमाण असल्याने हे पुरुष मृत होतात. परराज्यातील असतील तर त्यांच्या कुटुंबीयांना इथंपर्यंत पोहोचता येत नाही.गारठ्याने किंवा पावसाने घर नसणारे किंवा घर सोडून आलेल्या महिला किंवा पुरुषांचा गारठून मृत्यू होतो. घर सोडून आल्यामुळे व त्यांची ओळख न पटल्यामुळे हे मृतदेह बेवारस म्हणून सरकारी दप्तरी नोंदविले जातात.