शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

सकाळी चालणाऱ्यांना ना तमा पावसाची

By admin | Updated: August 13, 2014 23:33 IST

आरोग्य : पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय

सचिन काकडे-सातारा  --मनुष्य जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. म्हणून तर ‘चांगले आरोग्य हाच खरा दागिना’ असे म्हटले जाते. उत्तम आरोग्यासाठी चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. म्हणून तर सातारकर उन्हाळा आणि हिवाळ्याबरोबरच पावसाची तमा न बाळगता दररोज पहाटे आणि नित्यनियमाने चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत.चालण्यामुळे शरीराच्या बऱ्याच व्याधी दूर होत असतात. मन उत्साही राहते, त्यामुळे डॉक्टरदेखील रुग्णांना चालणाचा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सातारकरांनी हे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे अगदी पहाटेच्या वेळी येथील राजपथ, कर्मवीर पथ, बोगदा, कुरणेश्वर, यवतेश्वर आणि अजिंक्यताऱ्यावर आबालवृद्धांची चालण्याची जणू स्पर्धात सुरू असते. दहा वर्षांपासून ते अगदी ७० वर्षांपर्यंतचे वृद्ध या ठिकाणी दररोज चालताना दिसतात. येथील शाहू स्टेडियममध्ये सकाळी मुलांबरोबच वृद्धांची गर्दी पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी येणारे व्यक्ती सर्वप्रथम चालण्याचा, पळण्याचा व्यायाम करतात. यानंतर आपल्याला खेळात कार्यमग्न होतात.गेली काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी सातारकर पावसाची तमा न बाळगता अगदी रेनकोट, छत्रीसहित घरातून चालण्यासाठी बाहेर पडत आहे. मुसळधार पावसातही सातारकर आपल्या आरोग्याची काळजी पुरेपूर घेताना दिसत आहेत.सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे महिला आरोग्याबाबत किती सजग आहेत, हे यावरून दिसून येत आहे. या महिलांच्या पाठोपाठ युवती ही व्यायामाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शरीराचे स्नायू बळकट करण्याबरोबरच निरोगी राहण्यासाठी चालणे हाच सर्वाेत्तम व्यायाम प्रकार आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी दिवसातून किमान दोन किलोमीटर चालायलाच हवे.चालणे हा बिनखर्चाचा व्यायाम आहे. चालण्यासाठी कुठल्याही व्यायामशाळेत जावे लागत नाही. अथवा पैसे मोजावे लागत नाही. पहाटे निसर्गाच्या सानिध्यात चालल्याने शरीराला मुबलक प्रमाणात ‘ओझोन’ मिळतो. चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरात वाढणारी अतिरिक्त चरबीदेखील कमी होते. एवढेच नाही चालण्यामुळे पोटाचा वाढलेला घेर देखील कमी होतो. चालताना संपूर्ण शरीराची हालचाल होते. त्यामुळे खांदा, हाताचा कोपरा, गुडघा, खुबा या अवयवांची हाडे बळकट होतात. तसेच हाडांची घनता देखील वाढते. चालण्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. चालण्यापूर्वी अथवा कोणाताही व्यायाम करण्यापूर्वी एक कप चहा, दूध अथवा दोन बिस्किटे खाल्यास त्यापासून शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते.चालण्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो. तसेच शारीरिक थकवा ही दूर होतो. त्यामुळे काम करण्यात उत्साह वाढतो. गर्भवती महिलांनाही चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे डॉक्टर सांगतात.