शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दरडी कोसळल्याने मोरणा खोरे हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी दरडी कोसळल्या असून, या घटनेमुळे मोरणा ...

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी दरडी कोसळल्या असून, या घटनेमुळे मोरणा खोरे हादरले आहे. यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झालेली आहे. मिरगाव येथे एक मृतदेह आढळून आला आहे. भूस्खलनामुळे अनेक व्यक्ती गाडल्या गेल्या असल्यामुळे एनडीआरएफच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल ३५ बेपत्ता लोकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. गुरुवारी रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारीही पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत राहिल्या. सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना परिसरात ६१० मिलीमीटर, नवजाला ७४६ मिलीमीटर व महाबळेश्वरला ५५६ मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत कोयनेत १३० मिलीमीटर, नवजाला १३० मिलीमीटर, महाबळेश्वरात १४६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.

पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून नवजा, मोरगिरी खोऱ्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. भूस्खलनाने शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, मोरगिरी-गुंजाळे येथे कोसळलेल्या दरडीखाली अनेक घरे गाडली गेली असून, सुमारे तीस जण त्याखाली दबले गेले आहेत, तर पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंढवली) येथे ७ घरांवर दरड कोसळली होती. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. १५ जनावरे आणि २५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले यांनी घटनास्थळी मदतकार्य पोहोचवले. आ. पाटील हे घटना घडल्यानंतर गुरुवारी घटनास्थळी गेले होते, त्यानंतर ते वाई तालुक्यातच ठाण मांडून होते. येथील ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तालुक्यातील जोर या ठिकाणी घरात अतिवृष्टीचे पाणी शिरल्याने अनिता पांडुरंग सपकाळ (वय ४५) व सचिन पांडुरंग सपकाळ (वय २२) हे मायलेक वाहून गेले आहेत, तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५९४.०४ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला असून, मौजे धावरी या ठिकाणी एक व्यक्ती मृत्युमुखी पडली आहे.

जावली तालुक्यातील रेंगडेवाडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी तानाबाई किसन कासुर्डे (वय ५०) आणि भागाबाई सहदेव कासुर्डे (वय ५०) या महिलांचे मृतदेह सापडले. मात्र, आणखी दोघे अजूनही बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

एनडीआरएफ टीमच्या मदतीने पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे दरड हटवून बाधितांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून, यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तत्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.

पॉइंटर

- जोरमध्ये मायलेक गेले वाहून- पाटण तालुक्यातील चार गावांत दरडी कोसळल्या

- कोंढवली येथे २७ जणांची सुटका

- कोयनेतून पाण्याचा विसर्ग

- मोरगिरी खोऱ्यात ‘माळीण’

- मिरगाव, आंबेघर, ढोकवळे येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

- नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

- नांदगाव, श्रीक्षेत्र पाली येथेही पाणी घुसले

- एनडीआरएफचे दुसरे पथक दाखल

फोटो नेम : २३सातारा०१

फोटो ओळ :

पाटण तालुक्यातील आंबेघर गावावर याच डोंगरातून दरड कोसळून घरे ढिगाऱ्याखाली गेली.