शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कोयनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा

By admin | Updated: July 3, 2017 13:37 IST

धरण क्षेत्रात पाऊस : गतवषीर्पेक्षा यंदा पातळी चांगली

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0३ : जिल्ह्यातील पश्चिम भागात यावर्षी पावसाने वेळेवर आणि जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढू होऊ लागली आहे. गेल्यावषीर्चा विचार करता कोयना धरणात यावर्षी दुप्पटीपेक्षा अधिक साठा आहे. तर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडीमध्येही गतवषीर्पेक्षा अधिक पाणी आहे. मात्र, बलकवडी धरणातील पाणीसाठा बरोबरीत आहे. गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पावसालाही सुरूवात जुलै महिन्यातच खऱ्या अथार्ने झाली होती. परिणामी धरणात पाणीसाठा होण्यास तसा उशिरच झाला होता. सुरुवातीच्या काळातही पावसात जोर नव्हता. त्यामुळे चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे धरणे भरण्यासही वेळ लागला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज होता. पण, सुरूवातीला हजेरी लाऊन पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चिंता लागून राहिली होती. सातारा शहरातील पाण्याचे नियोजनही एक दिवसाआड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दडी मारलेल्या पावसाने दहा दिवसांपासून बरसण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदारपणे पाऊस होत आहे. महाबळेश्वरला तर आठ दिवसांपासून संततधार आहे. त्यामुळे वेण्णा लेक भरुन वाहिला. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या धरणातही गतवषीर्पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १५ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २ जुलैपर्यंत कोयनेत १३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १२.९१ होती. तर यावर्षी कोयनेतील पाणीसाठा ३२ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. धोम धरणात सध्या ३.३८ टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी २.७८ टीएमसी पाणीसाठा होता. कण्हेरमध्ये २.३५ असून गतवर्षी १.९२ टीएमसी पाणी आहे. उरमोडीत ४.९९ तर गतवर्षी ३.६२ आणि तारळीत १.३९ आणि गतवर्षी १.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बलकवडी धरणात गतवर्षी ऐवढाच म्हणजे १३.८१ टक्के ऐवढा पाणीसाठा आहे.

पूर्व भागात प्रतीक्षा...

 

जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पेरणी करायची का नाही, अशी स्थिती आहे. तर अनेकांनी निसर्गावर भरवसा ठेऊन पेरणी केली आहे.