शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

कोयनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा

By admin | Updated: July 3, 2017 13:37 IST

धरण क्षेत्रात पाऊस : गतवषीर्पेक्षा यंदा पातळी चांगली

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0३ : जिल्ह्यातील पश्चिम भागात यावर्षी पावसाने वेळेवर आणि जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढू होऊ लागली आहे. गेल्यावषीर्चा विचार करता कोयना धरणात यावर्षी दुप्पटीपेक्षा अधिक साठा आहे. तर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडीमध्येही गतवषीर्पेक्षा अधिक पाणी आहे. मात्र, बलकवडी धरणातील पाणीसाठा बरोबरीत आहे. गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पावसालाही सुरूवात जुलै महिन्यातच खऱ्या अथार्ने झाली होती. परिणामी धरणात पाणीसाठा होण्यास तसा उशिरच झाला होता. सुरुवातीच्या काळातही पावसात जोर नव्हता. त्यामुळे चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे धरणे भरण्यासही वेळ लागला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज होता. पण, सुरूवातीला हजेरी लाऊन पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चिंता लागून राहिली होती. सातारा शहरातील पाण्याचे नियोजनही एक दिवसाआड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दडी मारलेल्या पावसाने दहा दिवसांपासून बरसण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदारपणे पाऊस होत आहे. महाबळेश्वरला तर आठ दिवसांपासून संततधार आहे. त्यामुळे वेण्णा लेक भरुन वाहिला. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या धरणातही गतवषीर्पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १५ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २ जुलैपर्यंत कोयनेत १३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १२.९१ होती. तर यावर्षी कोयनेतील पाणीसाठा ३२ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. धोम धरणात सध्या ३.३८ टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी २.७८ टीएमसी पाणीसाठा होता. कण्हेरमध्ये २.३५ असून गतवर्षी १.९२ टीएमसी पाणी आहे. उरमोडीत ४.९९ तर गतवर्षी ३.६२ आणि तारळीत १.३९ आणि गतवर्षी १.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बलकवडी धरणात गतवर्षी ऐवढाच म्हणजे १३.८१ टक्के ऐवढा पाणीसाठा आहे.

पूर्व भागात प्रतीक्षा...

 

जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पेरणी करायची का नाही, अशी स्थिती आहे. तर अनेकांनी निसर्गावर भरवसा ठेऊन पेरणी केली आहे.