शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोयनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा

By admin | Updated: July 3, 2017 13:37 IST

धरण क्षेत्रात पाऊस : गतवषीर्पेक्षा यंदा पातळी चांगली

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0३ : जिल्ह्यातील पश्चिम भागात यावर्षी पावसाने वेळेवर आणि जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढू होऊ लागली आहे. गेल्यावषीर्चा विचार करता कोयना धरणात यावर्षी दुप्पटीपेक्षा अधिक साठा आहे. तर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडीमध्येही गतवषीर्पेक्षा अधिक पाणी आहे. मात्र, बलकवडी धरणातील पाणीसाठा बरोबरीत आहे. गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पावसालाही सुरूवात जुलै महिन्यातच खऱ्या अथार्ने झाली होती. परिणामी धरणात पाणीसाठा होण्यास तसा उशिरच झाला होता. सुरुवातीच्या काळातही पावसात जोर नव्हता. त्यामुळे चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे धरणे भरण्यासही वेळ लागला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज होता. पण, सुरूवातीला हजेरी लाऊन पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चिंता लागून राहिली होती. सातारा शहरातील पाण्याचे नियोजनही एक दिवसाआड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दडी मारलेल्या पावसाने दहा दिवसांपासून बरसण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदारपणे पाऊस होत आहे. महाबळेश्वरला तर आठ दिवसांपासून संततधार आहे. त्यामुळे वेण्णा लेक भरुन वाहिला. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या धरणातही गतवषीर्पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १५ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २ जुलैपर्यंत कोयनेत १३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १२.९१ होती. तर यावर्षी कोयनेतील पाणीसाठा ३२ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. धोम धरणात सध्या ३.३८ टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी २.७८ टीएमसी पाणीसाठा होता. कण्हेरमध्ये २.३५ असून गतवर्षी १.९२ टीएमसी पाणी आहे. उरमोडीत ४.९९ तर गतवर्षी ३.६२ आणि तारळीत १.३९ आणि गतवर्षी १.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बलकवडी धरणात गतवर्षी ऐवढाच म्हणजे १३.८१ टक्के ऐवढा पाणीसाठा आहे.

पूर्व भागात प्रतीक्षा...

 

जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पेरणी करायची का नाही, अशी स्थिती आहे. तर अनेकांनी निसर्गावर भरवसा ठेऊन पेरणी केली आहे.