शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मनधरणी फिसकटली; गणितं विसकटली!

By admin | Updated: November 13, 2016 23:58 IST

कऱ्हाड पालिका निवडणूक : ‘बंडोबां’नी वाढविली नेत्यांची डोकेदुखी; समन्वयाच्या अभावामुळे गोंधळात गोंधळ

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपानंतर चांगलीच रंगत येऊ लागली आहे. सध्यातरी कऱ्हाडच्या या निवडणुकीवर संधीसाधू राजकारणाचीच छटा असल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू असून, ऐनवेळी बंडखोरांची मनधरणी करण्याची चर्चा फिसकटल्याने आता राजकीय सारीपाटावरील विजयाची मांडलेली गणितेही विसकटलेली आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीचं कऱ्हाडच चित्र सध्या नागरिकांच्या दृष्टीनं गोंधळात गोंधळ वाढविणारच आहे. निवडणूक जनशक्ती अन् लोकशाही आघाडीची टक्कर हे समीकरण कऱ्हाडकरांना परिचित आहे. पण, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटना नव्याने समोर आल्या आहेत. त्या म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रथमच या निवडणुकीत उतरले असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. माजीमंत्री विलासराव पाटील- उंडाळकरांनी प्रथमच कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी या निवडणुकीत उतरविली आहे. ‘एमआयएम’सारखा पक्ष प्रथमच रिंगणात उतरला आहे. भाजपने प्रथमच पक्षीय पातळीवर जास्तीत जास्त उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरली आहे. तर लोकशाही आघाडी नेहमीप्रमाणे रिंगणात आहे. या आणि इतर अनेक बाबीवरून इथली निवडणूक वेगळी रंगत आणणारी ठरेल, असे वाटत असताना पडद्यामागे घडलेल्या अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे. भाजप, सेना, एमआयएम यांनी पक्षीय झेंडे खांद्यावर घेतल्यानंतर या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादीही पक्षीय चिन्हावर लढणे पसंत करेल, असे वाटत होते. मात्र, या दोन्ही पक्षांनी ‘आघाडी’ करण्यावरच भर दिला. जुनी ‘जनशक्ती’ एकवटल्याने पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर इच्छुकांची गर्दी वाढली. त्यातून उमेदवार निश्चित करताना नेत्यांचा कस लागला. अन् अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत हा घोळ मिटता मिटला नाही. म्हणूनच आज ‘जनशक्ती’ला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात अन् देशात सत्ता असणाऱ्या भाजपलाही दक्षिणचे ‘मैत्रिपर्व’ जपण्याच्या नादात अनेक चांगले उमेदवार व कार्यकर्ते गमवावे लागले. मग त्यातील काहींनी लोकशाही आघाडीला पसंती दिली. तर काहींनी शिवधनुष्य उचलले. काहींनी मात्र, अपक्ष म्हणूनच उभे राहणे पसंत केले. समन्वयाच्या अभावामुळे प्रभाग सहामधील एका महिला उमेदवाराने नेत्यांच्या परस्पर अर्ज मागे घेतला. अर्जातील त्रुटीमुळे एक अर्ज बाद झाला. तर जिल्हाभर प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने नाईलाजास्तव जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांनी आपला अर्ज मागे काढून घेतला. पण समोरचा उमेदवार बिनविरोध होणार नाही, याची काळजीही घेतली. या निवडणुकीत भाजपने काय कमावलं हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अनेक वर्षे हुकूमत गाजविणारी ‘लोकशाही आघाडी’ मात्र या निवडणुकीत एकाकी पडलेली दिसली. तरीही चिकाटी, समन्वय, योग्य नियोजन या जोरावर त्यांनी स्वत:चा हुकमी पट्ट्याबरोबर शहरात २२ ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. अन् प्रभाग अकरामधून रत्ना विभुते या महिला उमेदवाराला पुरस्कृत करीत रिंगणात उतरविले आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांचे नेहमीचेच ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाल्याने त्यांचे मतदारांच्या घरीच चहापान सुरू दिसतेय. पण या सगळ्या घडामोडीत आघाडी किंवा पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी मांडलेली गणितं बिघडली आहेत. ‘भोसले’ घराघरात ‘घुसले’ भाजपने पंधरा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. पहिल्यांदाच पक्षीय चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या डॉ. अतुल भोसले यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे भोसलेंच्या कृष्णा उद्योग समूहात कार्यरत असणारे मतदार नागरिक जणू या प्रचारासाठी घराघरात घुसल्याची चर्चा आहे. ‘पतंगा’शिवाय ‘जनशक्ती’ ‘पतंग’ अन् ‘जनशक्ताी’ असे कऱ्हाडच्या निवडणुकीत सुमारे पंधरा वर्षे समीकरण झाले होते. सुरुवातीच्या पंचवार्षिकनंतर ‘जनशक्ती’ विसकटल्याने त्यांचा विजयाचा ‘पतंग’ फारसा उडला नाही. पण, आज विसकटलेली जनशक्ती एकवटलेली असताना त्यांना ‘यशवंत’ करण्यासाठी ‘पतंग’ आजबरोबर नाही. त्यांना ‘नारळ’ हे चिन्ह नव्याने मिळाले असून, हे ‘श्रीफळ’ आता मतदारांच्या घरापर्यंत कसे पोहोचविणार यावर बरेच काही अवलंबून आहे, अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे. उमेदवारी बदलली.. पण पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती आघाडीने काही प्रभागात दोन इच्छुकांना एबी फॉर्म दिले. त्यातील प्रथम पसंतीचा एबी फॉर्म दिलेल्या तीन उमेदवारांना ऐनवेळी नेत्यांनी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यात नगरसेवक श्रीकांत मुळे यांच्या पत्नी दीपाली मुळे, अशोकराव पाटील व सुनील शिंदे यांचा समावेश आहे. यांनी नेत्यांचा मान राखला खरा; पण नेत्यांनी सगळं काही अलबेल झालं, असे समजण्याची गरज नाही.