शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनधरणी फिसकटली; गणितं विसकटली!

By admin | Updated: November 13, 2016 23:58 IST

कऱ्हाड पालिका निवडणूक : ‘बंडोबां’नी वाढविली नेत्यांची डोकेदुखी; समन्वयाच्या अभावामुळे गोंधळात गोंधळ

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपानंतर चांगलीच रंगत येऊ लागली आहे. सध्यातरी कऱ्हाडच्या या निवडणुकीवर संधीसाधू राजकारणाचीच छटा असल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू असून, ऐनवेळी बंडखोरांची मनधरणी करण्याची चर्चा फिसकटल्याने आता राजकीय सारीपाटावरील विजयाची मांडलेली गणितेही विसकटलेली आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीचं कऱ्हाडच चित्र सध्या नागरिकांच्या दृष्टीनं गोंधळात गोंधळ वाढविणारच आहे. निवडणूक जनशक्ती अन् लोकशाही आघाडीची टक्कर हे समीकरण कऱ्हाडकरांना परिचित आहे. पण, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटना नव्याने समोर आल्या आहेत. त्या म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रथमच या निवडणुकीत उतरले असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. माजीमंत्री विलासराव पाटील- उंडाळकरांनी प्रथमच कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी या निवडणुकीत उतरविली आहे. ‘एमआयएम’सारखा पक्ष प्रथमच रिंगणात उतरला आहे. भाजपने प्रथमच पक्षीय पातळीवर जास्तीत जास्त उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरली आहे. तर लोकशाही आघाडी नेहमीप्रमाणे रिंगणात आहे. या आणि इतर अनेक बाबीवरून इथली निवडणूक वेगळी रंगत आणणारी ठरेल, असे वाटत असताना पडद्यामागे घडलेल्या अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे. भाजप, सेना, एमआयएम यांनी पक्षीय झेंडे खांद्यावर घेतल्यानंतर या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादीही पक्षीय चिन्हावर लढणे पसंत करेल, असे वाटत होते. मात्र, या दोन्ही पक्षांनी ‘आघाडी’ करण्यावरच भर दिला. जुनी ‘जनशक्ती’ एकवटल्याने पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर इच्छुकांची गर्दी वाढली. त्यातून उमेदवार निश्चित करताना नेत्यांचा कस लागला. अन् अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत हा घोळ मिटता मिटला नाही. म्हणूनच आज ‘जनशक्ती’ला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात अन् देशात सत्ता असणाऱ्या भाजपलाही दक्षिणचे ‘मैत्रिपर्व’ जपण्याच्या नादात अनेक चांगले उमेदवार व कार्यकर्ते गमवावे लागले. मग त्यातील काहींनी लोकशाही आघाडीला पसंती दिली. तर काहींनी शिवधनुष्य उचलले. काहींनी मात्र, अपक्ष म्हणूनच उभे राहणे पसंत केले. समन्वयाच्या अभावामुळे प्रभाग सहामधील एका महिला उमेदवाराने नेत्यांच्या परस्पर अर्ज मागे घेतला. अर्जातील त्रुटीमुळे एक अर्ज बाद झाला. तर जिल्हाभर प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने नाईलाजास्तव जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांनी आपला अर्ज मागे काढून घेतला. पण समोरचा उमेदवार बिनविरोध होणार नाही, याची काळजीही घेतली. या निवडणुकीत भाजपने काय कमावलं हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अनेक वर्षे हुकूमत गाजविणारी ‘लोकशाही आघाडी’ मात्र या निवडणुकीत एकाकी पडलेली दिसली. तरीही चिकाटी, समन्वय, योग्य नियोजन या जोरावर त्यांनी स्वत:चा हुकमी पट्ट्याबरोबर शहरात २२ ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. अन् प्रभाग अकरामधून रत्ना विभुते या महिला उमेदवाराला पुरस्कृत करीत रिंगणात उतरविले आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांचे नेहमीचेच ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाल्याने त्यांचे मतदारांच्या घरीच चहापान सुरू दिसतेय. पण या सगळ्या घडामोडीत आघाडी किंवा पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी मांडलेली गणितं बिघडली आहेत. ‘भोसले’ घराघरात ‘घुसले’ भाजपने पंधरा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. पहिल्यांदाच पक्षीय चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या डॉ. अतुल भोसले यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे भोसलेंच्या कृष्णा उद्योग समूहात कार्यरत असणारे मतदार नागरिक जणू या प्रचारासाठी घराघरात घुसल्याची चर्चा आहे. ‘पतंगा’शिवाय ‘जनशक्ती’ ‘पतंग’ अन् ‘जनशक्ताी’ असे कऱ्हाडच्या निवडणुकीत सुमारे पंधरा वर्षे समीकरण झाले होते. सुरुवातीच्या पंचवार्षिकनंतर ‘जनशक्ती’ विसकटल्याने त्यांचा विजयाचा ‘पतंग’ फारसा उडला नाही. पण, आज विसकटलेली जनशक्ती एकवटलेली असताना त्यांना ‘यशवंत’ करण्यासाठी ‘पतंग’ आजबरोबर नाही. त्यांना ‘नारळ’ हे चिन्ह नव्याने मिळाले असून, हे ‘श्रीफळ’ आता मतदारांच्या घरापर्यंत कसे पोहोचविणार यावर बरेच काही अवलंबून आहे, अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे. उमेदवारी बदलली.. पण पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती आघाडीने काही प्रभागात दोन इच्छुकांना एबी फॉर्म दिले. त्यातील प्रथम पसंतीचा एबी फॉर्म दिलेल्या तीन उमेदवारांना ऐनवेळी नेत्यांनी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यात नगरसेवक श्रीकांत मुळे यांच्या पत्नी दीपाली मुळे, अशोकराव पाटील व सुनील शिंदे यांचा समावेश आहे. यांनी नेत्यांचा मान राखला खरा; पण नेत्यांनी सगळं काही अलबेल झालं, असे समजण्याची गरज नाही.