शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

मान्सूनचा पाऊस चक्क पूर्वेकडून जिल्ह्यात

By admin | Updated: June 20, 2016 00:33 IST

नाले-बंधारे तुडुंब : माण, खटाव, फलटणला जोरदार हजेरी, अनेक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित, ठिकठिकाणी झाडे पडली

सातारा : केरळनंतर, विदर्भमार्गे राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. रविवारी हा पाऊस माण, खटाव, फलटण तालुक्यात पडत सायंकाळी साताऱ्यात दाखल झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सायंकाळी सातारा शहरात रिमझिम पाऊस झाला. दुष्काळी माण, खटाव तालुक्यांत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. दरम्यान, महाबळेश्वरला संततधार सुरू होती. मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. अनेक गावांतील बंधारे भरले, ओढ्यांना पाणी वाहिले. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. आता पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदवले : गोंदवले व परिसरातही पाऊस झाला. सर्व रस्त्यावरून पाणी वाहत होते. हा पाऊस पेरणीस उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड शहर व आजूबाजूच्या गावांमध्येही पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) महाबळेश्वरमध्ये दिवसभर संततधार... महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे पावसास सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपासून पावसाची संततधार होती. शनिवार-रविवार असल्यामुळे पुणे, मुबंईच्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. पर्यटकांच्या वाहनांची वेण्णा लेक रोडवर लाबंचलांब रांगा लागलेल्या होत्या. महाबळेश्वरात पाऊस व धुके पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक बाजरपेठमधील गरमागरम मक्याची कणसे खाताना दिसत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा... खटाव : खटाव व परिसरात रविवारी झालेल्या पावसामुळे ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. चालूवर्षी पाऊस वेळेत सुरू होणार या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र पावसाने ओढ दिली. त्यामुळे सर्वजण चिंतेत असतानाच रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. या पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली आहे. या पावसामुळे आता पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. औंध परिसरात सर्वत्र पाणीच पाणी... औंध : रविवारी खटाव तालुक्यातील औंध परिसरात धुव्वाधार पाऊस झाला. या पावसाने परिसरास झोडपून काढले. दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने औंध, नांदोशी, त्रिमली, खबालवाडी, गणेशवाडी, जायगाव व अन्य भागांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मागील तीन-चार दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. तसेच ढगाळ वातावरणही होते. रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने शेतांमध्ये, बंधारे, ओढ्या-नाल्यातून पाणी खळाळून वाहिले. या पावसाने खरिपाच्या पेरणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही गावांमध्ये पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आणखी दमदार पाऊस झाला तर औंध परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाईही आटोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाने वेळेवर सुरुवात केल्याने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी बंधाऱ्यात काहीप्रमाणात साठा झाला होता. रविवारचा पाऊसही फायदेशीर आहे. (वार्ताहर)