शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
4
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
5
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
6
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
7
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
8
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
9
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
10
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
11
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
12
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
13
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
14
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
15
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
16
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
17
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
18
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
19
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
20
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता

जिल्ह्यात मेघगर्जनेसह मान्सून बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:02 IST

सातारा : शहरासह जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वाई तालुक्यातील बदेवाडी येथे बाभळीचे मोठे झाड महावितरणच्या हायटेन्शन तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी ...

सातारा : शहरासह जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वाई तालुक्यातील बदेवाडी येथे बाभळीचे मोठे झाड महावितरणच्या हायटेन्शन तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी येथे पंधरा मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत.साताºयासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली.जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झोडपून काढले. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रविवारी बाजार असल्याने बाजारकरूंची चांगलीच तारांबळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली. शहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.फलटण शहर व परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला होता.फलटणकर कडक उन्हाळा आणि उष्मामुळे हैराण झाले असताना रविवारी अचानक वादळी वाºयासह आणि गारांसह १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात आलेल्या शेतकरी व नागरिकांची त्रेधा उडाली.