शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मेघगर्जनेसह मान्सून बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:02 IST

सातारा : शहरासह जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वाई तालुक्यातील बदेवाडी येथे बाभळीचे मोठे झाड महावितरणच्या हायटेन्शन तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी ...

सातारा : शहरासह जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वाई तालुक्यातील बदेवाडी येथे बाभळीचे मोठे झाड महावितरणच्या हायटेन्शन तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी येथे पंधरा मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत.साताºयासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली.जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झोडपून काढले. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रविवारी बाजार असल्याने बाजारकरूंची चांगलीच तारांबळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली. शहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.फलटण शहर व परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला होता.फलटणकर कडक उन्हाळा आणि उष्मामुळे हैराण झाले असताना रविवारी अचानक वादळी वाºयासह आणि गारांसह १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात आलेल्या शेतकरी व नागरिकांची त्रेधा उडाली.