शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पैसे खात्यात... मुलं शहरात !

By admin | Updated: July 10, 2015 00:38 IST

खंडाळा तालुका : उद्योगधंद्यांमुळे जमिनीला सोन्याचा भाव

सुनीता नलवडे -लोहोम -खंडाळा तालुक्यात महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. नवनवीन उद्योगधंदे या भागात उभे राहत असल्यामुळे उद्योगदारांकडून चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी विकून मिळणारे पैसे खात्यात टाकत आहेत. तसेच शेती तोट्यात जात असल्यामुळे तरुणपिढी गाव सोडून शहरात शिक्षणासाठी राहत असून पालक त्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहेत. त्यामुळे पैसे खात्यात अन् मुलं शहरात असे चित्र पाहायला मिळत आहे.पाण्याशिवाय शेती पिकू शकत नाही. लहरी पावसामुळे शेती तोट्यात चालली आहे. घरसंसार चालविण्यासाठी गाव सोडून शहरात नोकरीधंद्यासाठी जावे लागत आहे. इच्छा असून मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही, अशा अनेक प्रश्न सतत डोक्यात घर करून राहत असल्यामुळे हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. एकीकडे तोट्यात चाललेली शेती अन् दुसरीकडे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आलेले सोन्याचे भाव यामुळे शेतकरी कसलाही विचार न करता आपल्या जमिनी विकून मोकळा होत आहे. चांगलं जीवन जगता यावं, यासाठी पैशांची असलेली गरज यामुळे भागत आहे. तसेच मुलांनाही चांगले शिक्षण देण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी उद्योगांना जमिनी विकत आहेत.विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेती कसण्यासाठी घरात मनुष्यबळ पुरेसे राहिलेले नाही, हेदेखील एक कारण जमीन विकण्यामागे असल्याचे दिसते. मनुष्यबळ कमी आणि जमीन जास्त असलेले शेतकरी जमिनी विकून पैसे बँकेत ठेवत आहेत. जमिनीच्या पैशावर चांगला बंगला अन् व्याजावर घरखर्च भागवायचा. मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवायचे हीच परिस्थिती सध्या शिरवळ, सांगवी, नायगाव, जवळे, कवठे, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी तसेच खंडाळा तालुक्यातील प्रत्येक खेड्यात दिसून येत आहे. शहरातील बिल्डर खेड्यात जमिनी घेतात. तिथे इमारती बांधून किंवा प्लॉट पाडून वाढीव दराने विकतात. अशा प्रकारे ग्रामीण भागाचे चित्र पालटलेले पाहायला मिळत आहे. गावपण राहिलं नाहीमहामार्गालगत पूर्वी असणाऱ्या वाड्यावस्त्यांवरील जीवन आता पूर्णपणे बदलून गेले आहे. विविध कंपन्या या भागात आल्यामुळे उद्योजक चांगला भाव देऊन शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते एवढे पैसे शेतकऱ्यांचे हातात एकदम मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहेत. साध्या कुडामेडीच्या, कौलाच्या, पत्र्याच्या घरातून शेतकरी आता बंगल्यात राहू लागला आहे. त्यामुळे खेड्यांचे रूपडे पार बदलून गेले आहे.खेड्यांचा भौतिक विकास झाला असला तरी माणसांविना खेडी ओस पडू लागली आहेत. जमिनी विकल्यामु ळे तरुणपिढी शहरात नोकरीधंदा, शिक्षणासाठी राहू लागली आहे. त्यामुळे गावाकडे बांधलेल्या बंगल्यात आजी-आजोबा, म्हातारी माणसं राहत असल्याचे दिसत आहे.