शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पैसे खात्यात... मुलं शहरात !

By admin | Updated: July 10, 2015 00:38 IST

खंडाळा तालुका : उद्योगधंद्यांमुळे जमिनीला सोन्याचा भाव

सुनीता नलवडे -लोहोम -खंडाळा तालुक्यात महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. नवनवीन उद्योगधंदे या भागात उभे राहत असल्यामुळे उद्योगदारांकडून चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी विकून मिळणारे पैसे खात्यात टाकत आहेत. तसेच शेती तोट्यात जात असल्यामुळे तरुणपिढी गाव सोडून शहरात शिक्षणासाठी राहत असून पालक त्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहेत. त्यामुळे पैसे खात्यात अन् मुलं शहरात असे चित्र पाहायला मिळत आहे.पाण्याशिवाय शेती पिकू शकत नाही. लहरी पावसामुळे शेती तोट्यात चालली आहे. घरसंसार चालविण्यासाठी गाव सोडून शहरात नोकरीधंद्यासाठी जावे लागत आहे. इच्छा असून मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही, अशा अनेक प्रश्न सतत डोक्यात घर करून राहत असल्यामुळे हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. एकीकडे तोट्यात चाललेली शेती अन् दुसरीकडे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आलेले सोन्याचे भाव यामुळे शेतकरी कसलाही विचार न करता आपल्या जमिनी विकून मोकळा होत आहे. चांगलं जीवन जगता यावं, यासाठी पैशांची असलेली गरज यामुळे भागत आहे. तसेच मुलांनाही चांगले शिक्षण देण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी उद्योगांना जमिनी विकत आहेत.विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेती कसण्यासाठी घरात मनुष्यबळ पुरेसे राहिलेले नाही, हेदेखील एक कारण जमीन विकण्यामागे असल्याचे दिसते. मनुष्यबळ कमी आणि जमीन जास्त असलेले शेतकरी जमिनी विकून पैसे बँकेत ठेवत आहेत. जमिनीच्या पैशावर चांगला बंगला अन् व्याजावर घरखर्च भागवायचा. मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवायचे हीच परिस्थिती सध्या शिरवळ, सांगवी, नायगाव, जवळे, कवठे, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी तसेच खंडाळा तालुक्यातील प्रत्येक खेड्यात दिसून येत आहे. शहरातील बिल्डर खेड्यात जमिनी घेतात. तिथे इमारती बांधून किंवा प्लॉट पाडून वाढीव दराने विकतात. अशा प्रकारे ग्रामीण भागाचे चित्र पालटलेले पाहायला मिळत आहे. गावपण राहिलं नाहीमहामार्गालगत पूर्वी असणाऱ्या वाड्यावस्त्यांवरील जीवन आता पूर्णपणे बदलून गेले आहे. विविध कंपन्या या भागात आल्यामुळे उद्योजक चांगला भाव देऊन शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते एवढे पैसे शेतकऱ्यांचे हातात एकदम मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहेत. साध्या कुडामेडीच्या, कौलाच्या, पत्र्याच्या घरातून शेतकरी आता बंगल्यात राहू लागला आहे. त्यामुळे खेड्यांचे रूपडे पार बदलून गेले आहे.खेड्यांचा भौतिक विकास झाला असला तरी माणसांविना खेडी ओस पडू लागली आहेत. जमिनी विकल्यामु ळे तरुणपिढी शहरात नोकरीधंदा, शिक्षणासाठी राहू लागली आहे. त्यामुळे गावाकडे बांधलेल्या बंगल्यात आजी-आजोबा, म्हातारी माणसं राहत असल्याचे दिसत आहे.