शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

मोहितेंपासून पवारांपर्यंत.. जोडणारा दुवा निखळला- सातारा कार्यकर्त्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:03 IST

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते ...

ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावरही शोककळा

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते यांच्यापासून खासदार शरद पवार यांच्यापर्यंत जोडणारा दुवाच निखळला.

सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत पतंगराव मोठे झाले.

त्यांनी राजकारण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अफाट यश मिळविले. तरी देखील रयत शिक्षण संस्थेशी जोडलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत टिकून राहिली. ९ मे चा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असो अथवा २२ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा या कार्यक्रमांना खासदार शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम या सोहळ्याला उपस्थित राहत असत.

साहजिकच, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगायचा. एखादा घरगुती सोहळा असावा, अगदी त्याच पद्धतीने हे दोघेही नेते या सोहळ्यात वावरताना पाहायला मिळायचे. आता पतंगराव कदमांविना हे कार्यक्रम होताना पाहायला लागणार आहे. मागील ९ मेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलायला उठले. त्यांचे भाषण ऐकत असतानाच पतंगराव रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कानात काही हितगुज करत होते.

काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असते. मात्र पतंगराव कदम जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असायचे, तेव्हा हा वाद कुठल्या कुठे लुप्त झालेला असायचा. काँगे्रसमधील अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पतंगरावांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार व्हायचे. कार्यकर्ते कटतट विसरुन जात असत.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू होती, तेव्हा मोठे बंधू मोहनराव कदम यांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्यासाठी कणखर भाऊ सर्वांनी पाहिला. सर्वच पक्षांत असलेले संबंध आणि राजकारणातल्या चाली यशस्वीरीत्या खेळून या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत काहीही करून यश संपादन करण्यासाठी पतंगराव कदम यांची धडपड जिल्ह्याने पाहिली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने समाजकारण आणि राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे. ते शिक्षण व सहकार क्षेत्रांतील अग्रणी नेते होते. त्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात ते ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री अणि निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डॉ. पतंगरावांचा मला मोठा आधार होता. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. त्यानंतरही माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. त्यामुळे माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो युवक-युवतींना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज पतंगराव कदम यांनी जर शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले नसते तर अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. त्यांनी या माध्यमातून हजारो संसार उभे केले.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री