शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मोहितेंपासून पवारांपर्यंत.. जोडणारा दुवा निखळला- सातारा कार्यकर्त्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:03 IST

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते ...

ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावरही शोककळा

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते यांच्यापासून खासदार शरद पवार यांच्यापर्यंत जोडणारा दुवाच निखळला.

सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत पतंगराव मोठे झाले.

त्यांनी राजकारण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अफाट यश मिळविले. तरी देखील रयत शिक्षण संस्थेशी जोडलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत टिकून राहिली. ९ मे चा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असो अथवा २२ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा या कार्यक्रमांना खासदार शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम या सोहळ्याला उपस्थित राहत असत.

साहजिकच, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगायचा. एखादा घरगुती सोहळा असावा, अगदी त्याच पद्धतीने हे दोघेही नेते या सोहळ्यात वावरताना पाहायला मिळायचे. आता पतंगराव कदमांविना हे कार्यक्रम होताना पाहायला लागणार आहे. मागील ९ मेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलायला उठले. त्यांचे भाषण ऐकत असतानाच पतंगराव रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कानात काही हितगुज करत होते.

काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असते. मात्र पतंगराव कदम जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असायचे, तेव्हा हा वाद कुठल्या कुठे लुप्त झालेला असायचा. काँगे्रसमधील अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पतंगरावांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार व्हायचे. कार्यकर्ते कटतट विसरुन जात असत.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू होती, तेव्हा मोठे बंधू मोहनराव कदम यांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्यासाठी कणखर भाऊ सर्वांनी पाहिला. सर्वच पक्षांत असलेले संबंध आणि राजकारणातल्या चाली यशस्वीरीत्या खेळून या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत काहीही करून यश संपादन करण्यासाठी पतंगराव कदम यांची धडपड जिल्ह्याने पाहिली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने समाजकारण आणि राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे. ते शिक्षण व सहकार क्षेत्रांतील अग्रणी नेते होते. त्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात ते ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री अणि निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डॉ. पतंगरावांचा मला मोठा आधार होता. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. त्यानंतरही माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. त्यामुळे माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो युवक-युवतींना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज पतंगराव कदम यांनी जर शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले नसते तर अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. त्यांनी या माध्यमातून हजारो संसार उभे केले.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री