शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मोहितेंपासून पवारांपर्यंत.. जोडणारा दुवा निखळला- सातारा कार्यकर्त्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:03 IST

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते ...

ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावरही शोककळा

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते यांच्यापासून खासदार शरद पवार यांच्यापर्यंत जोडणारा दुवाच निखळला.

सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत पतंगराव मोठे झाले.

त्यांनी राजकारण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अफाट यश मिळविले. तरी देखील रयत शिक्षण संस्थेशी जोडलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत टिकून राहिली. ९ मे चा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असो अथवा २२ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा या कार्यक्रमांना खासदार शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम या सोहळ्याला उपस्थित राहत असत.

साहजिकच, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगायचा. एखादा घरगुती सोहळा असावा, अगदी त्याच पद्धतीने हे दोघेही नेते या सोहळ्यात वावरताना पाहायला मिळायचे. आता पतंगराव कदमांविना हे कार्यक्रम होताना पाहायला लागणार आहे. मागील ९ मेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलायला उठले. त्यांचे भाषण ऐकत असतानाच पतंगराव रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कानात काही हितगुज करत होते.

काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असते. मात्र पतंगराव कदम जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असायचे, तेव्हा हा वाद कुठल्या कुठे लुप्त झालेला असायचा. काँगे्रसमधील अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पतंगरावांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार व्हायचे. कार्यकर्ते कटतट विसरुन जात असत.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू होती, तेव्हा मोठे बंधू मोहनराव कदम यांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्यासाठी कणखर भाऊ सर्वांनी पाहिला. सर्वच पक्षांत असलेले संबंध आणि राजकारणातल्या चाली यशस्वीरीत्या खेळून या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत काहीही करून यश संपादन करण्यासाठी पतंगराव कदम यांची धडपड जिल्ह्याने पाहिली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने समाजकारण आणि राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे. ते शिक्षण व सहकार क्षेत्रांतील अग्रणी नेते होते. त्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात ते ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री अणि निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डॉ. पतंगरावांचा मला मोठा आधार होता. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. त्यानंतरही माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. त्यामुळे माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो युवक-युवतींना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज पतंगराव कदम यांनी जर शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले नसते तर अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. त्यांनी या माध्यमातून हजारो संसार उभे केले.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री