शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मोहितेंपासून पवारांपर्यंत.. जोडणारा दुवा निखळला- सातारा कार्यकर्त्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:03 IST

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते ...

ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावरही शोककळा

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते यांच्यापासून खासदार शरद पवार यांच्यापर्यंत जोडणारा दुवाच निखळला.

सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत पतंगराव मोठे झाले.

त्यांनी राजकारण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अफाट यश मिळविले. तरी देखील रयत शिक्षण संस्थेशी जोडलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत टिकून राहिली. ९ मे चा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असो अथवा २२ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा या कार्यक्रमांना खासदार शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम या सोहळ्याला उपस्थित राहत असत.

साहजिकच, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगायचा. एखादा घरगुती सोहळा असावा, अगदी त्याच पद्धतीने हे दोघेही नेते या सोहळ्यात वावरताना पाहायला मिळायचे. आता पतंगराव कदमांविना हे कार्यक्रम होताना पाहायला लागणार आहे. मागील ९ मेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलायला उठले. त्यांचे भाषण ऐकत असतानाच पतंगराव रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कानात काही हितगुज करत होते.

काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असते. मात्र पतंगराव कदम जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असायचे, तेव्हा हा वाद कुठल्या कुठे लुप्त झालेला असायचा. काँगे्रसमधील अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पतंगरावांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार व्हायचे. कार्यकर्ते कटतट विसरुन जात असत.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू होती, तेव्हा मोठे बंधू मोहनराव कदम यांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्यासाठी कणखर भाऊ सर्वांनी पाहिला. सर्वच पक्षांत असलेले संबंध आणि राजकारणातल्या चाली यशस्वीरीत्या खेळून या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत काहीही करून यश संपादन करण्यासाठी पतंगराव कदम यांची धडपड जिल्ह्याने पाहिली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने समाजकारण आणि राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे. ते शिक्षण व सहकार क्षेत्रांतील अग्रणी नेते होते. त्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात ते ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री अणि निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डॉ. पतंगरावांचा मला मोठा आधार होता. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. त्यानंतरही माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. त्यामुळे माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो युवक-युवतींना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज पतंगराव कदम यांनी जर शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले नसते तर अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. त्यांनी या माध्यमातून हजारो संसार उभे केले.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री