शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

मोदींविरोधात समविचारींना घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:01 IST

कºहाड : ‘मोदी सरकारने निवडणूक आयोग, न्यायालय, लोकशाही संस्था आदींचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू केले आहे. याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार हटविणारच आहोत. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची आघाडी ही समविचारी आणि धर्मनिरपेक्षता मानणाºया पक्षांची असेल. त्यांनासोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत,’ ...

कºहाड : ‘मोदी सरकारने निवडणूक आयोग, न्यायालय, लोकशाही संस्था आदींचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू केले आहे. याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार हटविणारच आहोत. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची आघाडी ही समविचारी आणि धर्मनिरपेक्षता मानणाºया पक्षांची असेल. त्यांनासोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.कºहाड येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदींची उपस्थिती होती.चव्हाण पुढे म्हणाले, ‘भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. लोकांना स्वप्ने दाखवित आहेत. मात्र, आता लोकांच्याही सत्य परिस्थिती लक्षात येत आहे.गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षाने अंमलात आणलेल्या योजनांची नावे मोदी सरकारने बदलेली आहेत. आता लोकसभेत बहुमत असणाºया भाजपला पुढील काही महिन्यांत राज्यसभेतही बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आतापेक्षा अधिक मनमानी कारभार सुरू करतील.याची जाणीव झाल्यामुळेच विरोधी पक्ष त्यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीविरुद्ध एकत्र येऊ लागले आहेत.’शिवसेना, तेलगू येथील जुने मित्रपक्षही मोदींच्या एकाधिकारशाहीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे येणाºया २०१९ मध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान मोदींच्यापुढे उभे राहिले आहे. गुजरात तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पातळी सोडून मोदींनी माजी पंतप्रधानांवर टीका केली. हे तेथील जनतेलाही आवडले नाही. नोटाबंदीच्या अनावश्यक निर्णयानंतर बेरोजगारी वाढली, हजारो उद्योगधंदे बुडाले, लाखो लोक बेरोजगार झाले. मोदी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. परंतु कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला की त्याला क्लिनचिट दिली जाते.‘जनशक्ती’कडून विश्वासघात..‘जनशक्ती’चे नगरसेवक भाजपा नेत्यांच्या कार्यक्रमात दिसतात. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांना छेडले असता, ‘जनशक्ती’च्या नगरसेवकांनी आपला विश्वासघात केला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्यातील कोणाची किती कुणाशी जवळीक वाढली आहे, याची माहिती मी घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.फडणवीसांचे सरकार हे क्लिनचिटचेराज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे क्लिनचिटचे सरकार आहे. भाजपच्या मंत्र्यांवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना क्लिनचिट देण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांनी दुसरे काही केले नाही. त्यामुळे फडणवीस सरकार हे क्लिनचिट देणारे सरकार आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.अजून दोन-तीन राज्यमंत्री दिले तरी फरक पडत नाहीकºहाड दक्षिणेत भाजपने दोघांना राज्यमंत्री पदे दिली आहेत. याबाबत तुमचं काय मत आहे? असा प्रश्न चव्हाण यांना विचारताच अजून दोन-तीन राज्यमंत्री पदे दिली तरी फरक पडत नाही. जर पक्ष निवडूनच येणार नसेल तर या पदांचा काय उपयोग, असा प्रश्नही त्यांनी यावेळी माध्यमांना केला.मलकापूरची निवडणूक विकासकामावरचहोऊ घातलेली मलकापूरची निवडणूक आम्ही विकासकामाचे मुद्दे नागरिकांसमोर मांडून लढविणार आहोत. आजवर केलेली विकासकामे आणि भविष्यात करणारी विकासकामे लोकांना पटवून देऊ, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.मनोमिलनाबाबत निवडणूक लागल्यावर बोलू कीमलकापूर निवडणुकीत बाबा-काका मनोमिलन होणार असल्याची चर्चा आहे, याबाबत खरं काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मनोमिलनावर निवडणूक जाहीर झाल्यावर बोलू की, एवढच उत्तर हसत-हसत देणं चव्हाण यांनी पसंद केलं.