शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अर्थव्यवस्था ढासळत असताना केंद्राकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

औंध : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणी येत आहेत. विनाअनुदानित शाळा, संस्थेच्या इमारतींची वीजबिले, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर लवकरच निर्णय घेतला ...

औंध : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणी येत आहेत. विनाअनुदानित शाळा, संस्थेच्या इमारतींची वीजबिले, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अर्थव्यवस्था ढासळत असताना आकडेवारी बोगस देऊन दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकार करत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

खटाव तालुक्यातील येळीव येथील हरणाई सहकारी सूतगिरणीवर शिक्षक संस्थाचालक, शिक्षक मतदार आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अजितराव चिखलीकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अशोक गोडसे, राजेंद्र शेलार, डॉ. विवेक देशमुख, डॉ. महेश गुरव, संजीव साळुंखे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. आपली स्पर्धा परदेशी तंत्रज्ञानाशी असल्याने शिक्षण क्षेत्रावर प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे.’

आमदार आसगावकर म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिक्षक आणि संस्थाचालक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. जुन्या पेन्शन योजनेत असणाऱ्या त्रुटी दूर केल्या आहेत.’

रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘एकदिलाने मिळून सर्वांनी काम केल्याने पुणे विभाग मतदारसंघात घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये माण-खटावच्या मतदारांचा मोठा वाटा आहे.’

यावेळी प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे, सुरेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी राजाभाऊ देशमुख, राजू मुलाणी, भरत जाधव, परेश जाधव, विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, टिल्लू बागवान, सत्यवान कांबळे, तानाजी बागल, गोविंद भंडारे, सचिन घाडगे, प्रमोद राऊत, राजेंद्र जगदाळे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, संस्थाचालक उपस्थित होते.

चौकट :

उरमोडीच्या पाण्याचे श्रेय केवळ पृथ्वीराज बाबांचेच

‘कोणीही उठसूट उरमोडीच्या पाण्याचे श्रेय घेत आहे. हे पाणी दुष्काळी शिवारात फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच आले आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेण्याचा खटाटोप करू नये, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

फोटो

येळीव येथील हरणाई सूतगिरणीवर आयोजित शिक्षक संस्थाचालक, शिक्षकांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, रणजितसिंह देशमुख, प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे, सुरेश जाधव उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)