शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी भीक मागणार नाही

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

सदाभाऊ खोत : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लाल दिव्याची गरज नाही

औंध : ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लाल दिव्याची गरज नाही, छातीवरील बिल्ला हाच मोठा लाल दिवा आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शासनाकडे भीक मागणार नाही,’ असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.औंध येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख संजय भगत, तानाजी देशमुख, अनिल पवार, दत्तात्रय घार्गे, नितीन शिंदे, विनोद खराडे, महादेव जाधव, संतोष येवले, नामदेव पाटील, गणेश येवले, सागर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जिथे दुर्लक्ष करेल, तिथे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. अद्यापही काही कारखाने एफआरपी रक्कम देण्याबाबत टाळाटाळ करत आहेत; मात्र ती रक्कम त्यांना द्यावीच लागेल. मंत्रिपदाबाबत सरकार घटक पक्षांना वंचित ठेवत आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी शासनाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी ठाम भूमिका घेतली. आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला मंत्रिपदाची गरज नाही व त्याचे प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले तर आम्ही गप्प बसणार नाही,’ असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)