शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

मंत्रिपदासाठी भीक मागणार नाही

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

सदाभाऊ खोत : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लाल दिव्याची गरज नाही

औंध : ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लाल दिव्याची गरज नाही, छातीवरील बिल्ला हाच मोठा लाल दिवा आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शासनाकडे भीक मागणार नाही,’ असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.औंध येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख संजय भगत, तानाजी देशमुख, अनिल पवार, दत्तात्रय घार्गे, नितीन शिंदे, विनोद खराडे, महादेव जाधव, संतोष येवले, नामदेव पाटील, गणेश येवले, सागर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जिथे दुर्लक्ष करेल, तिथे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. अद्यापही काही कारखाने एफआरपी रक्कम देण्याबाबत टाळाटाळ करत आहेत; मात्र ती रक्कम त्यांना द्यावीच लागेल. मंत्रिपदाबाबत सरकार घटक पक्षांना वंचित ठेवत आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी शासनाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी ठाम भूमिका घेतली. आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला मंत्रिपदाची गरज नाही व त्याचे प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले तर आम्ही गप्प बसणार नाही,’ असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)