शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद दिलं त्यांचीच पक्षाशी गद्दारी !

By admin | Updated: September 3, 2016 01:05 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरात कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा मेळावा

मलकापूर : कऱ्हाड दक्षिणमध्ये गेली ३५ वर्षे पक्षाने सत्ता व मंत्रिपद दिले. मात्र त्यांनीच वेळोवेळी पक्षाशी गद्दारी केली. तर दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या घरातील व्यक्तींनी विचारवंतांच्या विचाराशी गद्दारी करीत जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने विधानसभा निवडणुकीत केले. कोणताही भेदभाव न करता मी देता येईल तेवढे दिले. भविष्यातही देणार. माझी दारे जनतेसाठी सदैव खुली आहेत. आगामी निवडणुका एक ताकदीने लढवूया,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कऱ्हाड दक्षिण काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक अभय छाजेड, तौफिक मुलाणी, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, विजयराव कणसे, अधिकराव पाटील, राजेंद्र चव्हाण, जयवंत जगताप, मलकापूरच्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, उदय थोरात, आर. टी. स्वामी आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, ‘मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यभर कारभार सांभाळताना कऱ्हाडकडे थोडे दुर्लक्ष झाले, हे मला मान्य आहे. मात्र, माझ्या गैरहजेरीतही तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. जनाधाराची घमेंड उतरली. कऱ्हाड दक्षिणमधे जे ३५ वर्षांत जमले नाही, ते केवळ चार वर्षांत करून दाखवले. कोट्यवधीची कामे सुरू आहेत. कोणताही भेदभाव न करता गरज असेल तिथे काम दिले ही सर्व कामे पूर्ण होणारच.’ निरीक्षक अभय छाजेड म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या कामाचा तळागाळापर्यंत प्रसार करा. भाजप सरकारच्या अपयशामुळे राज्यात सध्या विनयभंगात देशात १ नंबर तर अत्याचारात २ नंबर बनले आहे. सध्याचे राज्य व केंद्र सरकार फसवे आहे. अशा फसव्यांचा पाडाव करण्यासाठी संघटित व्हा.’मनोहर शिंदे यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)युवकांना प्रवाहात घेणारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. विकेंद्रीकरणासाठी अनेक नगरपंचायती निर्माण केल्या. १ हजार ७०० कोटींचा निधी कऱ्हाड तालुक्यासाठी दिला. सर्व कामेही मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. हे करीत असतानाच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे, अशी माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.