शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

मंत्रिपद दिलं त्यांचीच पक्षाशी गद्दारी !

By admin | Updated: September 3, 2016 01:05 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरात कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा मेळावा

मलकापूर : कऱ्हाड दक्षिणमध्ये गेली ३५ वर्षे पक्षाने सत्ता व मंत्रिपद दिले. मात्र त्यांनीच वेळोवेळी पक्षाशी गद्दारी केली. तर दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या घरातील व्यक्तींनी विचारवंतांच्या विचाराशी गद्दारी करीत जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने विधानसभा निवडणुकीत केले. कोणताही भेदभाव न करता मी देता येईल तेवढे दिले. भविष्यातही देणार. माझी दारे जनतेसाठी सदैव खुली आहेत. आगामी निवडणुका एक ताकदीने लढवूया,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कऱ्हाड दक्षिण काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक अभय छाजेड, तौफिक मुलाणी, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, विजयराव कणसे, अधिकराव पाटील, राजेंद्र चव्हाण, जयवंत जगताप, मलकापूरच्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, उदय थोरात, आर. टी. स्वामी आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, ‘मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यभर कारभार सांभाळताना कऱ्हाडकडे थोडे दुर्लक्ष झाले, हे मला मान्य आहे. मात्र, माझ्या गैरहजेरीतही तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. जनाधाराची घमेंड उतरली. कऱ्हाड दक्षिणमधे जे ३५ वर्षांत जमले नाही, ते केवळ चार वर्षांत करून दाखवले. कोट्यवधीची कामे सुरू आहेत. कोणताही भेदभाव न करता गरज असेल तिथे काम दिले ही सर्व कामे पूर्ण होणारच.’ निरीक्षक अभय छाजेड म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या कामाचा तळागाळापर्यंत प्रसार करा. भाजप सरकारच्या अपयशामुळे राज्यात सध्या विनयभंगात देशात १ नंबर तर अत्याचारात २ नंबर बनले आहे. सध्याचे राज्य व केंद्र सरकार फसवे आहे. अशा फसव्यांचा पाडाव करण्यासाठी संघटित व्हा.’मनोहर शिंदे यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)युवकांना प्रवाहात घेणारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. विकेंद्रीकरणासाठी अनेक नगरपंचायती निर्माण केल्या. १ हजार ७०० कोटींचा निधी कऱ्हाड तालुक्यासाठी दिला. सर्व कामेही मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. हे करीत असतानाच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे, अशी माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.