शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सातारा पंचायत समितीच्या सभापतिपदी मिलिंद कदम

By admin | Updated: March 14, 2017 17:18 IST

हात उंचावून मतदान : उपसभापतिपदीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच गटाचे जितेंद्र सावंत विजयी

सातारा पंचायत समितीच्या सभापतिपदी मिलिंद कदमहात उंचावून मतदान : उपसभापतिपदीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच गटाचे जितेंद्र सावंत विजयीसातारा : सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली. निवडी झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय परिसरात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी प्रक्रिया सुरू केली. यामध्ये सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला. पुढील प्रक्रियेला दुपारी दोन वाजता पुन्हा सुरुवात झाली. यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या वेळेत सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे मिलिंद कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली. त्याचप्रमाणे उपसभापतिपदासाठी आमदार गटाचे जितेंद्र सावंत यांना अकरा आणि खासदार गटातील रामदास साळुंखे यांना नऊ मते पडली. त्यानंतर कदम आणि सावंत यांना विजयी घोषित केले. निकालापूर्वीच गुलालाची उधळणसातारा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचे अकरा तर सातारा विकास आघाडीचे नऊ सदस्य असे संख्याबळ आहे. त्यामुळे दोन्ही पदे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला मिळणार, हे निश्चित मानले जात होते. हाच आत्मविश्वास कार्यकर्त्यांनाही होता. त्यामुळे मतदान होण्यापूर्वी पंचायत समितीच्या बाहेर कार्यकर्त्यांचा विजयोत्सव साजरा होत होता. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.