शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

दोन सायकलस्वार पोहोचविणार राज्यभर जलक्रांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:43 IST

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणांची कामे केली. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

स्वप्नील शिंदे ।सातारा : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणांची कामे केली. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हाच जलक्रांतीचा संदेश सायकलीवर जलज्योतीच्या माध्यमातून राज्यभर पोहोचविण्याचा विडा खटाव तालुक्यातील गोपूजच्या अतुल पवार व सुशांत गुरव या दोन जलदुतांनी घेतला आहे.

दुष्काळी खटाव तालुक्यातील गोपूज गावच्या राहणारे अतुल पवार व सुशांत गुरव हे दोघे जीवलग मित्र. त्या दोघांना लहानपणापासूनच सायकलस्वारीच्या प्रवासाचे वेड होते. रुळलेल्या वाटांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, त्यांना मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनची माहिती मिळाली. ५ जानेवारीला रात्री दोन वाजता उठून त्यांनी सायकलला टांग मारली, ते तब्बल १७ तासांत ३०० किलोमीटरचा प्रवास करत मुंबईला पोहोचल्यानंतरच सायकलीवरून खाली उतरले. त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आणि अव्वल आले.

तेवढ्यावरच हे दोन सायकलस्वार थांबले नाहीत. दरम्यान, अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला होता. यात या दोघांनी पुढाकार घेत श्रमदान करून जलसंधारणाची कामे केली. दरम्यान, त्यांना पाणी आणि जलसंधारणचे महत्त्व कळाल्याने जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी त्यांनी १७ फेब्रुवारीचा ‘गोपूज-राळेगणसिद्धी-हिवरेबाजार’ हा नवीन सायकल दौरा सुरू झाला. सायकलवर ४८ तास प्रवास करीत ५०० किलोमीटर अंतराचा हा प्रवास केवळ सायकलिंग न करता जलज्योतीच्या माध्यमातून सामाजिक संदेश यात्रा सुरू केली.

दुष्काळी गावांचे प्रेरणास्थान असलेल्या राळेगणसिद्धी-हिवरेबाजार या दोन पाणीदार गावांचा जलसंधारणाचा पॅटर्न सायकल यात्रेद्वारे पोहोचविण्यासाठी अतुल पवार व सुशांत गुरव या युवकांचा प्रयत्न सुरू आहे.जलसंधारणानंतर वृक्षारोपणजलसंधारणाच्या कामानंतर आता वृक्षरोपण ही मोहीम हाती घेतली आहे. सध्या गावात दहा हजार रोपे आहेत. त्यांची गाव परिसरात लागवड करून त्यांचे सवंर्धन करण्याचे मोठे आव्हान आहे. ते ग्रामस्थांच्या मदतीने आगामी १५ दिवसांत वृक्षारोपण करणार आहेत. 

राळेगणसिद्धी व हिवरेबाजार हे जलसंधारणाच्या कामांचे आदर्श मॉडेल आहे. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. सायकलीवर प्रवास करत लोकांना जलक्रांतीच्या चळवळीत सहभागी करून घेत आहोत.- अतुल पवारपाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाचे महत्त्व अनेक गावांना कळाले. अनेकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग केला. त्यामुळे जलसंधारणाची कामे झाली. इतर गावांनी त्याचप्रमाणे काम केले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.- सुशांत गुरव