शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

लग्नपत्रिकेतून ‘जलयुक्त शिवार’चा संदेश

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

मानेगावमधील कुटुंबाचा कौतुकास्पद उपक्रम : पाण्याचे महत्त्व पटविण्यासाठी पुढाकार

बाळासाहेब रोडे - सणबूर--जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून शिवारात पडलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. सामान्यांचाही या अभियानातील सहभाग मोलाचा ठरत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत आपलाही सहभाग असावा, या हेतूने श्रीधर हावळे यांनी लग्नपत्रिकेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. ही अनोखी लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी मुदगल यांनी जलदिंडीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१५ गावांमध्ये आगामी काळात पाणीच पिकणार आहे. या २१५ गावांमध्ये ३५८ कामे सुरू असून ८५७ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात या अभियानाची प्रभाविपणे अंमलबजावणी सुरू आहे. पाटण तालुक्यातील मानेगाव या गावातील आनंदराव शिवराम हावळे यांचे चिरंजीव श्रीधर हावळे आणि आनंदराव लक्ष्मण टोळे यांची कन्या योगिता यांचा विवाह होत आहे. त्या शुभविवाहाच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाइक व अन्य हितचिंतकांना देण्यात आलेल्या पत्रिकेमधून जलयुक्त शिवार अभियानाचा संदेश देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जलयुक्त शिवार अभियान या योजनेने भरारी घेतली आहे. ‘सृष्टीसाठी जीव सारा, तिळ-तिळ तुटावा, गोड पाण्याचा झरा, माणूस माणसाला जोडला जावा..!’ अशा आशयाच्या कवितेच्या ओळी पत्रिकेत छापल्या आहेत. सोबत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जलयुक्त शिवार अभियानाचा लोगो, समवेत महाराष्ट्राचा नकाशाही छापला आहे.हावळे परिवाराने लग्नपत्रिकेतून पै पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाइक यांना जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्याचा संदेश दिला आहे. गावागावांत जलक्रांती होण्यास मदतजिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विनी मुदगल यांनी चंग बांधला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह त्यांची सर्व टीम मोठ्या उत्साहाने या कामाला लागली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. जाखणगाव, गुळुंब, किवळसारखी गावे जिल्ह्यात रोलमॉडेल बनली आहेत तर अंतर्गत कामे पूर्ण झाल्यास गावात जलक्रांती होण्यास मदत होणार आहे.