शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

पिण्याच्या पाण्यावरुन सदस्य, ग्रामविकास अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 15:44 IST

वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.?

ठळक मुद्देवरकुटे मलवडी ग्रामसभा पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी सुनावले खडे बोल

वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.?

गेली तीन महिने वरकुटे मलवडी परिसरात भीषण पाणीटंचाई असताना गांवकºयांच्या पिण्याच्या पाण्याबद्दलच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करायला पाहिजे होत्या; परंतु प्यायला पाणी नाही, या कारणामुळे सर्वसामान्य जनतेची चाललेली तडफड उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा आंधळं आणि ऐकून बहिरं होण्यामागची ग्रामपंचायतीची काय कारणे आहेत. याबद्दल उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या कारभाºयांना धारेवर धरले. येत्या चार ते पाच दिवसांत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा तरूणांनी दिला आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, उपसरपंच बापूसाहेब बनसोडे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव जगताप, विजय बनसोडे, बाळकृष्ण जगताप, रामचंद्र नरळे, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, माणिकराव जगताप, सतीश जगताप, बंडोपंत मंडले, सुनील थोरात, बाबासाहेब नरळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मागासवर्गीयांच्यासाठी असणाºया स्मशानभूमीला कित्तेक वर्षे रस्ता नसल्याने ऐनवेळी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित रस्त्याची सोय करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. बाळासाहेब आटपाडकर यांनी गावात दारू बंदी करावी, असा ठराव मांडला मात्र काहींनी गावची दारू बंद झाली तर आम्ही कुठे जायचं असे म्हणून खिल्ली उडवली.

याबरोबरच गावात कायमस्वरूपी वायरमन, आरोग्य उपकेंद्र ,दलित वस्तीतील गटारे सांडपाणी, आणि दीड वर्षांपासून विजेच्या खांबावरील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरु करण्याबाबत ग्रामसभेत आवाज उठवला. तसेच दररोज ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात दप्तरी काम करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आग्रह धरला. तसेच पंधरा टक्के मागासवर्गीय निधी दोन वर्षे होवून गेली तरी त्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याने त्वरित लाभ देण्यात यावा अन्यथा वरिष्ठांच्याकडे तक्रार देण्यात येईल असे ठणकावून सांगण्यात आले.यावेळी सुभाष जगताप, साहेबराव खरात, प्रदिप पन्हाळे, राहूल सुर्यवंशी, सुरेश यादव,अमोल यादव,नामदेव शिंदे,चंद्रकांत पिसे, संजय काटकर,धोंडीराम तोडकर, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...तर हंडामोर्चा काढू : सुरेखा काळेल

ग्रामसभेत प्रथमत:च सुरेखा काळेल या महिला भगिनीने ग्रामविकास अधिकारी आय.ए.शेख यांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, आणि गटाराचे सांडपाणी साचून आमच्यासह आजूबाजूच्या अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत आपणाकडे अनेकवेळा तक्रारी देवून सुद्धा आपण कसलीच कारवाई केलीच नाही, परंतु पाच ते सहा दिवसांमध्ये आमच्या समस्यांचे निवारण न केल्यास सर्व गावातील महिलांसह ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर महिलांचा हंडामोर्चा काढला जाईल, असे ठणकावून सांगितले.