शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

पिण्याच्या पाण्यावरुन सदस्य, ग्रामविकास अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 15:44 IST

वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.?

ठळक मुद्देवरकुटे मलवडी ग्रामसभा पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी सुनावले खडे बोल

वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.?

गेली तीन महिने वरकुटे मलवडी परिसरात भीषण पाणीटंचाई असताना गांवकºयांच्या पिण्याच्या पाण्याबद्दलच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करायला पाहिजे होत्या; परंतु प्यायला पाणी नाही, या कारणामुळे सर्वसामान्य जनतेची चाललेली तडफड उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा आंधळं आणि ऐकून बहिरं होण्यामागची ग्रामपंचायतीची काय कारणे आहेत. याबद्दल उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या कारभाºयांना धारेवर धरले. येत्या चार ते पाच दिवसांत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा तरूणांनी दिला आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, उपसरपंच बापूसाहेब बनसोडे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव जगताप, विजय बनसोडे, बाळकृष्ण जगताप, रामचंद्र नरळे, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, माणिकराव जगताप, सतीश जगताप, बंडोपंत मंडले, सुनील थोरात, बाबासाहेब नरळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मागासवर्गीयांच्यासाठी असणाºया स्मशानभूमीला कित्तेक वर्षे रस्ता नसल्याने ऐनवेळी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित रस्त्याची सोय करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. बाळासाहेब आटपाडकर यांनी गावात दारू बंदी करावी, असा ठराव मांडला मात्र काहींनी गावची दारू बंद झाली तर आम्ही कुठे जायचं असे म्हणून खिल्ली उडवली.

याबरोबरच गावात कायमस्वरूपी वायरमन, आरोग्य उपकेंद्र ,दलित वस्तीतील गटारे सांडपाणी, आणि दीड वर्षांपासून विजेच्या खांबावरील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरु करण्याबाबत ग्रामसभेत आवाज उठवला. तसेच दररोज ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात दप्तरी काम करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आग्रह धरला. तसेच पंधरा टक्के मागासवर्गीय निधी दोन वर्षे होवून गेली तरी त्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याने त्वरित लाभ देण्यात यावा अन्यथा वरिष्ठांच्याकडे तक्रार देण्यात येईल असे ठणकावून सांगण्यात आले.यावेळी सुभाष जगताप, साहेबराव खरात, प्रदिप पन्हाळे, राहूल सुर्यवंशी, सुरेश यादव,अमोल यादव,नामदेव शिंदे,चंद्रकांत पिसे, संजय काटकर,धोंडीराम तोडकर, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...तर हंडामोर्चा काढू : सुरेखा काळेल

ग्रामसभेत प्रथमत:च सुरेखा काळेल या महिला भगिनीने ग्रामविकास अधिकारी आय.ए.शेख यांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, आणि गटाराचे सांडपाणी साचून आमच्यासह आजूबाजूच्या अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत आपणाकडे अनेकवेळा तक्रारी देवून सुद्धा आपण कसलीच कारवाई केलीच नाही, परंतु पाच ते सहा दिवसांमध्ये आमच्या समस्यांचे निवारण न केल्यास सर्व गावातील महिलांसह ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर महिलांचा हंडामोर्चा काढला जाईल, असे ठणकावून सांगितले.