शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य-अधिकाऱ्यांत ठरावावरून खडाजंगी

By admin | Updated: January 30, 2015 23:19 IST

कऱ्हाड पंचायत समिती सभा : विकासकामांवरून सदस्य आक्रमक; वीज विभागावर ताशेरे

कऱ्हाड : विकासकामांच्या मंजुरीचे ठराव सभेत करूनही ठरावाप्रमाणे कामे होत नसतील तर ठराव कशासाठी करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ ठराव करूनही अधिकारी वर्षभर कामे करीत नसतील तर ठरावच करू नये, अशी भूमिका घेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते़ उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते़ या सभेदरम्यान सदस्या अनिता निकम, रूपाली यादव व ज्योती गुरव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ कृषी विभागाच्या आढाव्यावेळी सदस्य दयानंद पाटील व भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना योजनांविषयी विचारणा केली़ विभागाकडून योजना, प्रस्ताव कधी मागविण्यात येतात याची माहिती अधिकारी सदस्यांना देत नसल्याचे त्यांनी सांगितले़ अजय शिरवाडकर यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी प्रत्येक प्रभाग मिटींगला गैरहजर राहत असल्याची तक्रार केली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातर्फे अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. तालुक्यात उत्तरमध्ये २१४ व दक्षिणमध्ये २२३ तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती त्यांनी दिली. सभापती देवराज पाटील यांनी त्या भागात शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या़ तालुक्यात पेयजल योजनेची ६० कामे मंजूर असून त्यापैकी १० कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ त्यावर अजय शिरवाडकर व भाऊसाहेब चव्हाण यांनी गावातील हातपंप मोडकळीस आले असून काहींच्या फुटलेल्या पाईप बसविण्यात आल्या नसल्याचे सांगितले़ बांधकाम विभागाच्या आढाव्यावर भाऊसाहेब चव्हाण म्हणाले, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचकच राहिला नाही़ शासकीय विभागाकडून झालेल्या विकासकामांचे फलक लावले जात नाहीत़ त्यामुळे शासकीय कामे केल्यानंतर शासनाचे बोर्ड उभारावेत, अशा सूचना सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांविषयी संताप...पंचायत समितीच्या सभेस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची विचारणा संबंधित विभागांतील इतर अधिकाऱ्यांकडे सदस्यांनी केली़ त्यावेळी मिटींगला गेलेत असे जो-तो अधिकारी सदस्यांना सांगत होता़ ‘तुमचं हे नेहमीचं असतं. प्रत्येकवेळी अधिकारी गैरहजर राहतात. अधिकारीच हजर राहत नसतील तर विचारणा कुणाकडे करायची,’ असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी संताप व्यक्त केला.