शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बैठक सांगलीत, भोजन साताऱ्यात!

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

कृषी समिती सभा : कृषी विकास अधिकारी सहलीवर

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा बुधवारी सांगलीत होणार होती. त्यासाठी सर्व तालुका कृषी अधिकारी हजर झाले. मात्र कृषी विकास अधिकारी कृषी समितीच्या सदस्यांना घेऊन सकाळीच कास पठार, सज्जनगडला फिरायला गेल्याचे समजले! कृषी विकास अधिकाऱ्यांनी मात्र सांगलीत बैठक घेतल्यानंतर, जेवणासाठी आणि पर्यटनासाठी सदस्यांना घेऊन सातारा येथे गेल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. सध्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून, शासनाने ३५३ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी समितीच्या बैठकीत काही निर्णय होण्याची अपेक्षा होती. परंतु, कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगलीत कृषी समितीची बैठक घेण्याचे नाटक करून साताऱ्याचा दौरा केला, असे चित्र दिसून आले. कृषी समितीची बैठक होणारच नव्हती, तर, जत, शिराळा, आटपाडी, कडेगाव अशा लांबच्या तालुक्यांतून कृषी अधिकाऱ्यांना कशासाठी बोलाविले?, किमान ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत तरी थांबण्याचे सौजन्य दाखविण्याची गरज नव्हती का?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कामाचा आढावा घेण्याऐवजी कृषी विकास अधिकारी कृषी समितीच्या सदस्यांसोबत सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, कास पठारासह अन्य ठिकाणे पाहण्यासाठी गेले. शिवाय तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा वेळ आणि त्यांच्या भत्त्यावरील हजारो रुपये खर्च वाया घालविला. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना, अधिकारी आणि कृषी समितीच्या सदस्यांनी असा कारभार करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)'सज्जनगडला फिरायला!कृषी समितीची बैठक जिल्ह्याबाहेर घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. ही सभा बाहेर घेण्यासाठी मंजुरी नसल्यामुळे आम्ही कृषी समितीची बैठक सांगली जिल्हा परिषदेतच घेतली. त्यानंतर सातारा येथील सज्जनगड येथे समिती सदस्यांना घेऊन फिरायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिली.