शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून सोबत आलेल्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्थाही या काळात मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावाकडे कोणालाही औषधोपचाराच्या अनुषंगाने कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत.

कोरोनाकाळाची सुरुवात झाल्यानंतर गतवर्षी मुंबईकरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. गावात तीन महिने राहिल्यानंतर येथील परिस्थितीची जाणीव तमाम महानगरांत वास्तव्यास असणाऱ्यांना झाली. परिणामी तीन महिन्यांत गावकऱ्यांकडून मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीतून त्यांनाही गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधीच हवी होती. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसह, प्लाझ्मा आणि अन्य काही औषधे मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध होत आहेत. याची माहिती असल्याने विविध गावांतील प्रमुख ग्रामस्थांना घेऊन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. गावात ज्यांना कोणाला औषधोपचारासह बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी मदत उभी करण्याचे काम ही मंडळी आपले दैनंदिन काम सांभाळून करीत आहेत. ज्या गोष्टी साताऱ्यात उपलब्ध होत नाहीत त्या मुंबई आणि पुण्याहून मिळवून देण्यासाठीही ही मंडळी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातून गाडी मुंबईला जाऊन आवश्‍यक रुग्णांसाठी हे इंजेक्शन आणले जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या गाडीचा खर्च विभागून करतात, तर गाडी घेऊन आलेल्यांना पॅक जेवण देण्याची जबाबदारी या महानगरांतील सातारकरांनी घेतली आहे.

कोविडने माणसांना माणसांपासून दूर केलं असलं तरीही माणसातील माणुसकी जागृत करण्यासाठीही का काळ उपयुक्त ठरला. कोणी ओळखीचा नसला तरी आपल्या जिल्ह्याचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी धावणारी ही मंडळी खरी कोविड योद्धे आहेत. महानगरांमध्ये विस्तीर्ण व्यापात अडकूनही मातृभूमीच्या सेवेसाठी आपले योगदान असावे, ही त्यांची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चौकट :

पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावासाठी चक्क बोअर !

जावळी तालुक्यातील भामघर गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासह खर्चासाठीही करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईकर मंडळी गावात आली असता, त्यांना या पाण्याचा रंग बदललेला दिसला. खात्री करायची म्हणून काहींनी हे पाणी बाटलीतून मुंबईत तपासणीसाठी पाठवलं. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांनी विजय सावले यांच्या पुढाकाराने गावात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी चक्क बोअर मारून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढला.

कोट :

मातृभूमीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठ्या शहरांत जाऊन काम करू शकलो. गेल्या महिन्याभरात जावळीत रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधे उपलब्ध करून देण्यात यश आले. आपल्या भागातील कोणीही आले तरी त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रसंग बाका आहे; पण सर्वांच्या सहकार्यातून गावाकडील आपल्या लोकांची कुठेही हेळसांड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सेवा पुरविताना आत्मिक समाधान मिळते.

- विजय सावले, भामघर