शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून सोबत आलेल्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्थाही या काळात मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावाकडे कोणालाही औषधोपचाराच्या अनुषंगाने कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत.

कोरोनाकाळाची सुरुवात झाल्यानंतर गतवर्षी मुंबईकरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. गावात तीन महिने राहिल्यानंतर येथील परिस्थितीची जाणीव तमाम महानगरांत वास्तव्यास असणाऱ्यांना झाली. परिणामी तीन महिन्यांत गावकऱ्यांकडून मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीतून त्यांनाही गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधीच हवी होती. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसह, प्लाझ्मा आणि अन्य काही औषधे मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध होत आहेत. याची माहिती असल्याने विविध गावांतील प्रमुख ग्रामस्थांना घेऊन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. गावात ज्यांना कोणाला औषधोपचारासह बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी मदत उभी करण्याचे काम ही मंडळी आपले दैनंदिन काम सांभाळून करीत आहेत. ज्या गोष्टी साताऱ्यात उपलब्ध होत नाहीत त्या मुंबई आणि पुण्याहून मिळवून देण्यासाठीही ही मंडळी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातून गाडी मुंबईला जाऊन आवश्‍यक रुग्णांसाठी हे इंजेक्शन आणले जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या गाडीचा खर्च विभागून करतात, तर गाडी घेऊन आलेल्यांना पॅक जेवण देण्याची जबाबदारी या महानगरांतील सातारकरांनी घेतली आहे.

कोविडने माणसांना माणसांपासून दूर केलं असलं तरीही माणसातील माणुसकी जागृत करण्यासाठीही का काळ उपयुक्त ठरला. कोणी ओळखीचा नसला तरी आपल्या जिल्ह्याचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी धावणारी ही मंडळी खरी कोविड योद्धे आहेत. महानगरांमध्ये विस्तीर्ण व्यापात अडकूनही मातृभूमीच्या सेवेसाठी आपले योगदान असावे, ही त्यांची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चौकट :

पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावासाठी चक्क बोअर !

जावळी तालुक्यातील भामघर गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासह खर्चासाठीही करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईकर मंडळी गावात आली असता, त्यांना या पाण्याचा रंग बदललेला दिसला. खात्री करायची म्हणून काहींनी हे पाणी बाटलीतून मुंबईत तपासणीसाठी पाठवलं. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांनी विजय सावले यांच्या पुढाकाराने गावात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी चक्क बोअर मारून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढला.

कोट :

मातृभूमीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठ्या शहरांत जाऊन काम करू शकलो. गेल्या महिन्याभरात जावळीत रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधे उपलब्ध करून देण्यात यश आले. आपल्या भागातील कोणीही आले तरी त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रसंग बाका आहे; पण सर्वांच्या सहकार्यातून गावाकडील आपल्या लोकांची कुठेही हेळसांड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सेवा पुरविताना आत्मिक समाधान मिळते.

- विजय सावले, भामघर