शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून सोबत आलेल्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्थाही या काळात मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावाकडे कोणालाही औषधोपचाराच्या अनुषंगाने कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत.

कोरोनाकाळाची सुरुवात झाल्यानंतर गतवर्षी मुंबईकरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. गावात तीन महिने राहिल्यानंतर येथील परिस्थितीची जाणीव तमाम महानगरांत वास्तव्यास असणाऱ्यांना झाली. परिणामी तीन महिन्यांत गावकऱ्यांकडून मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीतून त्यांनाही गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधीच हवी होती. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसह, प्लाझ्मा आणि अन्य काही औषधे मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध होत आहेत. याची माहिती असल्याने विविध गावांतील प्रमुख ग्रामस्थांना घेऊन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. गावात ज्यांना कोणाला औषधोपचारासह बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी मदत उभी करण्याचे काम ही मंडळी आपले दैनंदिन काम सांभाळून करीत आहेत. ज्या गोष्टी साताऱ्यात उपलब्ध होत नाहीत त्या मुंबई आणि पुण्याहून मिळवून देण्यासाठीही ही मंडळी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातून गाडी मुंबईला जाऊन आवश्‍यक रुग्णांसाठी हे इंजेक्शन आणले जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या गाडीचा खर्च विभागून करतात, तर गाडी घेऊन आलेल्यांना पॅक जेवण देण्याची जबाबदारी या महानगरांतील सातारकरांनी घेतली आहे.

कोविडने माणसांना माणसांपासून दूर केलं असलं तरीही माणसातील माणुसकी जागृत करण्यासाठीही का काळ उपयुक्त ठरला. कोणी ओळखीचा नसला तरी आपल्या जिल्ह्याचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी धावणारी ही मंडळी खरी कोविड योद्धे आहेत. महानगरांमध्ये विस्तीर्ण व्यापात अडकूनही मातृभूमीच्या सेवेसाठी आपले योगदान असावे, ही त्यांची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चौकट :

पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावासाठी चक्क बोअर !

जावळी तालुक्यातील भामघर गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासह खर्चासाठीही करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईकर मंडळी गावात आली असता, त्यांना या पाण्याचा रंग बदललेला दिसला. खात्री करायची म्हणून काहींनी हे पाणी बाटलीतून मुंबईत तपासणीसाठी पाठवलं. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांनी विजय सावले यांच्या पुढाकाराने गावात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी चक्क बोअर मारून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढला.

कोट :

मातृभूमीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठ्या शहरांत जाऊन काम करू शकलो. गेल्या महिन्याभरात जावळीत रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधे उपलब्ध करून देण्यात यश आले. आपल्या भागातील कोणीही आले तरी त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रसंग बाका आहे; पण सर्वांच्या सहकार्यातून गावाकडील आपल्या लोकांची कुठेही हेळसांड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सेवा पुरविताना आत्मिक समाधान मिळते.

- विजय सावले, भामघर