शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हयातीतच नवीन घरात जायचंय !

By admin | Updated: June 22, 2017 13:33 IST

घरकुलाचे दीड वषार्पूर्वीच उद्घाटन : पाणी, विजेअभावी लाभार्थी वंचित

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : संपूर्ण आयुष्य झोपडीत घालवणाऱ्या... उन्हाचे चटके सोसत.. थंडीत बारदानाचं दरवाजा करत कुडकुडत बसणाऱ्या व गळक्या घरात पावसाचं थेंब-थेंब अंगावर झेलत संसाराचा गाडा हाकताना आपलंही एखादं घर असावं, अशी इच्छा बागळणाऱ्या आजीबाइंर्चं स्वप्न घरकुल योजनेतून पूर्ण झालं; पण वीज व पाणी न मिळाल्याने गेल्या दीड वषार्पासून नवीन घरात जाण्याची वाट पाहावी लागत आहे. तरी माज्या हयातीत तरी मला नवीन घरात जायचंय आहे, अशी इच्छा सदर बझार येथील झोपडपट्टीतील फुलाबाई या आजींनी बोलून दाखवली.केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर नगर येथे नवीन घरकुल उभारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या घरकुलाच्या कामाला सुरुवात झाली होती, तर दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजी या घरकुल पूर्ण होऊन याचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करून लकी ड्रॉ पद्धतीने या घरकुलाचे वाटपही लाभार्थ्यांना करण्यात आले. परंतु वीज व पाणी नसल्याने मागील दीड वषार्पासून हे घरकूल तसेच पडून आहेत.या वसाहतीतील नागरिकही गेल्या दीड वषार्पासून वीज व पाण्यासाठी पालिका व जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन देत हेलपाटे मारत आहेत. त्यांना फक्त आजपर्यंत आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. वीज कनेक्शनसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून येथे वीज देण्याचे काम सुरू झाले. तरीही महावितरण कार्यालयात मीटरच उपलब्ध नसल्याने हेही काम अर्धवट स्थितीत राहिले आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी घरकुल योजनेसाठी येथील जागा मोकळी करण्यासाठी झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. एक-दोन वर्षांतच तुम्हाला घरे ताब्यात मिळतील, असे आश्वासन देऊन त्यांना कालव्याजवळ तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी मोडकी-तोडकी पत्र्याची शेड टाकून दोन वर्षे काढली; मात्र या पावसात शेडमध्ये राहणे म्हणजेच धोका पत्कारावा लागणार आहे. कालव्यामुळे सापांचाही वावर वाढला असल्याने लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणे टाकीला पाणी नाही..

वारंवार तक्रारी करून देखील दाद घेत नसल्याने नगरसेविका कुसुम गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता घरकुलाला पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत वाढीव पाणीसाठा होत नसल्याने पाणी देता येत नसल्याचे सांगितल्याचे शरद गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.

पाण्यासाठी आंदोलन करणार...

घरकुल योजना पूर्ण होऊनदेखील पाण्याअभावी घरात जाता येत नाही, वर्षभरात अनेक निवेदन देऊनही संबंधित विभाग दखल घेत नाही. यासाठी आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शरद गायकवाड, आमीन शेख, बाळासाहेब गुळवे, प्रतिभा गायकवाड, मीनाक्षी निंबाळकर, मुमताज पठाण आदींनी निर्णय घेतला आहे.