शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

हयातीतच नवीन घरात जायचंय !

By admin | Updated: June 22, 2017 13:33 IST

घरकुलाचे दीड वषार्पूर्वीच उद्घाटन : पाणी, विजेअभावी लाभार्थी वंचित

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : संपूर्ण आयुष्य झोपडीत घालवणाऱ्या... उन्हाचे चटके सोसत.. थंडीत बारदानाचं दरवाजा करत कुडकुडत बसणाऱ्या व गळक्या घरात पावसाचं थेंब-थेंब अंगावर झेलत संसाराचा गाडा हाकताना आपलंही एखादं घर असावं, अशी इच्छा बागळणाऱ्या आजीबाइंर्चं स्वप्न घरकुल योजनेतून पूर्ण झालं; पण वीज व पाणी न मिळाल्याने गेल्या दीड वषार्पासून नवीन घरात जाण्याची वाट पाहावी लागत आहे. तरी माज्या हयातीत तरी मला नवीन घरात जायचंय आहे, अशी इच्छा सदर बझार येथील झोपडपट्टीतील फुलाबाई या आजींनी बोलून दाखवली.केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर नगर येथे नवीन घरकुल उभारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या घरकुलाच्या कामाला सुरुवात झाली होती, तर दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजी या घरकुल पूर्ण होऊन याचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करून लकी ड्रॉ पद्धतीने या घरकुलाचे वाटपही लाभार्थ्यांना करण्यात आले. परंतु वीज व पाणी नसल्याने मागील दीड वषार्पासून हे घरकूल तसेच पडून आहेत.या वसाहतीतील नागरिकही गेल्या दीड वषार्पासून वीज व पाण्यासाठी पालिका व जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन देत हेलपाटे मारत आहेत. त्यांना फक्त आजपर्यंत आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. वीज कनेक्शनसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून येथे वीज देण्याचे काम सुरू झाले. तरीही महावितरण कार्यालयात मीटरच उपलब्ध नसल्याने हेही काम अर्धवट स्थितीत राहिले आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी घरकुल योजनेसाठी येथील जागा मोकळी करण्यासाठी झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. एक-दोन वर्षांतच तुम्हाला घरे ताब्यात मिळतील, असे आश्वासन देऊन त्यांना कालव्याजवळ तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी मोडकी-तोडकी पत्र्याची शेड टाकून दोन वर्षे काढली; मात्र या पावसात शेडमध्ये राहणे म्हणजेच धोका पत्कारावा लागणार आहे. कालव्यामुळे सापांचाही वावर वाढला असल्याने लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणे टाकीला पाणी नाही..

वारंवार तक्रारी करून देखील दाद घेत नसल्याने नगरसेविका कुसुम गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता घरकुलाला पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत वाढीव पाणीसाठा होत नसल्याने पाणी देता येत नसल्याचे सांगितल्याचे शरद गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.

पाण्यासाठी आंदोलन करणार...

घरकुल योजना पूर्ण होऊनदेखील पाण्याअभावी घरात जाता येत नाही, वर्षभरात अनेक निवेदन देऊनही संबंधित विभाग दखल घेत नाही. यासाठी आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शरद गायकवाड, आमीन शेख, बाळासाहेब गुळवे, प्रतिभा गायकवाड, मीनाक्षी निंबाळकर, मुमताज पठाण आदींनी निर्णय घेतला आहे.