शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

हयातीतच नवीन घरात जायचंय !

By admin | Updated: June 22, 2017 13:33 IST

घरकुलाचे दीड वषार्पूर्वीच उद्घाटन : पाणी, विजेअभावी लाभार्थी वंचित

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : संपूर्ण आयुष्य झोपडीत घालवणाऱ्या... उन्हाचे चटके सोसत.. थंडीत बारदानाचं दरवाजा करत कुडकुडत बसणाऱ्या व गळक्या घरात पावसाचं थेंब-थेंब अंगावर झेलत संसाराचा गाडा हाकताना आपलंही एखादं घर असावं, अशी इच्छा बागळणाऱ्या आजीबाइंर्चं स्वप्न घरकुल योजनेतून पूर्ण झालं; पण वीज व पाणी न मिळाल्याने गेल्या दीड वषार्पासून नवीन घरात जाण्याची वाट पाहावी लागत आहे. तरी माज्या हयातीत तरी मला नवीन घरात जायचंय आहे, अशी इच्छा सदर बझार येथील झोपडपट्टीतील फुलाबाई या आजींनी बोलून दाखवली.केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर नगर येथे नवीन घरकुल उभारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या घरकुलाच्या कामाला सुरुवात झाली होती, तर दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजी या घरकुल पूर्ण होऊन याचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करून लकी ड्रॉ पद्धतीने या घरकुलाचे वाटपही लाभार्थ्यांना करण्यात आले. परंतु वीज व पाणी नसल्याने मागील दीड वषार्पासून हे घरकूल तसेच पडून आहेत.या वसाहतीतील नागरिकही गेल्या दीड वषार्पासून वीज व पाण्यासाठी पालिका व जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन देत हेलपाटे मारत आहेत. त्यांना फक्त आजपर्यंत आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. वीज कनेक्शनसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून येथे वीज देण्याचे काम सुरू झाले. तरीही महावितरण कार्यालयात मीटरच उपलब्ध नसल्याने हेही काम अर्धवट स्थितीत राहिले आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी घरकुल योजनेसाठी येथील जागा मोकळी करण्यासाठी झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. एक-दोन वर्षांतच तुम्हाला घरे ताब्यात मिळतील, असे आश्वासन देऊन त्यांना कालव्याजवळ तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी मोडकी-तोडकी पत्र्याची शेड टाकून दोन वर्षे काढली; मात्र या पावसात शेडमध्ये राहणे म्हणजेच धोका पत्कारावा लागणार आहे. कालव्यामुळे सापांचाही वावर वाढला असल्याने लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणे टाकीला पाणी नाही..

वारंवार तक्रारी करून देखील दाद घेत नसल्याने नगरसेविका कुसुम गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता घरकुलाला पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत वाढीव पाणीसाठा होत नसल्याने पाणी देता येत नसल्याचे सांगितल्याचे शरद गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.

पाण्यासाठी आंदोलन करणार...

घरकुल योजना पूर्ण होऊनदेखील पाण्याअभावी घरात जाता येत नाही, वर्षभरात अनेक निवेदन देऊनही संबंधित विभाग दखल घेत नाही. यासाठी आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शरद गायकवाड, आमीन शेख, बाळासाहेब गुळवे, प्रतिभा गायकवाड, मीनाक्षी निंबाळकर, मुमताज पठाण आदींनी निर्णय घेतला आहे.